शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी जळगाव जामोद तालुक्यातील ४२ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 14:46 IST

जळगाव जामोद :  गत दहा दिवसापासून जळगाव जामोद तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. परिणामी तालुक्यातील ४१ हजार ८०० हेक्टरवरील पीके धोक्यात आली असून यावर्षी सुध्दा फटका बसणार काय, या चिंतेने तालुक्यात वातावरण गंभीर बनले आहे.

ठळक मुद्देयावर्षी तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने नदी-नाले कोरडे ठण्ण आहेत.आसलगाव, पिंपळगाव काळे व वडशिंगी या सर्कलमध्ये पाऊस कमी असल्याने या भागातील पीके अगदी लहान आहे. जळगाव व जामोद या सर्कलमध्ये थोडा जास्त पाऊस असल्याने या परिसरातील सोयाबीनला फुलोरा आला आहे.

- नानासाहेब कांडलकरलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद :  गत दहा दिवसापासून जळगाव जामोद तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. परिणामी तालुक्यातील ४१ हजार ८०० हेक्टरवरील पीके धोक्यात आली असून यावर्षी सुध्दा फटका बसणार काय, या चिंतेने तालुक्यात वातावरण गंभीर बनले आहे. यावर्षी तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने नदी-नाले कोरडे ठण्ण आहेत.मागीलवर्षी कमी पावसाने कापूस, सोयाबीन या मुख्य पिकांना धक्का बसला. कपाशीवर शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली. यावर्षी तरी वेळेवर पाऊस येईल अशी अपेक्षा होती. परंतु जळगाव तालुक्यात तब्बल २५ दिवस पाऊस उशीरा आला. त्यामुळे शेतकºयांना जुनच्या शेवटी व जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी लागली. उशीरा पेरणी झाल्याने पीकेही अगदी लहान आहेत. त्यात गत दहा दिवसापासून पाऊस नसल्याने काही शेतातील पिके सुकु लागली आहे. शेतकरी हा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.उत्पादनात घट होण्याची शक्यतातालुक्यात सर्व सर्कलमध्ये सारखा पाऊस नाही. आसलगाव, पिंपळगाव काळे व वडशिंगी या सर्कलमध्ये पाऊस कमी असल्याने या भागातील पीके अगदी लहान आहे. तर जळगाव व जामोद या सर्कलमध्ये थोडा जास्त पाऊस असल्याने या परिसरातील सोयाबीनला फुलोरा आला आहे. तर कपाशी पात्यावर येत आहे. या पृष्ठभुमीवर जर दोन-तीन दिवसात वरूणराजाची कृपा झाली नाही तर उत्पादनात मोठी घट होवून शेतकरी हा आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.पावसाचे प्रमाण गत पाच वर्षापेक्षाही कमीमागीलवर्षी ७ आॅगस्टपर्यंत तालुक्यात सरासरी पाऊस ३५१ मिमी झाला होता. यावर्षी मात्र आजतागायत फक्त २६३.७० मिमी पाऊस झाला आहे. गत २०१६ मध्ये याच तारखेपर्यंत ४५६ मिमी पाऊस झाला होता. तर सन २०१५ मध्ये ७ आॅगस्टपर्यंत ४७० मिमी पावसाची नोंद झाली होती. सन २०१४ मध्ये याच तारखेपर्यंत कोटी ३६१ मिमी पाऊस झाला होता. तर सन २०१३ मध्ये पावसाचे सर्व रेकार्ड तोडत ७ आॅगस्टपर्यंत ९११ मिमी पावसाची नोंद झाली होती. याचाच अर्थ असा की मागील पाच वर्षाचा आढावा घेतला तरी यावर्षी आजतागायत फक्त निम्मे पाऊस झाला आहे. या परिस्थितीवर कशी मात करावी, असा यक्ष प्रष्न शेतकºयांसमोर उभा आहे.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदagricultureशेती