शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
5
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
6
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
7
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
8
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
9
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
10
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
11
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
12
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
13
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
14
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
15
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
16
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
17
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
18
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
19
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
20
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!

स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर दुहेरी आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:33 IST

त्यातच थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी सिंचन विभागाने मध्यंतरी स्थानिक स्वराज्य संस्थांना नोटीसही बजावल्या होत्या. अकोला परिमंडळातंर्मगत येणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात महावितरणची ...

त्यातच थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी सिंचन विभागाने मध्यंतरी स्थानिक स्वराज्य संस्थांना नोटीसही बजावल्या होत्या.

अकोला परिमंडळातंर्मगत येणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात महावितरणची स्थानिक स्वराज्य संस्थांकडे १ हजार ७७२ पथदिव्यांची २२५ कोटी रुपये आणि १४०५ पाणीपुरवठा योजनांची ६६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. प्रदीर्घ कालावधीपासून ही थकबाकी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आहे. त्याचा भरणा करण्यासाठी वारंवार या संस्थांकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्याला अपेक्षीत प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातच मानवीय दृष्टीकोणातून बऱ्याचदा सुट दिल्या गेली होती. मात्र आता आर्थिक वर्ष संपुष्टात येत असताना व महावितरणचा आर्थिक डोलारा डबघाईस येण्याची शक्यता पाहता वेळेत या थकित रकमेचा भरणा न केल्यास कुठल्याही क्षणी पाणीपुरवठा योजना आणि पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा इशारा महावितरणणे दिला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसापूर्वी मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील पाणीपुरवठा योजनेचा ६० लाख रुपयांच्या थकित देयकासाठी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. जवळपास दहा वर्षापासून धामणगाव बढे पाणीपुरवठा योजनेचे महावितरणचे देयक थकीत आहे. त्याला ग्रामपंचायतीकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर हा निर्णय घेण्यात आला होता. अशीच स्थिती जिल्ह्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची झाली आहे. त्यामुळे महावितरणे हे पाऊल उचलले आहे.

विशेष म्हणजे वीज पुरवठा नसले तर पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांसह कोणत्याच आस्थापना सुरळीत चालणे शक्य नाही. मात्र अत्यावश्यक सेवेत गणल्या जात असलेल्या या सेवेलाच शेवटचे प्राधान्य दिल्या जात आहे. परिणामस्वरुप महावितरणने आता ही कडक अशी भूमिका घेतली आहे.

--घरगुती ग्राहकांकडेही २११ कोटी--

बुलडाणा जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांकडेही महावितरणचे २११ कोटी रुपये थकबाकी आहे. तही आता अवघ्या सहा दिवसात वसूल करण्याचे आव्हान महावितरणसमोर उभे ठाकले आहे.

--जलसंपदा विभागाचीही थकबाकी--

जिल्ह्यातील मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह जवळपास २००ग्रामपंचायतींकडे जलसंपदा विभागाची २.४४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यासंदर्भात संबंधित यंत्रणेला वारंवार सुचना देवूनही ही थकबाकी भरल्या गेली नाही. त्यामुळे सिंचन विभागाकडूनही स्थानिक स्वराज्य संस्थांना थकीत रकमेसाठी मधल्या काळात नोटीस बजावण्यात आल्या होत्या. प्रती दलघमी १ लाख ८० हजार रुपये ग्रामपंचायतींसाठी सिंचन विभाग पाणीपट्टी आकारतो तर पालिकांसाठी २लाख १६ हजार रुपये आकारणी करण्यात येते. अैाद्योगिक क्षेत्रासाठी पाणीपट्टीचे दर वेगळे आहेत.