शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर दुहेरी आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:33 IST

त्यातच थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी सिंचन विभागाने मध्यंतरी स्थानिक स्वराज्य संस्थांना नोटीसही बजावल्या होत्या. अकोला परिमंडळातंर्मगत येणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात महावितरणची ...

त्यातच थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी सिंचन विभागाने मध्यंतरी स्थानिक स्वराज्य संस्थांना नोटीसही बजावल्या होत्या.

अकोला परिमंडळातंर्मगत येणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात महावितरणची स्थानिक स्वराज्य संस्थांकडे १ हजार ७७२ पथदिव्यांची २२५ कोटी रुपये आणि १४०५ पाणीपुरवठा योजनांची ६६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. प्रदीर्घ कालावधीपासून ही थकबाकी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आहे. त्याचा भरणा करण्यासाठी वारंवार या संस्थांकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्याला अपेक्षीत प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातच मानवीय दृष्टीकोणातून बऱ्याचदा सुट दिल्या गेली होती. मात्र आता आर्थिक वर्ष संपुष्टात येत असताना व महावितरणचा आर्थिक डोलारा डबघाईस येण्याची शक्यता पाहता वेळेत या थकित रकमेचा भरणा न केल्यास कुठल्याही क्षणी पाणीपुरवठा योजना आणि पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा इशारा महावितरणणे दिला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसापूर्वी मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील पाणीपुरवठा योजनेचा ६० लाख रुपयांच्या थकित देयकासाठी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. जवळपास दहा वर्षापासून धामणगाव बढे पाणीपुरवठा योजनेचे महावितरणचे देयक थकीत आहे. त्याला ग्रामपंचायतीकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर हा निर्णय घेण्यात आला होता. अशीच स्थिती जिल्ह्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची झाली आहे. त्यामुळे महावितरणे हे पाऊल उचलले आहे.

विशेष म्हणजे वीज पुरवठा नसले तर पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांसह कोणत्याच आस्थापना सुरळीत चालणे शक्य नाही. मात्र अत्यावश्यक सेवेत गणल्या जात असलेल्या या सेवेलाच शेवटचे प्राधान्य दिल्या जात आहे. परिणामस्वरुप महावितरणने आता ही कडक अशी भूमिका घेतली आहे.

--घरगुती ग्राहकांकडेही २११ कोटी--

बुलडाणा जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांकडेही महावितरणचे २११ कोटी रुपये थकबाकी आहे. तही आता अवघ्या सहा दिवसात वसूल करण्याचे आव्हान महावितरणसमोर उभे ठाकले आहे.

--जलसंपदा विभागाचीही थकबाकी--

जिल्ह्यातील मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह जवळपास २००ग्रामपंचायतींकडे जलसंपदा विभागाची २.४४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यासंदर्भात संबंधित यंत्रणेला वारंवार सुचना देवूनही ही थकबाकी भरल्या गेली नाही. त्यामुळे सिंचन विभागाकडूनही स्थानिक स्वराज्य संस्थांना थकीत रकमेसाठी मधल्या काळात नोटीस बजावण्यात आल्या होत्या. प्रती दलघमी १ लाख ८० हजार रुपये ग्रामपंचायतींसाठी सिंचन विभाग पाणीपट्टी आकारतो तर पालिकांसाठी २लाख १६ हजार रुपये आकारणी करण्यात येते. अैाद्योगिक क्षेत्रासाठी पाणीपट्टीचे दर वेगळे आहेत.