शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

संशय करतो संसाराचा घात

By admin | Updated: September 21, 2014 00:38 IST

खामगाव तालुक्यातील परिस्थिती : महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये सहा महिन्यात ६२ तक्रारी.

अनिल गवई / खामगाव (बुलडाणा)थाटामाटात लग्न आटोपल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तालुक्यातील ६२ जणांच्या संसाराची गाडी रुळावरून उतरली. यापैकी तब्बल २९ जणांच्या सप्तपदीची गाठ केवळ संशयीवृत्तीमुळे सैल झाल्याचे चित्र आहे. वाढत्या घरगुती कलहामुळे कुटुंब व्यवस्था धोक्यात येत असल्याचे लक्षात येताच शासनाने सं पूर्ण राज्यात कलह उद्भवलेल्या दाम्पत्यांचे समुपदेशन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उ पक्रमांतर्गत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत स्थानिक शहर पोलिस स्टेशनमध्ये बुलडाणा येथील जीवनधारा शैक्षणिक क्रीडा व बहुउद्देशीय महिला मंडळाला ह्यसमु पदेशन केंद्रह्ण चालविण्यास परवानगी दिली. महिला दिन आणि राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून १0 मार्च २0१४ रोजी या केंद्राचे रितसर उद्घाटन झाले. उद्घाटन झाल्या पासून आजपर्यंतच्या सहा महिन्यांच्या कालावधीत ६२ तक्रारी या केंद्रात दाखल आहेत.प्राप्त तक्रारींचा निपटारा करताना तब्बल २९ तक्रारी या चारित्र्याच्या संशयावरून असल्याचे वास्तव आहे. तर १४ दाम्पत्यांच्या वादाला मोबाईल कारणीभूत ठरल्याची वस्तुस्थिती आहे. याशिवाय सात दाम्पत्याच्या संसारात दोघांपैकी एकाच्या आईने मिठाचा खडा असल्याची परिस्थिती असून, १0 महिलांनी केवळ आकसापोटी तक्रार दाखल केल्याचे चित्र समोर आले आहे.