शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

निकषामुळे जिल्हा दुष्काळ कक्षेबाहेर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:28 IST

बुलडाणा : दुष्काळ जाहीर करण्याच्या नव्या निकषांचा जिल्ह्याला फटका बसला आहे. त्यातच सुधारित पैसेवारीही ६४ पैसे आली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी ही पैसेवारी जाहीर करण्यात आली.

ठळक मुद्देपुणे कृषी आयुक्तालयाकडे पाठविला अहवाल 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : दुष्काळ जाहीर करण्याच्या नव्या निकषांचा जिल्ह्याला फटका बसला आहे. त्यातच सुधारित पैसेवारीही ६४ पैसे आली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी ही पैसेवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान, अंतिम पैसेवारी ३0 नोव्हेंबरला जाहीर होणार असली तरी, सुधारित पैसेवारीमध्ये फारसा फरक पडणार नसल्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत. त्यातच कृषी विभागाकडून पाठविण्यात आलेल्या अहवालातही जिल्ह्यात स्थिती सर्वसाधारण असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.परिणामी, बुलडाणा जिल्ह दुष्काळाच्या कक्षेबाहेर असल्याचे स्पष्ट होत आहे. तसा अहवालही कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाकडून पाठविण्यात आला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शासन स्तरावर दुष्काळ जाहीर करण्याचे परिमाण आणि परिभाषा बदलली आहे.  यापूर्वी खरीप हंगामाची नजरअंदाज, सुधारित आणि अंतिम पैसेवारी तथा पावसाच्या वार्षिक सरासरीच्या आधारावर  दुष्काळप्रश्नी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जात होती; मात्र आता दुष्काळ जाहीर करण्याचे निकष व कार्यपद्धती बदलली आहे. केंद्र शासनाने ती निर्धारित केली आहे. २0१७ च्या खरीप हंगामापासून ती लागू झाली आहे.यातील पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृद्रा आर्द्रता आणि जलविषयक या चार निकषांच्या आधारावर दुष्काळासंदर्भात निर्णय घेण्यात येतो. त्यासंदर्भात विचार करता बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १0७ टक्के पाऊस पडला आहे. या चारही निकषांचा विचार करता किमान तीन निकष हे नकारात्मक असल्यासचे दुष्काळी स्थितीसाठी गृहित धरण्यात येतात; मात्र बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती त्या तुलनेत बहुतांश निकषावर सर्वसाधारण आणि मध्यम स्वरुपाचे आले आहेत. परिणामस्वरूप बुलडाणा जिल्ह्यातील १३ ही तालुके दुष्काळाच्या कक्षेबाहेर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसा अहवालही पुणे  कृषी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने सायाबीन पिकाला शेतकरी महत्त्व देतो; मात्र पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीन पिकाची एकरी झडती कमी आली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जमाफीचा मुद्दाही शेतकर्‍यांसाठी अडचणीचा असून, हे निकष शेतकर्‍यांचे नुकसान करणार आहे. याचा आपण निषेध करतो.- राहुल बोंद्रे, आमदार तथा जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्ष