शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

ई पास नावालाच; कोणीही यावे, टिकली मारून जावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : राज्यभरात काेराेना संसर्ग वाढत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्हाबंदीही करण्यात आली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : राज्यभरात काेराेना संसर्ग वाढत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्हाबंदीही करण्यात आली असून, ई पास असल्याशिवाय शहरांमध्ये प्रवेश नाकारण्यात येत आहे. बुलडाणा शहरामध्ये केवळ शहर पाेलीस स्टेशनसमाेर काही तासच वाहनांची तपासणी करण्यात येते. त्यानंतर संचारबंदीतही वाहनांची दिवसभर वर्दळ सुरू असते.

जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी प्रशासनाने विविध निर्बंध लादले आहेत. त्यामध्ये जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानांना सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. सकाळी ११ नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्हा सीमा बंद करण्यात आल्या आहेत. शहरांमध्ये ई पास असल्याशिवाय प्रवेश नाकारण्यात आला आहे.

बुलडाणा शहरात मात्र पाेलीस स्टेशनसमाेर काही तास तपासणी करण्यात येते. त्यानंतर दिवसभर व रात्री वाहनांचा मुक्त संचार सुरू असताे. त्यामुळे ई पास नावालाच, कुणीही यावे, टिकली मारून जावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

त्रिशरण चाैक

बुलडाणा शहरात खामगाव आणि चिखली मार्गाने प्रवेश केल्यानंतर त्रिशरण चाैक लागताे. या चाैकात पाेलीस, महसूल आणि नगर पालिकेचे कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, शहरात ई पास नसलेलेही मुक्तपणे संचार करीत असल्याचे चित्र आहे.

सर्क्युलर राेड

ग्रामीण भागातून चिखली मार्गाने शहरात आलेली खासगी वाहने आणि दुचाकीधारक सर्क्युलर राेडने शहरात प्रवेश करतात. ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणारी वाहने सकाळी ११ नंतरही दिवसभर सुरू असतात. याकडे पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत आहे.

मलकापूर राेड

मलकापूर रस्त्याने बुलडाणा शहरात प्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांवर कुठलीही कारवाई हाेत नसल्याचे चित्र आहे. त्यांच्याकडे ई पास आहे किंवा नाही याची पडताळणीच हाेत नसल्याने ग्रामस्थांचा शहरामध्ये मुक्त संचार वाढला आहे. त्यामुळे काेराेना रुग्ण वाढत आहेत.

कर्मचाऱ्यांची वानवा

पाेलिसांकडे मनुष्यबळ ताेकडे असल्याने सर्वच रस्त्यांवर बंदाेबस्त ठेवणे अशक्य असल्याचे चित्र आहे.

नगर पालिका आणि महसूलचे पथक अजूनही रस्त्यावर कारवाई करण्यासाठी उतरले नसल्याचे चित्र आहे. केवळ पाेलीस काही वेळासाठी वाहनांची तपासणी करीत असल्याचे चित्र आहे.

सकाळी ११ नंतर संचारबंदी लागू करण्यात येत असली तरी दिवसभर दुचाकी व इतर वाहनांचा मुक्त संचार असताे. बुलडाणा शहरात रुग्णसंख्या वाढत असली तरी गांभीर्य नसल्याचे चित्र आहे.