शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर दुहेरी आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:33 IST

त्यातच थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी सिंचन विभागाने मध्यंतरी स्थानिक स्वराज्य संस्थांना नोटीसही बजावल्या होत्या. अकोला परिमंडळातंर्मगत येणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात महावितरणची ...

त्यातच थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी सिंचन विभागाने मध्यंतरी स्थानिक स्वराज्य संस्थांना नोटीसही बजावल्या होत्या.

अकोला परिमंडळातंर्मगत येणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात महावितरणची स्थानिक स्वराज्य संस्थांकडे १ हजार ७७२ पथदिव्यांची २२५ कोटी रुपये आणि १४०५ पाणीपुरवठा योजनांची ६६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. प्रदीर्घ कालावधीपासून ही थकबाकी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आहे. त्याचा भरणा करण्यासाठी वारंवार या संस्थांकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्याला अपेक्षीत प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातच मानवीय दृष्टीकोणातून बऱ्याचदा सुट दिल्या गेली होती. मात्र आता आर्थिक वर्ष संपुष्टात येत असताना व महावितरणचा आर्थिक डोलारा डबघाईस येण्याची शक्यता पाहता वेळेत या थकित रकमेचा भरणा न केल्यास कुठल्याही क्षणी पाणीपुरवठा योजना आणि पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा इशारा महावितरणणे दिला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसापूर्वी मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील पाणीपुरवठा योजनेचा ६० लाख रुपयांच्या थकित देयकासाठी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. जवळपास दहा वर्षापासून धामणगाव बढे पाणीपुरवठा योजनेचे महावितरणचे देयक थकीत आहे. त्याला ग्रामपंचायतीकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर हा निर्णय घेण्यात आला होता. अशीच स्थिती जिल्ह्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची झाली आहे. त्यामुळे महावितरणे हे पाऊल उचलले आहे.

विशेष म्हणजे वीज पुरवठा नसले तर पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांसह कोणत्याच आस्थापना सुरळीत चालणे शक्य नाही. मात्र अत्यावश्यक सेवेत गणल्या जात असलेल्या या सेवेलाच शेवटचे प्राधान्य दिल्या जात आहे. परिणामस्वरुप महावितरणने आता ही कडक अशी भूमिका घेतली आहे.

--घरगुती ग्राहकांकडेही २११ कोटी--

बुलडाणा जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांकडेही महावितरणचे २११ कोटी रुपये थकबाकी आहे. तही आता अवघ्या सहा दिवसात वसूल करण्याचे आव्हान महावितरणसमोर उभे ठाकले आहे.

--जलसंपदा विभागाचीही थकबाकी--

जिल्ह्यातील मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह जवळपास २००ग्रामपंचायतींकडे जलसंपदा विभागाची २.४४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यासंदर्भात संबंधित यंत्रणेला वारंवार सुचना देवूनही ही थकबाकी भरल्या गेली नाही. त्यामुळे सिंचन विभागाकडूनही स्थानिक स्वराज्य संस्थांना थकीत रकमेसाठी मधल्या काळात नोटीस बजावण्यात आल्या होत्या. प्रती दलघमी १ लाख ८० हजार रुपये ग्रामपंचायतींसाठी सिंचन विभाग पाणीपट्टी आकारतो तर पालिकांसाठी २लाख १६ हजार रुपये आकारणी करण्यात येते. अैाद्योगिक क्षेत्रासाठी पाणीपट्टीचे दर वेगळे आहेत.