शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

‘एक घर एक झाड’  संकल्पनेतून तीन हजार झाडांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 20:16 IST

दिवसेंदिवस झाडे तोडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल दरवर्षी बिघडत चालला आहे. परिणाम पाऊस, पडण्यासाठी वातावरण तयार होत नसल्याने दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. याचा परिणाम सतत पिकांच्या उत्पादनावर होत आहे. तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही दरवर्षी बिकट होत चालला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घ्या, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष निलेश नाहटा यांनी केले.

ठळक मुद्देपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घ्या - निलेश नाहटागणेश विसर्जन दरम्यान ३ हजार झाडाचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : दिवसेंदिवस झाडे तोडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल दरवर्षी बिघडत चालला आहे. परिणाम पाऊस, पडण्यासाठी वातावरण तयार होत नसल्याने दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. याचा परिणाम सतत पिकांच्या उत्पादनावर होत आहे. तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही दरवर्षी बिकट होत चालला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घ्या, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष निलेश नाहटा यांनी केले. जानेफळ येथे  झालेल्या बुधवारी एका कार्यक्रमात नाहटा बोलत होते. गणेश विसर्जन दरम्यान लोकमान्य टिळक गणेश मंडळ व वनविभाग यांच्या संकल्पनेतून ३ हजार झाडाचे प्रत्येक कुटूंबाला वितरण करण्यात आले. यावेळी झाडे वाटप करतांना गावातील महिला-पुरुष यांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी वनविभाग घाटबोरी क्षेत्राचे वनअधिकारी पाटील, सुभाष नागरे, निलेश नाहटा व गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांनी घरोघरी जावून झाडांचे वाटप केले. तर झाड लावून त्याचे काळजीने संगोपन करा, असे आवाहन केले. या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. दरम्यान  गावातील सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. तसेच लोकमान्य टिळक गणेश मंडळाच्यावतीने सतत दहा दिवस भक्तीमय व धार्मिक कार्यक्रम घेऊन अनेक समाज हिताचे उपक्रम राबविले. यावेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष उमेश सदावर्ते, उपाध्यक्ष मंटू राजुरकर, डॉ.श्रीकृष्ण काकडे, डॉ.सुभाष गट्टाणी, भिमराव उंबरकर, गणेश अक्कर, रतनलाल मंगी, सुभाष अक्कर, प्रकाश जोशी, निलेश मुळे, मोतीराम चांगाडे, राजु पाखरे, संतोष सुरडकर, निलेश महाजन, सागर मोरे, संदीप मुरडकर, साधना पाखरे, संगिता इंगळे, नंदाबाई चांगाडे, गोपाल गट्टाणी, वनपाल सुभाष नागरे, अ‍ॅड.काळे, गजानन दुतोंडे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.