शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

आमखेड तलाव फुटल्याने ५ हजार हेक्टरवरील शेती खरडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST

या पावसामुळे प्रभावीत झालेल्या गावांतील शेतजमिनीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार अजितकुमार येळे यांनी दिले आहेत. मृग नक्षत्रात ...

या पावसामुळे प्रभावीत झालेल्या गावांतील शेतजमिनीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार अजितकुमार येळे यांनी दिले आहेत. मृग नक्षत्रात बरसलेल्या पावसाने नंतर उघडीप दिली होती. मात्र २८ जून रोजी पडलेल्या पावसामुळे अतिवृष्टीसदृश स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे गांगलगाव, आमखेड, अंबाशी, एकलारा, पाटोदा गावांतील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती खरडून गेली. अंबाशी, आमखेड, येवता, खैरव, एकलारा, पाटोदा गावांत पडलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे आमखेड पाझर तलावाची भिंत फुटल्याने जनजीवनही विस्कळीत झाले होते. दुसरीकडे कोराडी नदीला पूर आल्यामुळे अंबाशी गावातील बहुतांश नागरिकांच्या घरात पाणी शिरले. या नैसर्गिक प्रकोपातून शेतकऱ्यांच्या उभारणीकरिता शासनाने दुबार पेरणीकरिता खत, बियाणांसह मशागतीकरिता तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.

चिखली तालुक्यातील कोलारा, बेराळा, भालगाव, येवता, गांगलगाव, खैरव, आमखेड, एकलारा, तेल्हारा, काटोदा या गावांत अक्षरशः ढगफुटीसदृश चित्र होते. संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. आमखेड येथील तलाव फुटल्याने पेरणी झालेली शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली. गांगलगाव येथील नदी पातळी ओलांडून वाहत होती. नदी फुटल्यानेही अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. शेतात कमरेपर्यंत पाणी साचल्यामुळे दुबार पेरणीचे संकट या भागातील शेतकऱ्यांवर ओढवले आहे.

२८५६ शेतकऱ्यांचे नुकसान

या पावसामुळे आमखेड येथील ८५ शेतकऱ्यांचे २६ हेक्टरवरील नुकसान झाले. अंबाशीमधील ३५० शेतकऱ्यांचे २६० हेक्टर, रानअंत्रीत ११० जणांचे ८० हेक्टर, पिंपळवाडीतील ६ जणांचे ४ हेक्टर, दे.धनगर येथील ६ शेतकऱ्यांचे ८ हेक्टर, रोहडा येथील ९१० शेतकऱ्यांचे ७०० हेक्टर, गांगलगाव येथील ४२७ शेतकऱ्यांचे ३५० हेक्टर, शे. आटोळ येथील ६ शेतकऱ्यांचे ३.५० हेक्टर, पाटोदामधील २२० जणांचे ९८, एकलारामधील ६५५ जणांचे ४५० हेक्टर, तेल्हारा येथील ७० जणांचे २८ हेक्टर, चंदनपूर येथील एका शेतकऱ्याचे ०.५० हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले. या ११ गावांतील २८५६ शेतकऱ्यांची २००८ हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याची प्राथमिक माहिती तालुका प्रशासनाने दिली. आमखेड, अंबाशी, रानअंत्री, रोहडा येथील ७५ विहिरींचे मोठे नुकसान झालेले आहे. या पावसामुळे या भागातील सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि कापसाचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

तातडीने पंचनामे करा - महाले

या पावसामुळे शेतकऱ्यांची हजारो हेक्टरवरील शेतजमीन खरडून गेली आहे. त्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून, एकही शेतकरी यातून सुटता कामा नये, असे आदेश आ. श्वेता महाले यांनी तहसीलदार अजितकुमार येळे यांना दिले आहेत.

तातडीने पंचनामे करा

चिखली तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस पडल्यामुळे तसेच आमखेडचा तलाव फुटल्याने जमीन खरडली आहे. नेमके किती नुकसान झाले हे आताच सांगता येणार नाही. त्यामुळे तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करावेत, असे आदेश तहसीलदार अजितकुमार येळे यांनी दिले आहेत.

तात्काळ आर्थिक मदत द्या

२८ जून रोजी पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक प्रकोपातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने दुबार पेरणीकरिता खते, बियाणांसह मशागतीकरिता तात्काळ आर्थिक मदत करावी. शासनाने शेतकऱ्यांना या अडचणीत वेळेत शक्य तेवढी मदत करून दिलासा देणे आवश्यक असल्याचे जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा माजी आ. राहुल बोंद्रे यांनी स्पष्ट केले आहे.