शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

‘नाफेड’ च्या तूर खरेदीमुळे भाव घसरले!

By admin | Updated: February 12, 2016 02:07 IST

केंद्र शासनाच्या धोरणाचा शेतक-यांना फटका!

नवीन मोदे / धामणगाव बढे: केंद्र शासनाने तूर डाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजारातून नाफेड नॅशनल अग्रिकल्चर कॉपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून ३0 हजार टन तूर खरेदी करण्यास प्रारंभ केला. परिणाम होऊन १0 हजार रुपये क्विंटलपर्यंंत गेलेले तुरीचे भाव ७ हजार रुपये क्विंटलपर्यंंत घसरले, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. बाजारात दोनशे रुपये प्रतिकिलोपर्यंंत गेलेले तूर डाळीचा भाव नियंत्रणात आणण्यासाठी ऑक्टोबर २0१५ मध्ये केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने नाफेडच्या माध्यमातून देशभरातून शेतकर्‍यांकडून ३0 हजार टन तूर व १0 हजार टन उडीदाची सरळ खरेदी करण्याचा निर्णय घेतला, तर मध्यंतरी सात हजार टन तूर बाहेरुन आयात करण्यात आली. जानेवारीच्या शेवटच्या पंधरवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमधून नाफेडच्या माध्यमातून सरळ तूर खरेदी करण्यास प्रारंभ झाला. या सर्व व्यवहारात किमान आधारभूत किंमत ठरवून किंवा बाजारातील सुरुवातीच्या भावाने शासनाने तूर खरेदी केली असती, तर शेतकर्‍यांचे नुकसान झाले नसते. कारण शासनाने रोजच्या बाजारभावाप्रमाणे फक्त चांगली तूर खरेदी करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे व्यापार्‍यांनीसुद्धा शासनाच्या मोठय़ा प्रमाणात होणार्‍या तूर खरेदीचा धसका घेत अंग काढून घेतले. त्यामुळे डिसेंबर व जानेवारीच्या प्रारंभी दहा हजार रुपयांच्या वर गेलेला तुरीचा प्रतिक्विंटल दर फेब्रुवारीमध्ये ७ हजार रुपयांपर्यंंत घसरला आहे. केंद्रशासनाने बाजारातील सुरुवातीचा दर प्रतिक्विंटल किमान १0 हजार रुपये गृहित धरून त्याच भावाने तुरीची खरेदी केली असती, तर दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असता. बुलडाणा जिल्हय़ातील प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमधून नाफेडच्या माध्यमातून तर मोताळा तालुक्यात एका संस्थेच्या माध्यमातून शासनाची तूर खरेदी सुरू आहे. केंद्र शासनाद्वारे नाफेडच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या तूर खरेदीचा फायदा शेतकर्‍यांना होईल, अशी अपेक्षा प्रारंभी शेतकर्‍यांना होती, त्यामुळेच अनेक शेतकर्‍यांनी आपल्या गावात व भागात नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले; परंतु नाफेडच्या खरेदीमुळे नियंत्रित भावात येणारी घसरण यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.