शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळी व अतिवृष्टीचे अनुदान न मिळाल्यास पालकमंत्र्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 18:55 IST

मेहकर : भाजप सरकार सत्येवर आल्यापासून शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीमुळे व कापसावर बोंडअळी पडल्यामुळे मेहकर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झालेले आहे. नुकसानीचा सर्वे होऊनही शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही.

ठळक मुद्देजवळपास ३ ते ४ महिने झाले असतानाही अतिवृष्टी व बोंडअळीची रक्कम शेतकºयांना अद्यापही मिळालेले नाही. पासवाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने शेतकºयांना पैशाची नितांत गरज आहे.आठ दिवसात शेतकऱ्यां च्या खात्यात जमा न झाल्यास पालकमंत्री यांना घेराव घालण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील ठाकरे यांनी दिला आहे.

मेहकर : भाजप सरकार सत्येवर आल्यापासून शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीमुळे व कापसावर बोंडअळी पडल्यामुळे मेहकर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झालेले आहे. नुकसानीचा सर्वे होऊनही शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे अतिवृष्टी व बोंडअळीचे अनुदान येत्या आठ दिवसात शेतकऱ्यां च्या खात्यात जमा न झाल्यास पालकमंत्री यांना घेराव घालण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील ठाकरे यांनी दिला आहे. गेल्या दोन तीन वर्षापासून मेहकर तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होत चालली आहे. जे काही पीक थोड्याफार प्रमाणात हाती लागले, त्या पिकांना बाजारात भाव नाही. बॅकेचे कर्जही वेळेवर मिळाले नाही. त्यामुळे शेतकºयांनी मागील वर्षी व्याजाने पैसे काढून उसनवार करून, तर कधी उधारीवर बि-बियाणे व खते खरेदी करून पेरणी केली होती. मात्र निसर्गाची अवकृपा झाल्याने मेहकर तालुक्यात भिषण अतिवृष्टी झाली होती व कापसावर बोंडअळीचा रोग पडला होता. यामध्ये मेहकर तालुकयातील हजारो शेतकºयांचे कोट्यावधी रूपयाचे नुकसान झाले होते. त्यावेळी भाजप सरकारने अधिकाºयाक डून सर्वे करून घेवून नुकसानीचा अहवाल मागविला होता. अहवाल जावून जवळपास ३ ते ४ महिने झाले असतानाही अतिवृष्टी व बोंडअळीची रक्कम शेतकºयांना अद्यापही मिळालेले नाही. पासवाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने शेतकºयांना पैशाची नितांत गरज आहे. पेरणीच्या वेळेवर शेतकºयांना जर पैसे मिळाले नाही तर शेतकरी हतबल होऊन आत्महत्याचा मार्ग अवलंबतील, अशी बिकट परिस्थिती शेतकºयांची झाली आहे. त्यामुळे अतिवृष्टी व बोडअळीचे अनुदान आठ दिवसात न मिळाल्यास पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना घेराव घालण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेसचे मेहकर तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील ठाकरे, प्रभाकर सपकाळ, अ‍ॅड.विजय मोरे, गजानन सावंत, निसार अंसारी ,संजय गायकवाड, संजय शेळके, गजानन काळे, विठ्ठल पायघन, उध्दव भालेराव, संतोष मते आदीनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Mehkarमेहकरbuldhanaबुलडाणा