शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

‘ई-नाम’ योजना कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:17 IST

शासनाच्या ई-नाम योजनेला प्रभावीपणे राबविण्याकरिता बाजार समिती  सज्जतेने प्रयत्नशील आहे; मात्र या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत गाव पातळीवर  प्रबोधन न झाल्याने त्याबाबत शेतकरी पूर्णत: अनभिज्ञ असून, व्यापारी व अड तेसुद्धा या योजनेपासून अद्यापावेतो अलिप्तच असल्याची बाब कृषी उत्पन्न बाजार  समितीत स्पष्ट झाली आहे.

ठळक मुद्देजनजागृतीचा विसर शेतकरी, व्यापारी, अडते अनभिज्ञ 

मनोज पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: शासनाच्या ई-नाम योजनेला प्रभावीपणे राबविण्याकरिता बाजार समिती  सज्जतेने प्रयत्नशील आहे; मात्र या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत गाव पातळीवर  प्रबोधन न झाल्याने त्याबाबत शेतकरी पूर्णत: अनभिज्ञ असून, व्यापारी व अड तेसुद्धा या योजनेपासून अद्यापावेतो अलिप्तच असल्याची बाब कृषी उत्पन्न बाजार  समितीत स्पष्ट झाली आहे.शेतमाल विक्री व्यवस्थेमध्ये अधिकाधिक पारदश्रीपणा यावा, शेतीमालाला चांगला  भाव मिळावा तसेच शेतमालाला ऑनलाइन लिलावाद्वारे राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध  व्हावी. या उद्देशाने केंद्र शासनाने ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार अर्थात ई-नाम ही  योजना बाजार समित्यांमार्फत राबविण्याचे धोरण अवलंबिले आहे. या योजनेंतर्गत  देशातील बाजार समित्यांमधील शेतमालाचे सौदे ऑनलाइन पद्धतीने काढण्यात  येणार आहेत. त्यासाठी शेतकरी आपला शेतीमाल ऑनलाइन पद्धतीवर दाखवून  त्यासाठी किंमत जाहीर करू शकेल त्यावर व्यापार्‍यांकडून बोली बोलून योग्य किंम त मिळाल्यानंतरच शेतकरी संबंधित व्यापाराला शेतीमाल विक्री करणार आहे,  अशी ई-नामची संकल्पना असून, ही योजना शेतकर्‍यांच्या हिताची आहे.महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत बाजार समितीत गेट इंट्री संगणीकृत, गेटवर शे तमालाची नोंदणी, शेतकर्‍याची नोंदणी उपक्रम राबविल्या जाणार आहे. या दृष्टीने  म्हणजेच ही योजना प्रभावीपणे राबविण्याकरिता मलकापूर कृषी उत्पन्न बाजार  समिती सज्ज असून, योजनेबाबत बाजार समितीचे मुख्य प्रशासक साहेबराव  पाटील व सचिव राधेश्याम शर्मा कर्मचार्‍यांना सवरेतोपरी सहकार्य करीत आहेत.  मार्गदर्शक सूचना करून सदर योजना प्रभावीपणे राबविल्या जावी म्हणून  प्रामाणिकपणे धडपडतही आहेत; मात्र केवळ गाव पातळीवर या योजनेसंदर्भात  प्रबोधन न झाल्याने शेतकरी वर्ग या योजनेबाबत अनभिज्ञ असून, व्यापारी व अड तेसुद्धा अलिप्तच आहे.त्यामुळे ही योजना कार्यान्वित होऊन दोन महिने उलटले तरी या योजनेला शेतकरी,  व्यापारी व अडत्यांकडून प्रतिसाद मिळणे दुर्लक्ष झाले आहे. प्रबोधनाअभावी या  काळात अद्यापपावेतो योजनेत सहभाग म्हणून एकाही शेतकर्‍याने स्वयंस्फूर्तीने  पुढाकार घेत नोंदणी केली नाही. त्यामुळे आता तातडीने याबाबत प्रबोधन करणे गरजेचे झाले आहे. तर कृषी पणन  मंडळ, पुणे यांच्यावतीने १३ मे १८ नोव्हेंबरदरम्यान नागपूर येथे पाच दिवसीय  प्रशिक्षण शिबिर असून, या शिबिरात योजनेबाबत प्रशिक्षण दिले जाणार असून,  त्याकरिता बाजार समितीमधील दोन कर्मचारी प्रतवारीकार म्हणून या शिवारात  प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग होणार आहेत. जेणेकरून योजना प्रभावीपणे  राबविण्यास गती मिळावी हाच त्या मागचा बाजार समितीचा उद्देश आहे. 

प्रबोधन शिबिराची गरज ई-नाम योजना अतिशय चांगली योजना असून, शेतकर्‍यांना चार पैसे मिळवून  देणारी आहे. त्यामुळे ही योजना शेतकरी वर्गात रुजविण्याकरिता शासनाने पणन  मंडळ, सहकार खाते, नाफेड व बाजार समित्यांमार्फत शेतकर्‍यांचे प्रबोधन व्हावे  यासाठी गाव पातळीवर प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्याची गरज निर्माण झाली  आहे.

शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत गुंतवणुकीने ई-नामचा इले क्ट्रॉनिक मंच तयार केला गेला आहे. हा मंच राज्यात असलेल्या कोणत्याही बाजार पेठेत ‘प्लग-ईन’ करू देतो. ई-नामने विकसित केलेले विशेष सॉफ्टवेअर प्रत्येक  बाजारपेठेत उपलब्ध आहे. जे राष्ट्रीय नेटवर्कला मोफत पण प्रत्येक राज्याच्या  बाजारपेठेच्या अधिनियमांतर्गत नियमानुसार आवश्यक अनुकूलतेसह जोडले  जाण्याचे मान्य करते.- प्रशांत तळोले, ई-नाम योजना प्रमुख, कृउबास, मलकापूर