शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला ८५ ऑक्सिजन सिलिंडर्स मिळाले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:36 IST

चिखलीसाठी ऑक्सिजन सिलिंडर नसल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा होणार नाही, अशी माहिती आ.श्वेता महाले यांना प्रशासनाकडून मिळाली. या ...

चिखलीसाठी ऑक्सिजन सिलिंडर नसल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा होणार नाही, अशी माहिती आ.श्वेता महाले यांना प्रशासनाकडून मिळाली. या बाबीची गंभीरतेने दखल घेत आ.महाले यांनी बीड, जालना व राज्यातील इतर ठिकाणी असलेल्या ऑक्सिजन प्लांटशी संपर्क साधून चिखली शहरात एकही सिलिंडर नसल्याने अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आल्याची बाब निदर्शनास आणून दिली. ऑक्सिजन प्लांटवाल्यांनी त्यांच्या जिल्ह्यातच ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने त्यांनी सिलिंडर देण्यास असमर्थता दर्शविली; परंतु बीड आणि जालना येथून ऑक्सिजन सिलिंडर देण्याचे आश्वासन तेथील प्लांटने दिले. मात्र, त्यासाठी त्यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या पत्राची मागणी केली. याअनुषंगाने आ. महाले यांनी चिखलीत ऑक्सिजन पुरवठा नोडल अधिकारी भूषण अहिरे व तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे यांच्याशी चर्चा केली असता संबंधित अधिकारी वर्गानेही पत्र देण्याची हमी दिली. सोबतच उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे यांनी आ. महाले यांच्याकडे बुलडाणा शहरातसुद्धा ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा असल्याचे सांगून बुलडाणा शहरासाठी सुद्धा ऑक्सिजन सिलिंडर मिळवून देण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीप्रमाणे आ. महाले यांनी बीड व जालना येथील प्लांट व्यवस्थापनाशी विनंती करून बुलडाणा शहरासाठीसुद्धा सिलिंडर देण्याची मागणी केली. मागणीवरून सिलिंडर देण्याचे कबूल केले. उपजिल्हाधिकारी अहिरे व तहसीलदार चिखली यांनी तातडीने पत्र देऊन बीड व जालना येथे गाडी पाठवली. त्यामुळे ठरल्याप्रमाणे बुलडाणा येथे ४५ तर चिखली येथे ४० ऑक्सिजन सिलिंडर्स प्राप्त झाले आहेत. याव्दारे दोन दिवसांचा साठा उपलब्ध झाला असून रुग्णांसह डॉक्टरांनीसुद्धा सुटकेचा नि:श्वास सोडला.

व्यवस्थेतपण प्राण फुंकण्याची गरज : आ. महाले

शासनाच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील नागरिकांचा जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु सरकारचे अपयश समोर आणणाऱ्या विरोधी पक्षालाच टार्गेट करून प्रत्येक गोष्टीकरिता केंद्राकडे बोट दाखवून आपला निष्क्रिय कारभार झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वत:ही करायचे नाही आणि इतरांनाही प्रयत्न करून परिस्थिती सुधारू द्यायची नाही. चुका दाखविल्यास त्यांनाच टार्गेट करायचे, असा प्रकार सत्ताधारी करीत आहेत. सर्व व्यवस्था खिळखिळी झालेली असून, रुग्णांना तर प्राणवायू हवाच, सद्य:स्थितीत असणाऱ्या व्यवस्थेतही प्राण फुंकण्याची गरज असल्याची घणाघाती टीका आ. श्वेता महाले यांनी यावेळी केली.