शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मनभेद निर्माण होऊ देवू नका, स्वत:मधील सुजान नागरिक जागा करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 16:22 IST

आपण देशाचे सुजान नागरिक आहोत. याची जाणिव असू द्यावी, असे भावनिक आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  सद्या देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून शांतता भंग होण्याचे प्रसंग घडत आहेत. या कायद्याचे समर्थन आणि विरोध करताना सर्वप्रथम आपण देशाचे सुजान नागरिक आहोत. याची जाणिव असू द्यावी, असे भावनिक आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी येथे केले.नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सोमवारी रात्री झालेल्या या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. हेमराजसिंह राजपूत, उप विभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना जिल्हा पोलिस अधिक्षक पाटील म्हणाले की, नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशात, राज्यात आणि आपल्या परिसरात काही ठिकाणी शांतता भंग पावण्याचे प्रकार घडत आहेत. तात्विक विरोध करताना आपल्याच देशाच्या संपत्तीचे नुकसान करणे, योग्य नाही. लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराने पारीत केलेल्या कायद्याला रस्त्यावर उतरून विरोध करणे चुकीचे आहे. विरोधासाठी अनेक कायदेशीर मार्ग आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल, असे कृत्य कुणीही करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. एखाद्या कायद्याच्या बाजूने अथवा विरोधात मतभेद असू शकतात. मात्र, यासाठी मनभेद होईल अशी कुणाचीही वागणूक असू नये, असे ते म्हणाले.संचालन शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरिक्षक रविंद्र देशमुख यांनी केले. आभार शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर यांनी मानले. या सभेला शहरातील शांतता कमेटी सदस्य विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.    

सामाजिक सलोखा अबाधित ठेवा: मौलाना युनुसभारत आमचा देश आहे. भारताच्या पावन भूमीतच आमचा जन्म झाला आहे. भारताची माती आमच्यासाठी पवित्र आहे. त्यामुळे सामाजिक सलोख्याला ठेच पोहोचेल,  असे कृत्य कुणीही करू नये आवाहन जुना फैल मशीदीचे मौलाना युनुस यांनी केले. यावेळी हकीमोद्दीन बोहरा, मौलाना इमरान खान, ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे, प्रशांत देशमुख, अमोल अंधारे यांचीही समायोचित भाषणे झालीत. सर्वांनीचं शांततेचे आवाहन केले.

टॅग्स :khamgaonखामगावPoliceपोलिसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक