शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘स्व’पासून दुरावल्यानेच मनुष्याची जीवनात अधोगती! -  शकुंतला दीदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 18:43 IST

प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्राच्या शकुंतला दीदी यांच्याशी साधलेला संवाद... 

अनिल गवई।लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: आजच्या आधुनिक युगात प्रत्येकाच्या अपेक्षा आणि इच्छा वाढल्यात. त्यामुळे मनुष्याच्या आयुष्यात समाधान नाही. भौतिक सुख आणि स्पर्धांत्मक परिस्थितीमुळं मनुष्य स्वत:शीही वैरत्व पत्करत आहे. मात्र, अधात्मामुळे स्व:ची ओळख होते. तसेच अधात्म हेच सर्व विकार आणि वाईट गोष्टीपासून मुक्त करते.प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्राच्या शकुंतला दीदी यांच्याशी साधलेला संवाद... निकोप समाज निर्मितीसाठी काय करणे अपेक्षीत आहे? अपेक्षा आणि इच्छा वाढीस लागल्याने मनुष्य नैराश्य आणि तणावाकडे जात आहे. ही वस्तुस्थिती आहे. मात्र, प्रत्येकाने आपल्या जीवनात प्रेम...आदर आणि नि:स्वार्थ भावनेची देवाण-घेवाण केल्यास, निकोप समाजाची निर्मिती सहज शक्य आहे. आपल्या मते जगातील सर्वांत दु:खी व्यक्ती कोण?  मनुष्याला आपल्या जीवनात नानाविध दु:ख आहेत. आयुष्यभर वेगवेगळ्या दु:खामुळे मनुष्य व्यथीत राहतो. मनाच्या विपरीत घडलं की, साध्या साध्या गोष्टीने निराश होतो.  मनुष्याच्या आयुष्यात अनेक दु:ख असले तरी,  रिकामे ‘मन’असलेला व्यक्ती या जगात सर्वात दु:खी असल्याचे आपले प्रामाणिक मत आहे.सुख-समाधान प्राप्तीसाठी काय केलं पाहीजे? अंहकार मानवाचा सर्वातमोठा शत्रू आहे. शास्त्राने तर अंहकाराला दुराचारी कंसाची उपमा दिली आहे. सुख आणि समाधान प्राप्तीसाठी प्रत्येकाने आपल्या जीवनातील अंहकाररूपी कंसाला आपल्यापासून दूर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहीजे. सर्व विकारांना शत्रु मानण्यात येते. आपल्या अंगी असलेले विविध विकार हे शत्रु असले तरी, जीवनात माणसाचा कुणीही शत्रु नसला पाहीजे. विकारांचा त्याग केल्या मनुष्य सुखी आहे.चिंता आणि चिता या दोन्हीत केवळ एका अनुस्वाराचा फरक आहे. मात्र, दोघांचेही कार्य समान आहे. चिंता ही माणसाला जीवंतपणी, तर चिता ही मेल्यावर जाळत असते. चिंतेमुळे दु:खाची तीव्रता कितीतरी पटीने वाढत जाते. म्हणून, माणसाने आपल्या आयुष्यात चिंतेला दोन हात लांबच ठेवावे.

 समाजातील वाढत्या कलहास जबाबदार कोण?सद्भावना आणि शिवभावना नाहीशी झाल्यामुळे समाजात कलह वाढीस लागले आहेत. क्षणिक स्वार्थ आणि भौतिक सुखासाठी मनुष्य हपापल्यानेच घरांघरांमध्ये गृहक्लेश वाढीस लागलेत. मनुष्य स्व:तपासूनच दूर गेला असून तो भरकटत आहे. आदर्श बाजूला ठेवल्यानेच समाजात अनेक वाईट घटना घडताहेत. ‘पूत कपूत होते है; माता कुमाता नाही होती!’ मात्र, सद्यस्थितीत  स्वत:च्या स्वार्थासाठी अनेक ठिकाणी आई मुलाच्या जीवावर उठल्याचेही दिसून येते. ही बाब समाजासाठी घातक ठरतेय!

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखतkhamgaonखामगाव