शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

वनतळ्याऐवजी खोदले खड्डे : प्रादेशिक वनविभागाचा प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 14:24 IST

वरवट बकाल क्षेत्रात प्रादेशिक वनविभागाकडून वन तळ्यांऐवजी खड्डे खोदून ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 

- अझहर अलीलोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: राज्य शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला संग्रामपूर तालुक्यात भ्रष्टाचाराच्या वाळवीने पोखरल्याचे दिसते. तालुक्यातील वरवट बकाल क्षेत्रात प्रादेशिक वनविभागाकडून वन तळ्यांऐवजी खड्डे खोदून ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत सन २०१६-१७ मध्ये प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालय जळगाव जामोद अंतर्गत वरवट बकाल- भेंडवळ बीटमध्ये आस्वंद, कळमखेड, वरवट खंडेराव या तीन शिवारात वनतळे खोदण्यात आले.  मात्र, वनतळ्याचे काम पुर्णत्वास न नेल्याने या ठिकाणी खड्डेच आहेत. त्यामुळे शासन निधीचा ुदुरूपयोग होत असल्याचा आरोप शेतकºयांकडून करण्यात येत आहे.  या कामावर एकूण १४ लक्ष ३९ हजार ८४०  रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे या निधीचा दुरूपयोग झाल्याचे दिसून येते. तर वरवट बकाल क्षेत्रातील भेंडवळ बीट मधील आस्वंद कंपार्टमेंट नंबर ४३७ मध्ये एक वनतळे खोदण्यात आले. यावर दोन लक्ष ८७ हजार ९६८ रूपये खर्च करण्यात आले. तर  कळमखेड कंपार्टमेंट नंबर ४१३ येथे शेत तळे खोदण्यात आले.  तसेच वरवट खंडेराव येथेही ४३१ मध्येही दोन शेततळे करण्यात आले. तळ्यावर ६ लाख ७५ हजार ९३६ रुपयांचा खर्च करण्यात आला. शासन निधीचा गैरवापर करण्यात आल्याने याठिकाणी सद्यस्थितीत खड्डेच दिसून येत आहेत. त्यामुळे या वनतळ्यांचा शेती आणि वनप्राण्यांना काहीच उपयोग होताना दिसत नाही.  त्यामुळे लक्षावधी रूपयांचा खर्च तरी कशासाठी ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

सदर वनतळ्यांची कामे दोन वषार्पुर्वी झालेले असुन ते खड्डे नसुन वनतळेच आहे व तेथील सर्व कामे नियमाप्रमाणे करण्यात आलेले आहे. जलयुक्तशिवार अभियान अंतर्गत राज्याची कमेटी चार वेळा येऊन कामे बघुन गेली. खोदलेल्या वनतळ्यावरून दोन पावसाळे निघुन गेली असुन बरेच पाणी त्यामध्ये साचले होते.- एन एस कांबळेवनपरीक्षेत्र अधिकारी वन प्रादेशिक कार्यालय, जळगाव जा.

 

वनविभागाने वनतळयाऐवजी खड्डे खोदुन शासनाच्या महत्वकांक्षी योजनेत शासकीय निधीची लुट केली. या कामाची चौकशी करण्यात यावी- विनोद गाळकरजलदुत, वरवट खंडेराव

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावSangrampurसंग्रामपूर