शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

किनगाव जट्टू परिसरात दुबार पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

किनगाव जट्टू : परिसरात झालेल्या अति पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील जमीन खरडली आहे़ त्यामुळे, पिके वाहून गेल्याने ...

किनगाव जट्टू : परिसरात झालेल्या अति पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील जमीन खरडली आहे़ त्यामुळे, पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली़ नुकसान झालेल्या भागात प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी लोणार तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे़

किनगाव जट्टू परिसरात २७ जून राेजी एक ते दीड तास जाेरदार पाऊस झाला हाेता़ त्यामुळे शेतात पाणी साचले हाेते़ तसेच शेत शिवारातील नाल्यांना माेठा पूर आला हाेता़ अनेक नाल्यांचे पाणी शेजारील शेतात घुसल्याने बांध बंदिस्त फुटले़ त्यामुळे, पेरलेल्या शेतातील नेमकेच उगवत असलेले पीक वाहून गेले़ तसेच काही ठिकाणी जमिनी खरडल्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे़ सावरगाव गावाजवळील पूल तुटला तर किनगाव जट्टू येथील विठ्ठल दास दायमा यांची विहीर खचली आहे़ सध्या परिस्थितीत ज्या शेतकऱ्याचे पीक वाहून गेले आहे, त्यांची दुबार पेरणी करीता कसरत सुरू आहे़ गतवर्षी सुद्धा परिसरात बियाणे खराब निघाल्याने

शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली होती़ सोंगणी वेळी अतिवृष्टी झाल्याने उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाले हाेते़ पेरणीला लागलेला खर्च वसूल झाला नाही त्यामुळे शेती व्यवसाय जुगाराच्या खेळाप्रमाणे शेतकरी दरवर्षी खेळ खेळतो परंतु कधी अतिवृष्टी तर कोरडा दुष्काळ आशा अस्मानी सुलतानी संकटाने शेतकरी पार वैतागला आहे़ २७ जून रोजी झालेल्या अति पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनात केली आहे़ या निवेदनावर अध्यक्ष अनिल मोरे, उपाध्यक्ष अनिल लांडगे ,सचिव विकास मुळे ,भागवत मुर्तंडकर आदींची स्वाक्षरी आहे़