शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसामुळे मलेरियाचे रूग्ण वाढणार!

By admin | Updated: August 4, 2016 01:08 IST

सहा महिन्यांत मलेरियाचे १६ रूग्ण आढळले; २ लाख ११ हजार रक्त नमुन्यांची तपासणी.

हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. ३ : जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, अनेक ठिकाणी डबके साचून पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे जलजन्य आजार मोठय़ा प्रमाणात वाढले असून, रुग्णालयात तापेच्या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यात मलेरियाचे रुग्ण असल्याचा संशय व्यक्त होत आहे.बुलडाणा जिल्ह्यात सन २0१४ मध्ये २0८ रुग्ण होते, तर २0१५ मध्ये १३४ रुग्ण आढळून आले होते. यावर्षी मागील ६ महिन्यांत १६ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या व्यापक जनजागृती आणि लोकांचा प्रतिसाद यामुळे ही रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचून पाण्याची दुर्गंंधी पसरली आहे. ग्रामीण भागातही सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे तापेचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात वाढले असून खासगीसह प्राथमिक व जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयात मागील सहा महिन्यांत तपासणीसाठी रक्त नमुने कमी आले असले, तरी या महिन्यात मोठय़ा प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे मलेरियाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात यावर्षी मागील सहा महिन्यांत २ लाख १0 हजार ७९४ रक्त नमुने गोळा करून तपासणी करण्यात आली. त्यात जानेवारी महिन्यात ३४ हजार ९७९, फेब्रुवारी ३८ हजार ९0९, मार्च ३७ हजार ६१४, एप्रिल ३0 हजार ५0८, मे ३१ हजार ३३६, जून ३७ हजार ४५१ रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी तपासणी नमुन्यात १६ मलेरियाचे रुग्ण आढळले होते. त्यांची विशेष काळजी घेऊन उपचार करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत मलेरियामुळे एकही मृत्यूची घटना घडली नाही. डेंग्यू, चिकन गुनियाचा एकही रुग्ण नाही!सन २0१६ मध्ये मागील सहा महिन्यांत पाच रुग्णांचे रक्तजल नमुने घेऊन तपासणी करण्यासाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. त्यात एकही रुग्ण डेंग्यू किंवा चिकन गुनियाचा आढळून आला नाही. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत एकही मृत्यूची घटना घडली नाही.