शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

नियोजनाअभावी पाणीटंचाईचे चटके : प्रशासन ढिम्म!

By admin | Updated: May 26, 2017 01:25 IST

पाणीटंचाईमुळे मेहकर तालुक्यात दरवर्षी बळी जात आहे; मात्र संबंधित विभागाकडून पाणीटंचाईचा प्रयत्न गंभीरतेने घेतल्या जात नाही.

उद्धव फंगाळ । लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : उन्हाळ्यामध्ये दरवर्षी मेहकर तालुक्यात अनेक गावांमध्ये तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण होत आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी संबंधित विभागाकडून पाणीटंचाईचा कृती आराखडा दरवर्षी तयार करण्यात येतो; परंतु तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार प्रत्यक्षात कामे होताना दिसत नाही. नियोजनाअभावी मेहकर तालुक्यात पाणीटंचाईचे भयानक चित्र निर्माण होत असून, पाणीटंचाईमुळे मेहकर तालुक्यात दरवर्षी बळी जात आहे; मात्र संबंधित विभागाकडून पाणीटंचाईचा प्रयत्न गंभीरतेने घेतल्या जात नाही.मेहकर तालुक्यात जवळपास १४० गावे येतात. त्यापैकी जवळपास ८० ते ८५ गावात पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात येतो. या कृती आराखड्याला मंजुरात मिळाल्यानंतर त्यावर अंमलबजावणी सुरु होते; परंतु प्रत्यक्षात पाणी टंचाईचे नियोजन बरोबर नसल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे भयानक चित्र निर्माण होत आहे, तर मागील वर्षी पाणीटंचाईमुळे एका विद्यार्थ्याला आपले प्राण गमवावे लागले. तर यावर्षीसुद्धा एका महिलेला पाण्यामुळेच आपला जीव गमवावा लागला. अशा बिकट परिस्थितीत संबंधित विभागाचे अधिकारी ज्या गावात घटना घडली त्या गावात जाऊन केवळ औपचारिकता पूर्ण करून कागदोपत्री पाणीटंचाई निवारण्याचा अहवाल तयार करून वरिष्ठांना पाठवितात, तर वरिष्ठ अधिकारीसुद्धा कागदावरचा अहवाल पाहून घडत असलेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष करतात. अधिकाऱ्यांच्या या कागदी घोड्यांमध्ये मात्र ग्रामीण भागातील गोरगरीब जनता भरडल्या जात आहे. पाणीटंचाईवर मेहकर तालुक्यात दरवर्षी लाखो रुपये खर्च करण्यात येतात. पाणीटंचाईसाठी शासन लाखो रुपये देत असताना पाणीटंचाई निर्माण होते कशी, लाखो रुपये जातात कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकाऱ्यांच्या या वेळकाढू धोरणामुळे मात्र गरिबांचे दरवर्षी हाल होत आहेत.५९ गावात तीव्र पाणीटंचाईमेहकर तालुक्यात ५९ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, ४९ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत, तर ८ गावांमध्ये सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. पाणी टंचाईचे भयानक चित्र तालुक्यात पहायला मिळत असून, नियोजनाअभावी नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.पाणी टंचाईचे दोन वर्षात दोन बळीमेहकर तालुक्यात दरवर्षी तीव्र स्वरुपाची पाणी टंचाई निर्माण होत आहे. पाणी टंचाई निवारण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन उपाययोजना करण्यात येतात; मात्र स्थानिक विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाणीटंचाईचे भयानक चित्र तयार होत आहे, तर याच पाणीटंचाईमुळे २०१६ मध्ये दादुलगव्हाण येथील महेश देवानंद शेजुळ या १२ वर्षीय विद्यार्थ्याचा पाणी भरताना विहिरीत पडून मृत्यू झाला होता, तर यावर्षी २०१७ मध्ये पार्डी येथील सावित्री सहदेव होगे या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे सतत दोन वर्षात पाणीटंचाईमुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.कायम पाणीटंचाई निवारण योजना गायबगेल्या काही वर्षांपासून मेहकर तालुक्यात पाणीटंचाईची समस्या वाढतच आहे. त्यामुळे काही गावातील पाणी समस्या कायमची दूर करण्यासाठी अनेक गावांमध्ये महाजल, जलस्वराज राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात आल्या आहेत. या योजनांवर शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केला आहे; परंतु ज्या-ज्या गावात ही योजना राबविण्यात आली, त्या गावाची पाणी समस्या आज रोजी कायमच आहे. निकृष्ट व अर्धवट कामामुळे या योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे या योजनांची कामे करणारे ठेकेदार व संबंधित अधिकारी यांची चौकशी करुन कठोर कारवाईची गरज निर्माण झाली आहे.