शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी जळगाव जामोद तालुक्यातील ४२ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 14:46 IST

जळगाव जामोद :  गत दहा दिवसापासून जळगाव जामोद तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. परिणामी तालुक्यातील ४१ हजार ८०० हेक्टरवरील पीके धोक्यात आली असून यावर्षी सुध्दा फटका बसणार काय, या चिंतेने तालुक्यात वातावरण गंभीर बनले आहे.

ठळक मुद्देयावर्षी तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने नदी-नाले कोरडे ठण्ण आहेत.आसलगाव, पिंपळगाव काळे व वडशिंगी या सर्कलमध्ये पाऊस कमी असल्याने या भागातील पीके अगदी लहान आहे. जळगाव व जामोद या सर्कलमध्ये थोडा जास्त पाऊस असल्याने या परिसरातील सोयाबीनला फुलोरा आला आहे.

- नानासाहेब कांडलकरलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद :  गत दहा दिवसापासून जळगाव जामोद तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. परिणामी तालुक्यातील ४१ हजार ८०० हेक्टरवरील पीके धोक्यात आली असून यावर्षी सुध्दा फटका बसणार काय, या चिंतेने तालुक्यात वातावरण गंभीर बनले आहे. यावर्षी तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने नदी-नाले कोरडे ठण्ण आहेत.मागीलवर्षी कमी पावसाने कापूस, सोयाबीन या मुख्य पिकांना धक्का बसला. कपाशीवर शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली. यावर्षी तरी वेळेवर पाऊस येईल अशी अपेक्षा होती. परंतु जळगाव तालुक्यात तब्बल २५ दिवस पाऊस उशीरा आला. त्यामुळे शेतकºयांना जुनच्या शेवटी व जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी लागली. उशीरा पेरणी झाल्याने पीकेही अगदी लहान आहेत. त्यात गत दहा दिवसापासून पाऊस नसल्याने काही शेतातील पिके सुकु लागली आहे. शेतकरी हा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.उत्पादनात घट होण्याची शक्यतातालुक्यात सर्व सर्कलमध्ये सारखा पाऊस नाही. आसलगाव, पिंपळगाव काळे व वडशिंगी या सर्कलमध्ये पाऊस कमी असल्याने या भागातील पीके अगदी लहान आहे. तर जळगाव व जामोद या सर्कलमध्ये थोडा जास्त पाऊस असल्याने या परिसरातील सोयाबीनला फुलोरा आला आहे. तर कपाशी पात्यावर येत आहे. या पृष्ठभुमीवर जर दोन-तीन दिवसात वरूणराजाची कृपा झाली नाही तर उत्पादनात मोठी घट होवून शेतकरी हा आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.पावसाचे प्रमाण गत पाच वर्षापेक्षाही कमीमागीलवर्षी ७ आॅगस्टपर्यंत तालुक्यात सरासरी पाऊस ३५१ मिमी झाला होता. यावर्षी मात्र आजतागायत फक्त २६३.७० मिमी पाऊस झाला आहे. गत २०१६ मध्ये याच तारखेपर्यंत ४५६ मिमी पाऊस झाला होता. तर सन २०१५ मध्ये ७ आॅगस्टपर्यंत ४७० मिमी पावसाची नोंद झाली होती. सन २०१४ मध्ये याच तारखेपर्यंत कोटी ३६१ मिमी पाऊस झाला होता. तर सन २०१३ मध्ये पावसाचे सर्व रेकार्ड तोडत ७ आॅगस्टपर्यंत ९११ मिमी पावसाची नोंद झाली होती. याचाच अर्थ असा की मागील पाच वर्षाचा आढावा घेतला तरी यावर्षी आजतागायत फक्त निम्मे पाऊस झाला आहे. या परिस्थितीवर कशी मात करावी, असा यक्ष प्रष्न शेतकºयांसमोर उभा आहे.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदagricultureशेती