शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठीचे ११० वर्षात आठवे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 23:15 IST

Khamgaon-Jalna railway line रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी येणारी ही पहिलीच समिती नसून यापूर्वी तब्बल आठ वेळा असे सर्वेक्षण झाले आहे.

ठळक मुद्दे १९१० मध्ये या मार्गासाठी हालचाली सुरू झाल्या. १९१२ मध्ये पहिले, त्यानंतर १९२६ मध्ये दुसरे सर्वेक्षण झाले.स्वातंत्र्योत्तर काळात १९८४, १९९१, १९९४, २००२, २०१० मध्ये सर्वेक्षण झाले होते.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठी मुंबई सर्वेक्षण विभागाचे पाच सदस्यीय रेल्वेमार्ग सर्वेक्षण समिती जालना आणि बुलडाणा जिल्ह्यात प्रत्यक्ष सर्वेक्षण दोऱ्यावर आली आहे. मात्र शतकोत्तर प्रलंबित असलेल्या या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी येणारी ही पहिलीच समिती नसून यापूर्वी तब्बल आठ वेळा असे सर्वेक्षण झाले आहे. प्रत्येक वेळी त्याचे फलनिष्पतती ही बुलडाणेकरांचा भ्रमनिराश करणारी ठरली आहे. त्यामुळे आताच्या सर्वेक्षणातून सकारात्मक बाबीच समोर याव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सुमारे २४ हजार कोटी रुपयांची अर्थव्यवस्था असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील व्यापार, कृषी, उद्योग व तत्सम क्षेत्रातील उलाढालीचा आढावा घेऊन रस्ते वाहतूक, बस वाहतुकीद्वारे होणारी उलाढाल याचा साकल्याने विचार करून सध्याची आलेली समिती त्यांचा अहवाल देणार आहे. मात्र जेथे मुळातच दळणवळणाची साधणे कमी आहेत, तेथे उद्योगांचा विकास कसा होईल. त्यातच बुलडाणा अैाद्योगिकदृष्ट्या डी-प्लसमध्ये आहे. परिणामी त्याची उलाढालही सर्वश्रृत आहे. झारखंडमधून जालन्यात स्टील उद्योगासाठी किती कच्चा माल जातो, याचा शोध समितीने पाच जानेवारी रोजी घेतला. त्या पार्श्वभूमीवर केवळ असा शोध न घेता पायाभूत सुविधा उपलब्ध केल्यास दोन्ही जिल्ह्यात उद्योगांची भरभराट होईल व रेल्वेमार्गही नफ्यात येईल. त्यादृष्टीने समितीने किमान सकारात्मक भूमिका या सर्वेक्षणात घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होतेय. केवळ सर्वेक्षणापुरता हा मर्यादित न राहता रेल्वेमार्ग प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यासाठी जालना आणि बुलडाणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आता कंबर कसायला पाहिजे. अन्यथा हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहील. त्याचे कारणही तसेच आहे. १९१० मध्ये या मार्गासाठी हालचाली सुरू झाल्या. १९१२ मध्ये पहिले सर्वेक्षण झाले. त्यानंतर १९२६ मध्ये दुसरे सर्वेक्षण झाले. त्यानंतर रखडलेला या मार्गासाठी स्वातंत्र्योत्तर काळात १९८४, १९९१, १९९४, २००२, २०१० मध्ये सर्वेक्षण झाले होते. त्यानंतर आता २०२१मध्ये आठव्यांदा सर्वेक्षण होत असल्याची माहिती रेल्वे लोकआंदोलन समितीचे सदस्य तथा अभ्यासक किशोर वळसे यांनी दिली.

१९२६ मध्ये लागणार होता ३३ लाख खर्चया रेल्वेमार्गासाठी १९२६ मध्ये दुसऱ्यांचा सर्वेक्षण झाले होते. त्यानंतर या १६२ किमी लांबीच्या रेल्वेमार्गासाठी त्यावेळी ३३ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. जो की आता ११० वर्षांनंतर साधारणत: १३०० कोटींच्या आसपास जात आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त  १९२६मध्ये चिखली तालुक्यातील उंद्री परिसरात रेल्वे रुळासाठी माती कामही झाले होते. तसेच उंद्री येथे कामगारांचा एक कॅम्पही लागला होता. मात्र १९२९च्या दरम्यान दुसऱ्या महायुद्धाचे ढग जगावर घोंघावू लागल्यामुळे प्रस्तावित रेल्वेमार्ग गुंडाळल्या गेला होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावJalanaजालनाIndian Railwayभारतीय रेल्वे