शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पीक कर्जाचे १२ टक्केच वाटप

By admin | Updated: June 6, 2015 00:57 IST

राष्ट्रीयकृत बँकांचा खो; पुनर्गठनालाही लागणार वेळ.

बुलडाणा: मान्सून उंबरठय़ावर येऊन ठेपला आहे. पेरणीपूर्व मशागत आटोपली असताना शेतकर्‍यांना बी-बियाणे, खते, पेरणीसाठी पीककर्जाची नितांत गरज आहे. जिल्हाधिकारी यांनी पीककर्ज वाटपाचे नियोजन करून देत प्रत्येक बँकेला उद्दिष्ट दिले आहे; मात्र ३१ मे पर्यंत केवळ १२ टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे. राष्ट्रीयीकृत बँका व ग्रामीण बँकांनी पीककर्ज वाटपाला चालना दिली नाही. जिल्ह्यात १ हजार २५0 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे नियोजन असून, आतापर्यंत केवळ १५५ कोटी रुपयांचे खरीप पीककर्जाचे वाटप केले आहे. हे प्रमाण केवळ १२ टक्के एवढेच आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांनी आतापर्यंत केवळ १0 टक्के आणि ग्रामीण बँकांनी १२ टक्के कर्जवाटप केले आहे. खरीप २0१५-१६ करिता १२५0 कोटी इतका पीककर्ज वाटपाचा लक्षांक आहे. या तुलनेत २४ हजार १0२ शेतकर्‍यांना १५५ कोटी ८ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. हे एकूण उद्दिष्टांच्या केवळ २६ टक्के इतके आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना खरिपासाठी १२५0 कोटी रुपयांचा लक्षांक देण्यात आला आहे. त्या तुलनेत २४ हजार १0२ शेतकर्‍यांनाच १५५ कोटी ८ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे; मात्र आतापर्यंत करण्यात आलेले कर्ज वाटप अत्यल्प असल्यामुळे येणार्‍या हंगामाच्या तयारीसाठी शेतकर्‍यांना अडचणी येत आहेत.

*१५ जूनपर्यंत कर्जाचे पुनर्गठन अशक्य

मागील वर्षातील कर्जाचे पुनर्गठन पाच वर्षांसाठी १५ जूनच्या आत करण्यात येणार आहे. यासाठी राज्यशासनाचे आदेश तसेच नाबार्ड भारतीय रिझर्व बँक यांचे निर्देश आहेत. तथापि, बँकांची कर्जवाटपाची आजची स्थिती पाहता पुनर्गठन प्रक्रिया रखडलेली दिसून येत आहे.

*केवळ सहा कोटी रुपयांचे पुनर्गठन

    मागील वर्षातील कर्जाचे पुनर्गठन पाच वर्षासाठी १५ जूनच्या आत करण्यात यावे, असे आदेश असताना कर्मशियल बँकांचे कर्जवाटप उशिरा होते. कर्मशियल बँका पुनर्गठनाला वेळ लावतात, त्यामुळे हा कर्जवाटपाचा फरक आहे. मागील कर्जाचे पुनर्गठन १५ जूनपयर्ंत करण्याचे आदेश असताना वेळेच्या आत पुनर्गठन होईल किंवा नाही, याबाबत शंका आहे.