शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

संततधार पावसामुळे मलेरियाचे रूग्ण वाढणार!

By admin | Updated: August 4, 2016 01:08 IST

सहा महिन्यांत मलेरियाचे १६ रूग्ण आढळले; २ लाख ११ हजार रक्त नमुन्यांची तपासणी.

हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. ३ : जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, अनेक ठिकाणी डबके साचून पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे जलजन्य आजार मोठय़ा प्रमाणात वाढले असून, रुग्णालयात तापेच्या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यात मलेरियाचे रुग्ण असल्याचा संशय व्यक्त होत आहे.बुलडाणा जिल्ह्यात सन २0१४ मध्ये २0८ रुग्ण होते, तर २0१५ मध्ये १३४ रुग्ण आढळून आले होते. यावर्षी मागील ६ महिन्यांत १६ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या व्यापक जनजागृती आणि लोकांचा प्रतिसाद यामुळे ही रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचून पाण्याची दुर्गंंधी पसरली आहे. ग्रामीण भागातही सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे तापेचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात वाढले असून खासगीसह प्राथमिक व जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयात मागील सहा महिन्यांत तपासणीसाठी रक्त नमुने कमी आले असले, तरी या महिन्यात मोठय़ा प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे मलेरियाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात यावर्षी मागील सहा महिन्यांत २ लाख १0 हजार ७९४ रक्त नमुने गोळा करून तपासणी करण्यात आली. त्यात जानेवारी महिन्यात ३४ हजार ९७९, फेब्रुवारी ३८ हजार ९0९, मार्च ३७ हजार ६१४, एप्रिल ३0 हजार ५0८, मे ३१ हजार ३३६, जून ३७ हजार ४५१ रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी तपासणी नमुन्यात १६ मलेरियाचे रुग्ण आढळले होते. त्यांची विशेष काळजी घेऊन उपचार करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत मलेरियामुळे एकही मृत्यूची घटना घडली नाही. डेंग्यू, चिकन गुनियाचा एकही रुग्ण नाही!सन २0१६ मध्ये मागील सहा महिन्यांत पाच रुग्णांचे रक्तजल नमुने घेऊन तपासणी करण्यासाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. त्यात एकही रुग्ण डेंग्यू किंवा चिकन गुनियाचा आढळून आला नाही. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत एकही मृत्यूची घटना घडली नाही.