शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

दुबार पेरणीचे सावट!

By admin | Updated: June 16, 2014 00:49 IST

वीज खांब कोसळल्याने गेल्या पाच दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे.

सोनाळा : परिसरात झालेल्या वादळामुळे वीज खांब कोसळल्याने गेल्या पाच दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे सुमारे ४३५ हेक्टर बागायती क्षेत्रावर लागवड केलेल्या कपाशीच्या पिकाला पाणी देता येत नसल्याने अंकूर कोमेजत असून दुबार पेरणीचे सावट निर्माण झाले आहे.

त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सोनाळा व परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे दीड तास सोसाट्याच्या वार्‍यासह वादळ झाले. या वादळी पावसामुळे शेकडो हेक्टरवरील झाडे कोळमडून पडली. तसेच विजेचे खांब व त्यावरील तार तुटल्याने सोनाळा भाग १ व २, पिंगळी जहांगीर, बोरखेड शिवारातील शेती पंपाला होणारा विद्युत पुरवठा बंद झाल्याने चारशे पासष्ठ हेक्टर बागायती शेती प्रभावीत झाले आहे. पेरलेल्या कपाशीच्या बिजवाईचे अंकुर कोमेजण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. नैसर्गिक वातावरणातील पावसावर अवलंबून न राहता व कपाशीचे भरघोस घेण्याकरिता दरवर्षी सोनाळा परिसरातील सोनाळा, सायखेड, पिंगळी, सगोडा, बोरखेड, बावनबीर शिवारातील शेतकरी वर्ग मृग नक्षत्रात बागायती कपाशीची पेरणी करतात. यावर्षी ही परिसरातील शेतकर्‍यांनी मृगनक्षत्रात चारशे पासष्ठ हेक्टर बागायती क्षेत्रावर पेरणी केली आहे. यामध्ये काही शेतकर्‍यांच्या बागायती मधील कपाशी बिजवाई जमिनीवर निघाली तर काहीने अंकुर बाहेर काढले आहेत. ११ जून रोजी वादळाने थैमान घातले होते. परिसरातील शेतातील खांब तुटले तर काहीचे तारही तुटून पडले आहेत. यामुळे शेतातील वीजपुरवठा खंडित झाल्याने बागायती कपाशीला पाणी देणे बंद केले आहे. गेली चार दिवस उलटून गेली आहेत तरीही वीज वितरण कंपनीने विद्युत पुरवठा सुरु केला नाही. वादळी पावसाचा काही प्रमाणात जमिनीत ओलावा टिकून आहे तर वरुन सूर्यप्रकाश आग ओकत असल्याने पेरलेल्या बागायती कपाशीच्या बिजवाईचे तीन-तेरा वाजत असल्याचे चित्र सर्वदूर परिसरात आहे. बर्‍याच शेतकरीवर्गाने महागाईची बिजवाई पेरलेली असल्याने चांगले उत्पादन घेण्याची स्वप्ने धुळीत मिळत आहेत.