शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

जिल्ह्याला ८५ ऑक्सिजन सिलिंडर्स मिळाले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:36 IST

चिखलीसाठी ऑक्सिजन सिलिंडर नसल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा होणार नाही, अशी माहिती आ.श्वेता महाले यांना प्रशासनाकडून मिळाली. या ...

चिखलीसाठी ऑक्सिजन सिलिंडर नसल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा होणार नाही, अशी माहिती आ.श्वेता महाले यांना प्रशासनाकडून मिळाली. या बाबीची गंभीरतेने दखल घेत आ.महाले यांनी बीड, जालना व राज्यातील इतर ठिकाणी असलेल्या ऑक्सिजन प्लांटशी संपर्क साधून चिखली शहरात एकही सिलिंडर नसल्याने अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आल्याची बाब निदर्शनास आणून दिली. ऑक्सिजन प्लांटवाल्यांनी त्यांच्या जिल्ह्यातच ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने त्यांनी सिलिंडर देण्यास असमर्थता दर्शविली; परंतु बीड आणि जालना येथून ऑक्सिजन सिलिंडर देण्याचे आश्वासन तेथील प्लांटने दिले. मात्र, त्यासाठी त्यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या पत्राची मागणी केली. याअनुषंगाने आ. महाले यांनी चिखलीत ऑक्सिजन पुरवठा नोडल अधिकारी भूषण अहिरे व तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे यांच्याशी चर्चा केली असता संबंधित अधिकारी वर्गानेही पत्र देण्याची हमी दिली. सोबतच उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे यांनी आ. महाले यांच्याकडे बुलडाणा शहरातसुद्धा ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा असल्याचे सांगून बुलडाणा शहरासाठी सुद्धा ऑक्सिजन सिलिंडर मिळवून देण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीप्रमाणे आ. महाले यांनी बीड व जालना येथील प्लांट व्यवस्थापनाशी विनंती करून बुलडाणा शहरासाठीसुद्धा सिलिंडर देण्याची मागणी केली. मागणीवरून सिलिंडर देण्याचे कबूल केले. उपजिल्हाधिकारी अहिरे व तहसीलदार चिखली यांनी तातडीने पत्र देऊन बीड व जालना येथे गाडी पाठवली. त्यामुळे ठरल्याप्रमाणे बुलडाणा येथे ४५ तर चिखली येथे ४० ऑक्सिजन सिलिंडर्स प्राप्त झाले आहेत. याव्दारे दोन दिवसांचा साठा उपलब्ध झाला असून रुग्णांसह डॉक्टरांनीसुद्धा सुटकेचा नि:श्वास सोडला.

व्यवस्थेतपण प्राण फुंकण्याची गरज : आ. महाले

शासनाच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील नागरिकांचा जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु सरकारचे अपयश समोर आणणाऱ्या विरोधी पक्षालाच टार्गेट करून प्रत्येक गोष्टीकरिता केंद्राकडे बोट दाखवून आपला निष्क्रिय कारभार झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वत:ही करायचे नाही आणि इतरांनाही प्रयत्न करून परिस्थिती सुधारू द्यायची नाही. चुका दाखविल्यास त्यांनाच टार्गेट करायचे, असा प्रकार सत्ताधारी करीत आहेत. सर्व व्यवस्था खिळखिळी झालेली असून, रुग्णांना तर प्राणवायू हवाच, सद्य:स्थितीत असणाऱ्या व्यवस्थेतही प्राण फुंकण्याची गरज असल्याची घणाघाती टीका आ. श्वेता महाले यांनी यावेळी केली.