शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

स्वार्थ भावनेने कुठलेही कार्य करू नका - ब्रम्हकुमारी भारती  दीदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 16:14 IST

कटनी मध्यप्रदेश येथील ब्रम्हकुमारी केंद्राच्या  राजयोगीनी ब्रम्हकुमारी भारती  दीदी यांच्याशी साधलेला संवाद...

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : सृष्टीचा निर्माता भगवंत असून सर्वकाही इच्छीत देण्याचे सामर्थ्य भगवंतांतच आहे. त्यामुळे भगवंत प्राप्त करण्यासाठीच प्रत्येकाची प्रबळ इच्छाशक्ती असली पाहीजे. भगवंतापासून काही प्राप्त करण्याची मनिषा ठेवण्याऐवजी  भगवंतालाच प्राप्त करण्याची मनिषा प्रत्येकाने ठेवावी. कटनी मध्यप्रदेश येथील ब्रम्हकुमारी केंद्राच्या  राजयोगीनी ब्रम्हकुमारी भारती  दीदी यांच्याशी साधलेला संवाद...

मनुष्याच्या दु:खाची कारणे कोणती?   मनाच्या विपरीत घडलं की, साध्या साध्या गोष्टीने प्रत्येक मनुष्य निराश होतो.  जे करायचे ते सोडून, नको असलेल्या कामातच तो अधिक रमतो. त्यामुळे आजच्या समाजातील मनुष्य दु:खी आहे. रिकामे ‘मन’ हे सुद्धा मनुष्याच्या दु:खाचे प्रमुख कारण आहे.

तणाव विरहित समाजाच्या निर्मितीसाठी काय सांगाल?अपेक्षा आणि इच्छा वाढीस लागल्याने मनुष्य नैराश्य आणि तणावाकडे जात आहे. ही वस्तुस्थिती आहे. मात्र, प्रत्येकाने आपल्या जीवनात प्रेम...आदर आणि नि:स्वार्थ भावनेची देवाण-घेवाण केल्यास, निकोप समाजाची निर्मिती सहज शक्य आहे. आपल्यातील अहंकार आणि सर्व विकारांना शत्रु मानण्यात येते. अंगी असलेले विविध विकार हे शत्रु असले तरी, जीवनात माणसाचा कुणीही शत्रु नसला पाहीजे. विकारांचा त्याग केल्यास मनुष्य सुखी होईल आणि पर्यायाने तणावमुक्त समाजाची निर्मिती होण्यास मदत होईल.

ब्रम्हकुमारीज्मुळे मनुष्याच्या जीवनात बदल घडतात का?निश्चितच, ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाशी आपण वयाच्या १३ व्या वर्षीपासून जुळलो आहोत. माझ्यासह अनेकांच्या आयुष्यात ब्रम्हकुमारीजमुळे आमुलाग्र बदल घडून आले आहेत. अनेकांना क्रोधावर नियत्रंणही मिळविण्यास मदत झाली आहे.अंहकार हा मानवाचा सर्वातमोठा शत्रू आहे. शास्त्राने अंहकाराला दुराचारी कंसाची उपमा दिली आहे. सुख आणि समाधान प्राप्तीसाठी स्वार्थाला दूर ठेवले पाहीजे. तसेच प्रत्येकाने जीवनातील अंहकाररूपी कंसालाही प्रत्येकाने दूर ठेवण्याचा प्रयत्न करणे, आणि इतरांना यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे. 

तणाव विरहित समाज निर्मितीसाठी ब्रम्हकुमारीचे योगदान काय?तणाव विरहित समाजाच्या निर्मितीसाठी प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्व विद्यालयाकडून भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात प्रयत्न केले जात आहेत. जगभरात ८५०० केंद्रांच्या माध्यमातून विविध ठिकाणी तणावमुक्त शिबिर, प्रबोधन कार्यशाळा तसेच इतर धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येतात. राजस्थान येथील माउंट आबू येथून प्रत्येक केंद्र संचालित केले जाते. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक, उत्तरप्रदेश यासारख्या प्रमुख राज्यातही ब्रम्हकुमारीजचे मोठे योगदान आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत