शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आमखेड तलाव फुटल्याने ५ हजार हेक्टरवरील शेती खरडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST

या पावसामुळे प्रभावीत झालेल्या गावांतील शेतजमिनीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार अजितकुमार येळे यांनी दिले आहेत. मृग नक्षत्रात ...

या पावसामुळे प्रभावीत झालेल्या गावांतील शेतजमिनीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार अजितकुमार येळे यांनी दिले आहेत. मृग नक्षत्रात बरसलेल्या पावसाने नंतर उघडीप दिली होती. मात्र २८ जून रोजी पडलेल्या पावसामुळे अतिवृष्टीसदृश स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे गांगलगाव, आमखेड, अंबाशी, एकलारा, पाटोदा गावांतील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती खरडून गेली. अंबाशी, आमखेड, येवता, खैरव, एकलारा, पाटोदा गावांत पडलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे आमखेड पाझर तलावाची भिंत फुटल्याने जनजीवनही विस्कळीत झाले होते. दुसरीकडे कोराडी नदीला पूर आल्यामुळे अंबाशी गावातील बहुतांश नागरिकांच्या घरात पाणी शिरले. या नैसर्गिक प्रकोपातून शेतकऱ्यांच्या उभारणीकरिता शासनाने दुबार पेरणीकरिता खत, बियाणांसह मशागतीकरिता तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.

चिखली तालुक्यातील कोलारा, बेराळा, भालगाव, येवता, गांगलगाव, खैरव, आमखेड, एकलारा, तेल्हारा, काटोदा या गावांत अक्षरशः ढगफुटीसदृश चित्र होते. संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. आमखेड येथील तलाव फुटल्याने पेरणी झालेली शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली. गांगलगाव येथील नदी पातळी ओलांडून वाहत होती. नदी फुटल्यानेही अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. शेतात कमरेपर्यंत पाणी साचल्यामुळे दुबार पेरणीचे संकट या भागातील शेतकऱ्यांवर ओढवले आहे.

२८५६ शेतकऱ्यांचे नुकसान

या पावसामुळे आमखेड येथील ८५ शेतकऱ्यांचे २६ हेक्टरवरील नुकसान झाले. अंबाशीमधील ३५० शेतकऱ्यांचे २६० हेक्टर, रानअंत्रीत ११० जणांचे ८० हेक्टर, पिंपळवाडीतील ६ जणांचे ४ हेक्टर, दे.धनगर येथील ६ शेतकऱ्यांचे ८ हेक्टर, रोहडा येथील ९१० शेतकऱ्यांचे ७०० हेक्टर, गांगलगाव येथील ४२७ शेतकऱ्यांचे ३५० हेक्टर, शे. आटोळ येथील ६ शेतकऱ्यांचे ३.५० हेक्टर, पाटोदामधील २२० जणांचे ९८, एकलारामधील ६५५ जणांचे ४५० हेक्टर, तेल्हारा येथील ७० जणांचे २८ हेक्टर, चंदनपूर येथील एका शेतकऱ्याचे ०.५० हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले. या ११ गावांतील २८५६ शेतकऱ्यांची २००८ हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याची प्राथमिक माहिती तालुका प्रशासनाने दिली. आमखेड, अंबाशी, रानअंत्री, रोहडा येथील ७५ विहिरींचे मोठे नुकसान झालेले आहे. या पावसामुळे या भागातील सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि कापसाचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

तातडीने पंचनामे करा - महाले

या पावसामुळे शेतकऱ्यांची हजारो हेक्टरवरील शेतजमीन खरडून गेली आहे. त्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून, एकही शेतकरी यातून सुटता कामा नये, असे आदेश आ. श्वेता महाले यांनी तहसीलदार अजितकुमार येळे यांना दिले आहेत.

तातडीने पंचनामे करा

चिखली तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस पडल्यामुळे तसेच आमखेडचा तलाव फुटल्याने जमीन खरडली आहे. नेमके किती नुकसान झाले हे आताच सांगता येणार नाही. त्यामुळे तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करावेत, असे आदेश तहसीलदार अजितकुमार येळे यांनी दिले आहेत.

तात्काळ आर्थिक मदत द्या

२८ जून रोजी पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक प्रकोपातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने दुबार पेरणीकरिता खते, बियाणांसह मशागतीकरिता तात्काळ आर्थिक मदत करावी. शासनाने शेतकऱ्यांना या अडचणीत वेळेत शक्य तेवढी मदत करून दिलासा देणे आवश्यक असल्याचे जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा माजी आ. राहुल बोंद्रे यांनी स्पष्ट केले आहे.