शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठीचे ११० वर्षात आठवे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 23:15 IST

Khamgaon-Jalna railway line रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी येणारी ही पहिलीच समिती नसून यापूर्वी तब्बल आठ वेळा असे सर्वेक्षण झाले आहे.

ठळक मुद्दे १९१० मध्ये या मार्गासाठी हालचाली सुरू झाल्या. १९१२ मध्ये पहिले, त्यानंतर १९२६ मध्ये दुसरे सर्वेक्षण झाले.स्वातंत्र्योत्तर काळात १९८४, १९९१, १९९४, २००२, २०१० मध्ये सर्वेक्षण झाले होते.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठी मुंबई सर्वेक्षण विभागाचे पाच सदस्यीय रेल्वेमार्ग सर्वेक्षण समिती जालना आणि बुलडाणा जिल्ह्यात प्रत्यक्ष सर्वेक्षण दोऱ्यावर आली आहे. मात्र शतकोत्तर प्रलंबित असलेल्या या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी येणारी ही पहिलीच समिती नसून यापूर्वी तब्बल आठ वेळा असे सर्वेक्षण झाले आहे. प्रत्येक वेळी त्याचे फलनिष्पतती ही बुलडाणेकरांचा भ्रमनिराश करणारी ठरली आहे. त्यामुळे आताच्या सर्वेक्षणातून सकारात्मक बाबीच समोर याव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सुमारे २४ हजार कोटी रुपयांची अर्थव्यवस्था असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील व्यापार, कृषी, उद्योग व तत्सम क्षेत्रातील उलाढालीचा आढावा घेऊन रस्ते वाहतूक, बस वाहतुकीद्वारे होणारी उलाढाल याचा साकल्याने विचार करून सध्याची आलेली समिती त्यांचा अहवाल देणार आहे. मात्र जेथे मुळातच दळणवळणाची साधणे कमी आहेत, तेथे उद्योगांचा विकास कसा होईल. त्यातच बुलडाणा अैाद्योगिकदृष्ट्या डी-प्लसमध्ये आहे. परिणामी त्याची उलाढालही सर्वश्रृत आहे. झारखंडमधून जालन्यात स्टील उद्योगासाठी किती कच्चा माल जातो, याचा शोध समितीने पाच जानेवारी रोजी घेतला. त्या पार्श्वभूमीवर केवळ असा शोध न घेता पायाभूत सुविधा उपलब्ध केल्यास दोन्ही जिल्ह्यात उद्योगांची भरभराट होईल व रेल्वेमार्गही नफ्यात येईल. त्यादृष्टीने समितीने किमान सकारात्मक भूमिका या सर्वेक्षणात घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होतेय. केवळ सर्वेक्षणापुरता हा मर्यादित न राहता रेल्वेमार्ग प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यासाठी जालना आणि बुलडाणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आता कंबर कसायला पाहिजे. अन्यथा हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहील. त्याचे कारणही तसेच आहे. १९१० मध्ये या मार्गासाठी हालचाली सुरू झाल्या. १९१२ मध्ये पहिले सर्वेक्षण झाले. त्यानंतर १९२६ मध्ये दुसरे सर्वेक्षण झाले. त्यानंतर रखडलेला या मार्गासाठी स्वातंत्र्योत्तर काळात १९८४, १९९१, १९९४, २००२, २०१० मध्ये सर्वेक्षण झाले होते. त्यानंतर आता २०२१मध्ये आठव्यांदा सर्वेक्षण होत असल्याची माहिती रेल्वे लोकआंदोलन समितीचे सदस्य तथा अभ्यासक किशोर वळसे यांनी दिली.

१९२६ मध्ये लागणार होता ३३ लाख खर्चया रेल्वेमार्गासाठी १९२६ मध्ये दुसऱ्यांचा सर्वेक्षण झाले होते. त्यानंतर या १६२ किमी लांबीच्या रेल्वेमार्गासाठी त्यावेळी ३३ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. जो की आता ११० वर्षांनंतर साधारणत: १३०० कोटींच्या आसपास जात आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त  १९२६मध्ये चिखली तालुक्यातील उंद्री परिसरात रेल्वे रुळासाठी माती कामही झाले होते. तसेच उंद्री येथे कामगारांचा एक कॅम्पही लागला होता. मात्र १९२९च्या दरम्यान दुसऱ्या महायुद्धाचे ढग जगावर घोंघावू लागल्यामुळे प्रस्तावित रेल्वेमार्ग गुंडाळल्या गेला होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावJalanaजालनाIndian Railwayभारतीय रेल्वे