शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

प्रमाणपत्र मिळालेले जिल्हय़ातील आठ शेतकरीही कर्जमाफीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:41 IST

चिखली : शेतकरी कर्जमाफीच्या ग्रीन यादीत बुलडाणा जिल्हय़ातून ज्या २१ शेतकर्‍यांना  कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र समारंभपूर्वक वितरित करण्यात आले, त्यापैकी आठ शेतकर्‍यांना  अद्यापपर्यंत कर्जमाफी तर दूरच बँकांना पाठविण्यात आलेल्या ग्रीन यादीमध्येही या आठ शे तकर्‍यांचा समावेश नसल्याने, त्या कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळालेल्या शेतकर्‍यांना  कर्जमाफी मिळणार का, असा प्रश्न चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे  यांनी शुक्रवारी  विधिमंडळात उपस्थित केला.

ठळक मुद्देआ. राहुल बोंद्रे यांनी सभागृहात उपस्थित केला प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शेतकरी कर्जमाफीच्या ग्रीन यादीत बुलडाणा जिल्हय़ातून ज्या २१ शेतकर्‍यांना  कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र समारंभपूर्वक वितरित करण्यात आले, त्यापैकी आठ शेतकर्‍यांना  अद्यापपर्यंत कर्जमाफी तर दूरच बँकांना पाठविण्यात आलेल्या ग्रीन यादीमध्येही या आठ शे तकर्‍यांचा समावेश नसल्याने, त्या कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळालेल्या शेतकर्‍यांना  कर्जमाफी मिळणार का, असा प्रश्न चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे  यांनी शुक्रवारी  विधिमंडळात उपस्थित केला.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असे नाव देऊन कर्जमाफी जाहीर केली.   सहा महिने उलटूनही शेतकर्‍यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही.  शेतकर्‍यांचा रोष  आणि विरोधकांची टीका टाळण्यासाठी प्रत्यक्ष छदामही शेतकर्‍यांना न देता दिवाळीदरम्यान  १८ ऑक्टोबर २0१७ रोजी जिल्हय़ातील २१ शेतकर्‍यांना कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र  कृषी मंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर आणि जि.प. सभापती श्‍वेता  महाले यांचे हस्ते देण्यात आले. वस्तुत: बुलडाणा जिल्हय़ात ज्या ग्रीन यादीनुसार सरकट  किंवा ओटीएस या योजनेंतर्गत कर्जमाफी देल्याचे घोषित केल्या गेले, त्या ग्रीन यादीमध्ये  कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वाटप केलेल्या शेतकर्‍यांपैकी आठ शेतकर्‍यांची नावेच नसल्याचे  आ.बोंद्रे यांनी यावेळी सभागृहात सांगितले. शेतकर्‍यांची नावे ग्रीन यादीत नाहीत, तर त्यांना कर्जमाफीचा लाभ देणार का, असा प्रश्न  त्यांनी उपस्थित केला.

प्रमाणपत्र मिळालेल्यांच्या खात्यात रक्कम नाहीभाजपा सरकारने कुठलीही पूर्वतयारी न करता दिवाळीची भेट म्हणून प्रमाणपत्र वितरित  केलेल्या आठ शेतकर्‍यांपैकी चिखली मतदारसंघातील चांडोळ येथील विठ्ठलराव गणप तराव देशमुख, धनपाल देवमन मुरादे, चांधई-आंधई येथील दिलीप नामदेवराव तवर या तीन  शेतकर्‍यांचा समावेश असून, या शेतकर्‍यांच्या संबंधित बँक शाखेत प्रत्यक्ष पाहणीत त्यांच्या  खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा नसल्याचे ते म्हणाले.

सरकारवर ४२0 चे गुन्हे दाखल करण्याची मागणीजिल्हय़ातील शेतकर्‍यांसह एकूण १0१ शेतकर्‍यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले.  वस्तुत: बुलडाणा जिल्हय़ात कर्जमाफी प्रमाणपत्र मिळालेल्या शेतकर्‍यांसह इतरांची यादीही  पोर्टलवरून गायब करण्यात येऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिलेल्या शे तकर्‍यांच्याही खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. ही शेतकर्‍यांची शुद्ध फसवणूक  असून, या फसवणुकीबद्दल सरकारवर कलम ४२0 अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी  मागणी आ. बोंद्रे यांनी यापूर्वीच २७ ऑक्टोबर रोजी राज्यपालांकडे केली आहे.

टॅग्स :Rahul Bondreराहुल बोंद्रे