शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

ई पास नावालाच; कोणीही यावे, टिकली मारून जावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : राज्यभरात काेराेना संसर्ग वाढत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्हाबंदीही करण्यात आली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : राज्यभरात काेराेना संसर्ग वाढत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्हाबंदीही करण्यात आली असून, ई पास असल्याशिवाय शहरांमध्ये प्रवेश नाकारण्यात येत आहे. बुलडाणा शहरामध्ये केवळ शहर पाेलीस स्टेशनसमाेर काही तासच वाहनांची तपासणी करण्यात येते. त्यानंतर संचारबंदीतही वाहनांची दिवसभर वर्दळ सुरू असते.

जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी प्रशासनाने विविध निर्बंध लादले आहेत. त्यामध्ये जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानांना सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. सकाळी ११ नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्हा सीमा बंद करण्यात आल्या आहेत. शहरांमध्ये ई पास असल्याशिवाय प्रवेश नाकारण्यात आला आहे.

बुलडाणा शहरात मात्र पाेलीस स्टेशनसमाेर काही तास तपासणी करण्यात येते. त्यानंतर दिवसभर व रात्री वाहनांचा मुक्त संचार सुरू असताे. त्यामुळे ई पास नावालाच, कुणीही यावे, टिकली मारून जावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

त्रिशरण चाैक

बुलडाणा शहरात खामगाव आणि चिखली मार्गाने प्रवेश केल्यानंतर त्रिशरण चाैक लागताे. या चाैकात पाेलीस, महसूल आणि नगर पालिकेचे कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, शहरात ई पास नसलेलेही मुक्तपणे संचार करीत असल्याचे चित्र आहे.

सर्क्युलर राेड

ग्रामीण भागातून चिखली मार्गाने शहरात आलेली खासगी वाहने आणि दुचाकीधारक सर्क्युलर राेडने शहरात प्रवेश करतात. ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणारी वाहने सकाळी ११ नंतरही दिवसभर सुरू असतात. याकडे पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत आहे.

मलकापूर राेड

मलकापूर रस्त्याने बुलडाणा शहरात प्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांवर कुठलीही कारवाई हाेत नसल्याचे चित्र आहे. त्यांच्याकडे ई पास आहे किंवा नाही याची पडताळणीच हाेत नसल्याने ग्रामस्थांचा शहरामध्ये मुक्त संचार वाढला आहे. त्यामुळे काेराेना रुग्ण वाढत आहेत.

कर्मचाऱ्यांची वानवा

पाेलिसांकडे मनुष्यबळ ताेकडे असल्याने सर्वच रस्त्यांवर बंदाेबस्त ठेवणे अशक्य असल्याचे चित्र आहे.

नगर पालिका आणि महसूलचे पथक अजूनही रस्त्यावर कारवाई करण्यासाठी उतरले नसल्याचे चित्र आहे. केवळ पाेलीस काही वेळासाठी वाहनांची तपासणी करीत असल्याचे चित्र आहे.

सकाळी ११ नंतर संचारबंदी लागू करण्यात येत असली तरी दिवसभर दुचाकी व इतर वाहनांचा मुक्त संचार असताे. बुलडाणा शहरात रुग्णसंख्या वाढत असली तरी गांभीर्य नसल्याचे चित्र आहे.