शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

दुष्काळाचे संकट सुलतानी - देसरडा

By admin | Updated: February 25, 2016 01:47 IST

दुष्काळ निवारण मंडळ; चुकीच्या धोरणांमुळे शेती धोक्यात आल्याचा आरोप.

बुलडाणा : राज्यात सध्या दुष्काळाचे संकट घोंगावत असून, संकटाचे मूळ हे अस्मानी कमी अन् सुलतानी जास्त आहे. सर्वच राज्यकर्त्यांनी चुकीची शेतधोरणे राबविल्याने शेती धोक्यात आली असून, आता जलयुक्त शिवाराच्या नावाखाली पुन्हा एकदा धूळफेक चालविली असल्याचा आरोप दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष प्रख्यात अर्थतज्ज्ञ एच.एम.देसरडा यांनी केला. दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या संवाद यात्रेच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रा.देसरडा म्हणाले की, महात्मा फुले जल-भूमी अभीयानाचे नाव बदलून जलयुक्त शिवार ठेवण्यात आले आहे. हे अभियान म्हणजे शुद्ध धूळफेक असून, नदी खोलीकरणाच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने जलसंधारणाची कामे केली जात आहेत. मुळातच राज्यकर्त्यांनी शेतीच्या धोरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच शेती अडचणीत आली असून, शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. येणार्‍या काळात दुष्काळ निवारण्यासाठी कोट्यवधीचा निधी खर्च होईल. या निधीमधून मिळणारे कमिशन खाणारी जमात मात्र गब्बर होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. या संवाद यात्रेतून दुष्काळाची कारणे, उपाययोजना, प्रबोधन अशा स्वरूपात प्रत्येक जिल्ह्यात काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेला कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार, प्राचार्य डॉ.अंभोरे उपस्थित होते. पत्रकार परिषदेच्या आधी प्रा.देसरडा यांनी जिजामाता महाविद्यालयात शेतकरी व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. ही संवाद यात्रा बुलडाण्यावरून चिखलीकडे रवाना झाली.