शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

कडक निर्बंधांमुळे टरबूज शेतातच पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:35 IST

ओमप्रकाश देवकर मेहकर : कोरोना विषाणूचा प्रसार ग्रामीण भागात वाढत आहे. काेरोनाची साखळी ताेडण्यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. ...

ओमप्रकाश देवकर

मेहकर : कोरोना विषाणूचा प्रसार ग्रामीण भागात वाढत आहे. काेरोनाची साखळी ताेडण्यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. भाजीपाला, फळ विक्रीही बंद असल्याने शेतकऱ्यांच्या शेतात टरबूज, खरबूज पडून असल्याचे चित्र आहे तसेच काही शेतकऱ्यांना आपल्या शेतातील ठेमसे उकिरड्यावर फेकून द्यावी लागली.

काेराेना रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. जीवनाश्यक वस्तूंची दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले. तसेच भाजीपाला विक्री व फळ विक्रीही बंद असल्याने शेतमालाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात टरबूज, खरबुजासह भाजीपाल्याच्या पिकांची लागवड केली आहे. मात्र या पिकाच्या खरेदीसाठी ग्राहक व व्यापारी प्रतिसाद देत नसल्याने अनेक शेतकरी आपला माल शेतातच फेकून देत असल्याचे चित्र मेहकर तालुक्यात आहे. सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कायम आहे. याचा विपरीत परिणाम जनसामान्यांना जाणवत आहे. शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या खरबूज, टरबूज पिकाला भाव मिळत नसून व्यापारी फिरकत नसल्याचे चित्र आहे. एखाद्या वेळेस व्यापारी आले तरी खूपच कमी भावाने टरबुजाची मागणी करीत आहेत. जानेवारी महिन्यात लागवडीच्यावेळी कोरोना प्रादुर्भाव कमी असल्यामुळे या पिकाला चांगला नफा मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र फळ तोडणीच्या वेळेस कोरोनाची दुसरी लाट आल्याने शासनाला गतवर्षीप्रमाणे कडक निर्बंध लावावे लागले. अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली. तालुक्यातील टरबूज व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना व्यापारी भेटत नसल्याने लागवडीसाठी केलेला खर्च काढण्यासाठी या शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर बसून विक्री करावी लागत आहे. रस्त्यावर दुकाने लावल्यानंतर माल खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने टरबूज व भाजीपाला खराब होत आहे.

पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ

आर्थिक टंचाईच्या काळात शेतकऱ्यांनी उधार उसनवारीने पैसे गोळा करून मोठ्या आशेने टरबुजाची लागवड केली होती. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने मल्चिंग पेपर तसेच दर्जेदार बियाणाची लागवड करून ठिबक सिंचनाद्वारे पिकाची जोपासना केली. यासाठी एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च आला असून, व्यापारी येत असून तेही कमी भावाने मागणी करत आहेत. खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने सर्वच विक्री करताना मोठी अडचण निर्माण झाल्याने लावलेले भांडवली निघत नसल्याचे चित्र आहे. यामुळे या शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

मागील वर्षापासून काेराेनाचा फटका बसत असल्याने आर्थिक घडी विस्कटली आहे. यामुळे शेतामध्ये टरबूज, ढेमसे व इतर भाजीपाला पिकाची लागवड केली होती. मात्र प्रशासनाने पुन्हा कडक निर्बंध लावल्याने मालविक्री करण्याकरिता अडचण निर्माण होत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. दत्तात्रय इंगळे, शेतकरी, प्रिंप्री माळी