शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

‘एक दिवा वंचितांसाठी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:44 IST

धामणगाव बढे : वंचित, दलित आणि मागासवर्गीय हे शब्द सत्ते पर्यंत पोहचण्याचे साधन बनले. परंतु सत्ता मिळाली की वंचित हे  कायम वंचित राहतात. परंतु दलित, वंचित व मागास समाजाच्या  जिवनात देखील काही क्षण आनंदाचे यावे यासाठी सिंदखेडच्या  सरपंच विमल कदम यांनी कुटुंबासमवेत मागासवस्तीत  भाऊबिज साजरी केली व एक दिवा वंचितासाठी हा उपक्रम  राबविला. 

ठळक मुद्देसिंदखेड सरपंचाचा उपक्रम मागासवस्तीत भाऊबीज साजरीलोकमत प्रेरणावाट

नवीन मोदे । लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे : वंचित, दलित आणि मागासवर्गीय हे शब्द सत्ते पर्यंत पोहचण्याचे साधन बनले. परंतु सत्ता मिळाली की वंचित हे  कायम वंचित राहतात. परंतु दलित, वंचित व मागास समाजाच्या  जिवनात देखील काही क्षण आनंदाचे यावे यासाठी सिंदखेडच्या  सरपंच विमल कदम यांनी कुटुंबासमवेत मागासवस्तीत  भाऊबिज साजरी केली व एक दिवा वंचितासाठी हा उपक्रम  राबविला. यावेळी प्रवीण कदम, विनोद कदम, अँड.गणेशसिंग राजपूत  यांना मागासवर्गीय वस्तीतील सुमारे ६५ महिलांनी औक्षण केले.  सामाजिक कार्यकर्ते प्रविण कदम यांचे वतीने सदरहू महिलांना  साडी-चोळी भेट देण्यात आली. अनेक वर्षे ज्यांनी भाऊबीज  साजरी केली नाही. ज्यांना भाऊ नाही, अशा अनेक दिनदुबळ्या  महिलांना यानिमित्ताने भाऊ मिळाला. त्यांचा आनंद त्यांच्या  चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता. सिंदखेडच्या सरपंच विमल  कदम यांनी गावात अनेक कामे स्वखर्चाने करून गाव आदर्श  बनविले. त्यांचे कुटुंब मागील दोन वर्षापासून मागासवस्तीत  भाऊबीज साजरी करीत आहे. यावर्षी सिंदखेड येथील  मागासवस्तीत यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते. यावेळी अँड. गणेशसिंग राजपूत, पं.स.सभापती पुष्पा  चव्हाण, उखा चव्हाण, सरपंच विमल कदम, ग्रामपंचायत  पदाधिकारी प्रविण कदम, अर्जुन कदम यांचेसह गावकरी उपस् िथत होते.अँड. गणेशसिंग राजपूत यांनी प्रविण कदम यांचा उपक्रम  प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगितले. तर सर्वत्र समाजा- समाजात दरी वाढत असताना भेदभाव वाढत असताना  भाऊबिजेच्या या निमित्ताने बहिण-भावाच्या नात्याचे नवे पर्व  सुरू होवून वंचितांना आधार मिळाला. तसेच फक्त भाऊबिजच  नव्हे तर संकटात असताना कधिही हाक द्या असे यावेळी प्रविण  कदम यांनी सांगितले. देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, घेता  घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे, यापासून प्रेरणा घेत  अनेकांनी कार्य केले तर वंचित, दलित, मागास हे फक्त शब्द  नाही तर समाज आहेत याची जाणीव होईल.

वंचित, दलित, मागास समाजातील परिस्थिती अस्वस्थ करते,  त्यांच्या जिवनात काही क्षण आनंदाचे यावे यासाठी एक दिवा  वंचितासाठी हा उपक्रम. ग्रामपंचायत, आ.सपकाळ यांच्या  माध्यमातून या समाजासाठी भरिव काम करण्याचा संकल्प  आहे.- प्रविण कदम, सिंदखेड.

टॅग्स :diwaliदिवाळी