शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

स्वार्थ भावनेने कुठलेही कार्य करू नका - ब्रम्हकुमारी भारती  दीदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 16:14 IST

कटनी मध्यप्रदेश येथील ब्रम्हकुमारी केंद्राच्या  राजयोगीनी ब्रम्हकुमारी भारती  दीदी यांच्याशी साधलेला संवाद...

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : सृष्टीचा निर्माता भगवंत असून सर्वकाही इच्छीत देण्याचे सामर्थ्य भगवंतांतच आहे. त्यामुळे भगवंत प्राप्त करण्यासाठीच प्रत्येकाची प्रबळ इच्छाशक्ती असली पाहीजे. भगवंतापासून काही प्राप्त करण्याची मनिषा ठेवण्याऐवजी  भगवंतालाच प्राप्त करण्याची मनिषा प्रत्येकाने ठेवावी. कटनी मध्यप्रदेश येथील ब्रम्हकुमारी केंद्राच्या  राजयोगीनी ब्रम्हकुमारी भारती  दीदी यांच्याशी साधलेला संवाद...

मनुष्याच्या दु:खाची कारणे कोणती?   मनाच्या विपरीत घडलं की, साध्या साध्या गोष्टीने प्रत्येक मनुष्य निराश होतो.  जे करायचे ते सोडून, नको असलेल्या कामातच तो अधिक रमतो. त्यामुळे आजच्या समाजातील मनुष्य दु:खी आहे. रिकामे ‘मन’ हे सुद्धा मनुष्याच्या दु:खाचे प्रमुख कारण आहे.

तणाव विरहित समाजाच्या निर्मितीसाठी काय सांगाल?अपेक्षा आणि इच्छा वाढीस लागल्याने मनुष्य नैराश्य आणि तणावाकडे जात आहे. ही वस्तुस्थिती आहे. मात्र, प्रत्येकाने आपल्या जीवनात प्रेम...आदर आणि नि:स्वार्थ भावनेची देवाण-घेवाण केल्यास, निकोप समाजाची निर्मिती सहज शक्य आहे. आपल्यातील अहंकार आणि सर्व विकारांना शत्रु मानण्यात येते. अंगी असलेले विविध विकार हे शत्रु असले तरी, जीवनात माणसाचा कुणीही शत्रु नसला पाहीजे. विकारांचा त्याग केल्यास मनुष्य सुखी होईल आणि पर्यायाने तणावमुक्त समाजाची निर्मिती होण्यास मदत होईल.

ब्रम्हकुमारीज्मुळे मनुष्याच्या जीवनात बदल घडतात का?निश्चितच, ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाशी आपण वयाच्या १३ व्या वर्षीपासून जुळलो आहोत. माझ्यासह अनेकांच्या आयुष्यात ब्रम्हकुमारीजमुळे आमुलाग्र बदल घडून आले आहेत. अनेकांना क्रोधावर नियत्रंणही मिळविण्यास मदत झाली आहे.अंहकार हा मानवाचा सर्वातमोठा शत्रू आहे. शास्त्राने अंहकाराला दुराचारी कंसाची उपमा दिली आहे. सुख आणि समाधान प्राप्तीसाठी स्वार्थाला दूर ठेवले पाहीजे. तसेच प्रत्येकाने जीवनातील अंहकाररूपी कंसालाही प्रत्येकाने दूर ठेवण्याचा प्रयत्न करणे, आणि इतरांना यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे. 

तणाव विरहित समाज निर्मितीसाठी ब्रम्हकुमारीचे योगदान काय?तणाव विरहित समाजाच्या निर्मितीसाठी प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्व विद्यालयाकडून भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात प्रयत्न केले जात आहेत. जगभरात ८५०० केंद्रांच्या माध्यमातून विविध ठिकाणी तणावमुक्त शिबिर, प्रबोधन कार्यशाळा तसेच इतर धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येतात. राजस्थान येथील माउंट आबू येथून प्रत्येक केंद्र संचालित केले जाते. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक, उत्तरप्रदेश यासारख्या प्रमुख राज्यातही ब्रम्हकुमारीजचे मोठे योगदान आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत