शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

आमखेड तलाव फुटल्याने ५ हजार हेक्टरवरील शेती खरडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST

या पावसामुळे प्रभावीत झालेल्या गावांतील शेतजमिनीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार अजितकुमार येळे यांनी दिले आहेत. मृग नक्षत्रात ...

या पावसामुळे प्रभावीत झालेल्या गावांतील शेतजमिनीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार अजितकुमार येळे यांनी दिले आहेत. मृग नक्षत्रात बरसलेल्या पावसाने नंतर उघडीप दिली होती. मात्र २८ जून रोजी पडलेल्या पावसामुळे अतिवृष्टीसदृश स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे गांगलगाव, आमखेड, अंबाशी, एकलारा, पाटोदा गावांतील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती खरडून गेली. अंबाशी, आमखेड, येवता, खैरव, एकलारा, पाटोदा गावांत पडलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे आमखेड पाझर तलावाची भिंत फुटल्याने जनजीवनही विस्कळीत झाले होते. दुसरीकडे कोराडी नदीला पूर आल्यामुळे अंबाशी गावातील बहुतांश नागरिकांच्या घरात पाणी शिरले. या नैसर्गिक प्रकोपातून शेतकऱ्यांच्या उभारणीकरिता शासनाने दुबार पेरणीकरिता खत, बियाणांसह मशागतीकरिता तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.

चिखली तालुक्यातील कोलारा, बेराळा, भालगाव, येवता, गांगलगाव, खैरव, आमखेड, एकलारा, तेल्हारा, काटोदा या गावांत अक्षरशः ढगफुटीसदृश चित्र होते. संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. आमखेड येथील तलाव फुटल्याने पेरणी झालेली शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली. गांगलगाव येथील नदी पातळी ओलांडून वाहत होती. नदी फुटल्यानेही अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. शेतात कमरेपर्यंत पाणी साचल्यामुळे दुबार पेरणीचे संकट या भागातील शेतकऱ्यांवर ओढवले आहे.

२८५६ शेतकऱ्यांचे नुकसान

या पावसामुळे आमखेड येथील ८५ शेतकऱ्यांचे २६ हेक्टरवरील नुकसान झाले. अंबाशीमधील ३५० शेतकऱ्यांचे २६० हेक्टर, रानअंत्रीत ११० जणांचे ८० हेक्टर, पिंपळवाडीतील ६ जणांचे ४ हेक्टर, दे.धनगर येथील ६ शेतकऱ्यांचे ८ हेक्टर, रोहडा येथील ९१० शेतकऱ्यांचे ७०० हेक्टर, गांगलगाव येथील ४२७ शेतकऱ्यांचे ३५० हेक्टर, शे. आटोळ येथील ६ शेतकऱ्यांचे ३.५० हेक्टर, पाटोदामधील २२० जणांचे ९८, एकलारामधील ६५५ जणांचे ४५० हेक्टर, तेल्हारा येथील ७० जणांचे २८ हेक्टर, चंदनपूर येथील एका शेतकऱ्याचे ०.५० हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले. या ११ गावांतील २८५६ शेतकऱ्यांची २००८ हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याची प्राथमिक माहिती तालुका प्रशासनाने दिली. आमखेड, अंबाशी, रानअंत्री, रोहडा येथील ७५ विहिरींचे मोठे नुकसान झालेले आहे. या पावसामुळे या भागातील सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि कापसाचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

तातडीने पंचनामे करा - महाले

या पावसामुळे शेतकऱ्यांची हजारो हेक्टरवरील शेतजमीन खरडून गेली आहे. त्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून, एकही शेतकरी यातून सुटता कामा नये, असे आदेश आ. श्वेता महाले यांनी तहसीलदार अजितकुमार येळे यांना दिले आहेत.

तातडीने पंचनामे करा

चिखली तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस पडल्यामुळे तसेच आमखेडचा तलाव फुटल्याने जमीन खरडली आहे. नेमके किती नुकसान झाले हे आताच सांगता येणार नाही. त्यामुळे तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करावेत, असे आदेश तहसीलदार अजितकुमार येळे यांनी दिले आहेत.

तात्काळ आर्थिक मदत द्या

२८ जून रोजी पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक प्रकोपातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने दुबार पेरणीकरिता खते, बियाणांसह मशागतीकरिता तात्काळ आर्थिक मदत करावी. शासनाने शेतकऱ्यांना या अडचणीत वेळेत शक्य तेवढी मदत करून दिलासा देणे आवश्यक असल्याचे जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा माजी आ. राहुल बोंद्रे यांनी स्पष्ट केले आहे.