शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचे संकट सुलतानी - देसरडा

By admin | Updated: February 25, 2016 01:47 IST

दुष्काळ निवारण मंडळ; चुकीच्या धोरणांमुळे शेती धोक्यात आल्याचा आरोप.

बुलडाणा : राज्यात सध्या दुष्काळाचे संकट घोंगावत असून, संकटाचे मूळ हे अस्मानी कमी अन् सुलतानी जास्त आहे. सर्वच राज्यकर्त्यांनी चुकीची शेतधोरणे राबविल्याने शेती धोक्यात आली असून, आता जलयुक्त शिवाराच्या नावाखाली पुन्हा एकदा धूळफेक चालविली असल्याचा आरोप दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष प्रख्यात अर्थतज्ज्ञ एच.एम.देसरडा यांनी केला. दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या संवाद यात्रेच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रा.देसरडा म्हणाले की, महात्मा फुले जल-भूमी अभीयानाचे नाव बदलून जलयुक्त शिवार ठेवण्यात आले आहे. हे अभियान म्हणजे शुद्ध धूळफेक असून, नदी खोलीकरणाच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने जलसंधारणाची कामे केली जात आहेत. मुळातच राज्यकर्त्यांनी शेतीच्या धोरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच शेती अडचणीत आली असून, शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. येणार्‍या काळात दुष्काळ निवारण्यासाठी कोट्यवधीचा निधी खर्च होईल. या निधीमधून मिळणारे कमिशन खाणारी जमात मात्र गब्बर होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. या संवाद यात्रेतून दुष्काळाची कारणे, उपाययोजना, प्रबोधन अशा स्वरूपात प्रत्येक जिल्ह्यात काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेला कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार, प्राचार्य डॉ.अंभोरे उपस्थित होते. पत्रकार परिषदेच्या आधी प्रा.देसरडा यांनी जिजामाता महाविद्यालयात शेतकरी व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. ही संवाद यात्रा बुलडाण्यावरून चिखलीकडे रवाना झाली.