शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

दुबार पेरणीचे संकट टळले!

By admin | Updated: June 29, 2017 00:08 IST

दोन दिवस झाला जोरदार पाऊस : पेरणीची गती वाढली!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात गत दोन दिवसांत जोरदार पाऊस झाल्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. तसेच पावसाने खंड दिल्याने खोळंबलेल्या पेरण्यांना गती आली आहे. जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. लवकरच मृगाचा पाऊस बरसेल व त्याचा पिकांना फायदा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे अत्यंत वेगाने पेरण्या करण्यात आल्या. मात्र, त्यानंतर पावसाने आठ दिवस दडी दिली. त्यामुळे पिके सुकायला आली होती. आणखी काही दिवस पाऊस झाला नसता, तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली असती. मात्र, सोमवार व मंगळवारी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. या पावसाचा पिकांना चांगलाच फायदा झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १८० मिमी पाऊस झाला आहे. यामध्ये घाटावर चांगला पाऊस झाला असून, घाटाखालील काही तालुक्यांमध्ये मात्र कमी पाऊस झाला आहे. मलकापूर तालुक्यात केवळ ९६ मिमी पाऊस झाला आहे, तर संग्रामपूर तालुक्यात ८५ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील पेरण्या रखडल्या आहेत. मलकापूर तालुक्यात केवळ ८९४५ हेक्टरवर पेरणी झाली आहे, तर संग्रामपूर तालुक्यात २४४८ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. घाटावरील बुलडाणा तालुक्यात २७५, चिखलीमध्ये २२३, जिल्ह्यात आतापर्यंत ५५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण ३ लाख ९९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीनची सर्वात जास्त पेरणी झाली असून, २ लाख २५ हजार ९९५ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. तुरीची पेरणी २८ हजार हेक्टरवर, तर मूग ९ हजार तसेच उडिदाची १२ हजार १३३ हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी लवकर पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पिकाकडे अधिक आहे. सोयाबीन सोबतच उडीद व मुगाची पेरणीही करण्यात येत आहे. कपाशीच्या पेरणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. कर्जमाफीच्या लाभासाठी बँकेच्या चकरा शासनाने कर्जमाफीची घोषणा करून पंधरा दिवस झाले, तरी अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी सध्या बँकेच्या चकरा मारत आहेत. अधिकारी अजूनही अध्यादेश आलाच नसल्याचे कारण सांगत आहेत.जिल्ह्यात झालेला पाऊस बुलडाणा : २७४चिखली : २२३ दे. राजा :१५५ सि. राजा : २०५लोणार : २२१मेहकर : २७६खामगाव : १२१.२शेगाव : १०२मलकापूर : ९६नांदुरा : २२८मोताळा : १८४ांग्रामपूर : ८५ज. जामोद : १६६