शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

कडक निर्बंधांमुळे टरबूज शेतातच पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:35 IST

ओमप्रकाश देवकर मेहकर : कोरोना विषाणूचा प्रसार ग्रामीण भागात वाढत आहे. काेरोनाची साखळी ताेडण्यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. ...

ओमप्रकाश देवकर

मेहकर : कोरोना विषाणूचा प्रसार ग्रामीण भागात वाढत आहे. काेरोनाची साखळी ताेडण्यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. भाजीपाला, फळ विक्रीही बंद असल्याने शेतकऱ्यांच्या शेतात टरबूज, खरबूज पडून असल्याचे चित्र आहे तसेच काही शेतकऱ्यांना आपल्या शेतातील ठेमसे उकिरड्यावर फेकून द्यावी लागली.

काेराेना रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. जीवनाश्यक वस्तूंची दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले. तसेच भाजीपाला विक्री व फळ विक्रीही बंद असल्याने शेतमालाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात टरबूज, खरबुजासह भाजीपाल्याच्या पिकांची लागवड केली आहे. मात्र या पिकाच्या खरेदीसाठी ग्राहक व व्यापारी प्रतिसाद देत नसल्याने अनेक शेतकरी आपला माल शेतातच फेकून देत असल्याचे चित्र मेहकर तालुक्यात आहे. सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कायम आहे. याचा विपरीत परिणाम जनसामान्यांना जाणवत आहे. शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या खरबूज, टरबूज पिकाला भाव मिळत नसून व्यापारी फिरकत नसल्याचे चित्र आहे. एखाद्या वेळेस व्यापारी आले तरी खूपच कमी भावाने टरबुजाची मागणी करीत आहेत. जानेवारी महिन्यात लागवडीच्यावेळी कोरोना प्रादुर्भाव कमी असल्यामुळे या पिकाला चांगला नफा मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र फळ तोडणीच्या वेळेस कोरोनाची दुसरी लाट आल्याने शासनाला गतवर्षीप्रमाणे कडक निर्बंध लावावे लागले. अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली. तालुक्यातील टरबूज व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना व्यापारी भेटत नसल्याने लागवडीसाठी केलेला खर्च काढण्यासाठी या शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर बसून विक्री करावी लागत आहे. रस्त्यावर दुकाने लावल्यानंतर माल खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने टरबूज व भाजीपाला खराब होत आहे.

पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ

आर्थिक टंचाईच्या काळात शेतकऱ्यांनी उधार उसनवारीने पैसे गोळा करून मोठ्या आशेने टरबुजाची लागवड केली होती. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने मल्चिंग पेपर तसेच दर्जेदार बियाणाची लागवड करून ठिबक सिंचनाद्वारे पिकाची जोपासना केली. यासाठी एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च आला असून, व्यापारी येत असून तेही कमी भावाने मागणी करत आहेत. खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने सर्वच विक्री करताना मोठी अडचण निर्माण झाल्याने लावलेले भांडवली निघत नसल्याचे चित्र आहे. यामुळे या शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

मागील वर्षापासून काेराेनाचा फटका बसत असल्याने आर्थिक घडी विस्कटली आहे. यामुळे शेतामध्ये टरबूज, ढेमसे व इतर भाजीपाला पिकाची लागवड केली होती. मात्र प्रशासनाने पुन्हा कडक निर्बंध लावल्याने मालविक्री करण्याकरिता अडचण निर्माण होत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. दत्तात्रय इंगळे, शेतकरी, प्रिंप्री माळी