शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

ज्ञानगंगा अभयारण्यातील पाणवठे कोरडे; वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 15:46 IST

बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील बुलडाणा रेंजमधील कृत्रीम पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देक्षेत्रफळाच्यादृष्टीने मोठे असलेल्या या अभयारण्यात विविध प्रजातीचे प्राणी, पक्षी अधिवास करतात. सध्या जंगलातील पाणी संपत आल्याने वन्यप्राण्यांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. काही पाणवठ्यांमधील पाणी कमी झाल्याने प्राण्यांना पाणी पिणे शक्य होत नाही.

बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील बुलडाणा रेंजमधील कृत्रीम पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. चार तालुक्यात विस्तार असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याची बुलडाणा व खामगाव अशी विभागणी करण्यात आली आहे. बुलडाणा रेंजमध्ये ४ राऊंड व ९ बीट आहेत. तर खामगाव रेंजमध्ये ३ राऊंड व ११ बीट आहेत. क्षेत्रफळाच्यादृष्टीने मोठे असलेल्या या अभयारण्यात विविध प्रजातीचे प्राणी, पक्षी अधिवास करतात. मात्र सध्या जंगलातील पाणी संपत आल्याने वन्यप्राण्यांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. बहुतांश पाणवठे कोरडे पडल्याचे चित्र दिसून येत आहे. काही पाणवठ्यांमधील पाणी कमी झाल्याने प्राण्यांना पाणी पिणे शक्य होत नाही. वास्तविक जानेवारीपासूनच जंगलातील पाण्याचे स्त्रोत कमी होण्यास सुरुवात झाली होती. संबंधित विभागाने तेव्हापासूनच पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्याची गरज होती. मात्र बुलडाणा रेंजमध्ये या बाबीकडे दुलर्क्ष झाल्याचे बघायला मिळते. वेळीच उपाययोजना करुन मुक्या जीवांची तहान भागवण्याची आवश्यकता आहे.

 जुने पाणवठे नादुुरुस्त

वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी बुलडाणा रेंजमध्ये २८ कृत्रीम पाणवठे निर्माण करण्यात आलेले आहेत. तर यावर्षी ८ नवीन पाणवठे बनविण्याचे वन्यजीव विभागाचे नियोजन आहे. जुन्या पाणवठ्यांपैकी अनेक पाणवठे नादुरुस्त आहेत. त्यामधील प्लास्टिक फाटलेले असून तत्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तेव्हाच या पाणवठ्यांमध्ये पाणी टाकता येईल. 

 या प्राण्यांचा आहे अधिवास

ज्ञानगंगा अभयारण्यात विविध प्रजातींच्या प्राण्यांचा अधिवास आहे. बिबट, अस्वल, रानडुक्कर, तडस, कोल्हा, लांडगा, निलगाय, हरण, मोर, ससे, अजगर यासह विविध प्रजातींचे पक्षी येथे आढळतात. प्राण्यांची मोठी संख्या पाहता अभयारण्यात त्यांच्यासाठी पाण्याची सोय करणे आवश्यक आहे. 

कृत्रीम पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यासाठी आजपासून चार टँकर्स सुरु करण्यात आली आहेत. वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होवू नये याची खबरदारी घेण्यात येईल.

- मयूर सुरवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव

टॅग्स :buldhanaबुलडाणाdnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्य