शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

ई पास नावालाच; कोणीही यावे, टिकली मारून जावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : राज्यभरात काेराेना संसर्ग वाढत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्हाबंदीही करण्यात आली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : राज्यभरात काेराेना संसर्ग वाढत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्हाबंदीही करण्यात आली असून, ई पास असल्याशिवाय शहरांमध्ये प्रवेश नाकारण्यात येत आहे. बुलडाणा शहरामध्ये केवळ शहर पाेलीस स्टेशनसमाेर काही तासच वाहनांची तपासणी करण्यात येते. त्यानंतर संचारबंदीतही वाहनांची दिवसभर वर्दळ सुरू असते.

जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी प्रशासनाने विविध निर्बंध लादले आहेत. त्यामध्ये जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानांना सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. सकाळी ११ नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्हा सीमा बंद करण्यात आल्या आहेत. शहरांमध्ये ई पास असल्याशिवाय प्रवेश नाकारण्यात आला आहे.

बुलडाणा शहरात मात्र पाेलीस स्टेशनसमाेर काही तास तपासणी करण्यात येते. त्यानंतर दिवसभर व रात्री वाहनांचा मुक्त संचार सुरू असताे. त्यामुळे ई पास नावालाच, कुणीही यावे, टिकली मारून जावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

त्रिशरण चाैक

बुलडाणा शहरात खामगाव आणि चिखली मार्गाने प्रवेश केल्यानंतर त्रिशरण चाैक लागताे. या चाैकात पाेलीस, महसूल आणि नगर पालिकेचे कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, शहरात ई पास नसलेलेही मुक्तपणे संचार करीत असल्याचे चित्र आहे.

सर्क्युलर राेड

ग्रामीण भागातून चिखली मार्गाने शहरात आलेली खासगी वाहने आणि दुचाकीधारक सर्क्युलर राेडने शहरात प्रवेश करतात. ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणारी वाहने सकाळी ११ नंतरही दिवसभर सुरू असतात. याकडे पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत आहे.

मलकापूर राेड

मलकापूर रस्त्याने बुलडाणा शहरात प्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांवर कुठलीही कारवाई हाेत नसल्याचे चित्र आहे. त्यांच्याकडे ई पास आहे किंवा नाही याची पडताळणीच हाेत नसल्याने ग्रामस्थांचा शहरामध्ये मुक्त संचार वाढला आहे. त्यामुळे काेराेना रुग्ण वाढत आहेत.

कर्मचाऱ्यांची वानवा

पाेलिसांकडे मनुष्यबळ ताेकडे असल्याने सर्वच रस्त्यांवर बंदाेबस्त ठेवणे अशक्य असल्याचे चित्र आहे.

नगर पालिका आणि महसूलचे पथक अजूनही रस्त्यावर कारवाई करण्यासाठी उतरले नसल्याचे चित्र आहे. केवळ पाेलीस काही वेळासाठी वाहनांची तपासणी करीत असल्याचे चित्र आहे.

सकाळी ११ नंतर संचारबंदी लागू करण्यात येत असली तरी दिवसभर दुचाकी व इतर वाहनांचा मुक्त संचार असताे. बुलडाणा शहरात रुग्णसंख्या वाढत असली तरी गांभीर्य नसल्याचे चित्र आहे.