शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

पावसाअभावी जळगाव जामोद तालुक्यातील ४२ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 14:46 IST

जळगाव जामोद :  गत दहा दिवसापासून जळगाव जामोद तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. परिणामी तालुक्यातील ४१ हजार ८०० हेक्टरवरील पीके धोक्यात आली असून यावर्षी सुध्दा फटका बसणार काय, या चिंतेने तालुक्यात वातावरण गंभीर बनले आहे.

ठळक मुद्देयावर्षी तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने नदी-नाले कोरडे ठण्ण आहेत.आसलगाव, पिंपळगाव काळे व वडशिंगी या सर्कलमध्ये पाऊस कमी असल्याने या भागातील पीके अगदी लहान आहे. जळगाव व जामोद या सर्कलमध्ये थोडा जास्त पाऊस असल्याने या परिसरातील सोयाबीनला फुलोरा आला आहे.

- नानासाहेब कांडलकरलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद :  गत दहा दिवसापासून जळगाव जामोद तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. परिणामी तालुक्यातील ४१ हजार ८०० हेक्टरवरील पीके धोक्यात आली असून यावर्षी सुध्दा फटका बसणार काय, या चिंतेने तालुक्यात वातावरण गंभीर बनले आहे. यावर्षी तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने नदी-नाले कोरडे ठण्ण आहेत.मागीलवर्षी कमी पावसाने कापूस, सोयाबीन या मुख्य पिकांना धक्का बसला. कपाशीवर शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली. यावर्षी तरी वेळेवर पाऊस येईल अशी अपेक्षा होती. परंतु जळगाव तालुक्यात तब्बल २५ दिवस पाऊस उशीरा आला. त्यामुळे शेतकºयांना जुनच्या शेवटी व जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी लागली. उशीरा पेरणी झाल्याने पीकेही अगदी लहान आहेत. त्यात गत दहा दिवसापासून पाऊस नसल्याने काही शेतातील पिके सुकु लागली आहे. शेतकरी हा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.उत्पादनात घट होण्याची शक्यतातालुक्यात सर्व सर्कलमध्ये सारखा पाऊस नाही. आसलगाव, पिंपळगाव काळे व वडशिंगी या सर्कलमध्ये पाऊस कमी असल्याने या भागातील पीके अगदी लहान आहे. तर जळगाव व जामोद या सर्कलमध्ये थोडा जास्त पाऊस असल्याने या परिसरातील सोयाबीनला फुलोरा आला आहे. तर कपाशी पात्यावर येत आहे. या पृष्ठभुमीवर जर दोन-तीन दिवसात वरूणराजाची कृपा झाली नाही तर उत्पादनात मोठी घट होवून शेतकरी हा आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.पावसाचे प्रमाण गत पाच वर्षापेक्षाही कमीमागीलवर्षी ७ आॅगस्टपर्यंत तालुक्यात सरासरी पाऊस ३५१ मिमी झाला होता. यावर्षी मात्र आजतागायत फक्त २६३.७० मिमी पाऊस झाला आहे. गत २०१६ मध्ये याच तारखेपर्यंत ४५६ मिमी पाऊस झाला होता. तर सन २०१५ मध्ये ७ आॅगस्टपर्यंत ४७० मिमी पावसाची नोंद झाली होती. सन २०१४ मध्ये याच तारखेपर्यंत कोटी ३६१ मिमी पाऊस झाला होता. तर सन २०१३ मध्ये पावसाचे सर्व रेकार्ड तोडत ७ आॅगस्टपर्यंत ९११ मिमी पावसाची नोंद झाली होती. याचाच अर्थ असा की मागील पाच वर्षाचा आढावा घेतला तरी यावर्षी आजतागायत फक्त निम्मे पाऊस झाला आहे. या परिस्थितीवर कशी मात करावी, असा यक्ष प्रष्न शेतकºयांसमोर उभा आहे.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदagricultureशेती