शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:31 IST

आधीच कोरोना महामारीने त्रस्त असलेले शेतकरी शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे अडचणीत सापडले आहेत. खतांची जुन्या दराने विक्री केव्हा ...

आधीच कोरोना महामारीने त्रस्त असलेले शेतकरी शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे अडचणीत सापडले आहेत. खतांची जुन्या दराने विक्री केव्हा होणार, असा प्रश्नही शेतकऱ्यांना पडला आहे.

शेतकऱ्यांच्या भुसार मालासह शेतात लागवड केलेला भाजीपालाही कडक निर्बंधामुळे विक्री करता येत नाही. पेरणीपूर्वी शेतीमध्ये मशागतीत शेतकरी गुंतला असून १५ दिवसांनी शेतामध्ये पेरणीसाठी लागणारे रासायनिक खत गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी महाग झाले आहे. त्यामुळे पेरणी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. एकीकडे कडक निर्बंधांमुळे पीक कर्ज मिळविण्यास व पीक कर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. पीक कर्ज हे पेरणीपूर्वी वेळेवर मिळत नसल्याने शेवटी शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा भावाने सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ येत आहे. तर दुसरीकडे पेरणीपूर्वी शेतातील ट्रॅक्टरद्वारे कामे करताना डिझेलचे भाव वाढल्याने जास्तीचे पैसे देऊन शेतातील कामे करावी लागत आहेत. पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यांचे भाव गगनाला भिडले असून आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे. शासनाने रासायनिक खताचे व कृषी बियाण्यांचे भाव कमी करून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.