शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

प्रवासी निवाऱ्याअभावी नागरिकांची गैरसोय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 17:42 IST

देऊळगावमही : परिसरातील जवळपास ४० खेडे जोडलेल्या देऊळगावमही येथे प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागत आहे. उन्हात उभे राहून बसची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहलेला नाही.

ठळक मुद्दे. देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगावमही ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. जवळपास ४० खेडे देऊळगावमहीशी जोडलेले आहेत. येथे प्रवासी निवारा व्हावा यासाठी पाहिजे तसा पाठपुरावा केल्याचे दिसत नाही.

देऊळगावमही : परिसरातील जवळपास ४० खेडे जोडलेल्या देऊळगावमही येथे प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागत आहे. उन्हात उभे राहून बसची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहलेला नाही. साधारण दीड महिन्याआधी ग्रांमचायतीने प्रवासी निवाºयासाठी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या ८२ आर जागेचा ठराव मंजूर केला होता. परंतू अद्यापही यासंदर्भात कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. देऊळगावमही येथे १९९९ मध्ये रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे येथील प्रवासी निवारा उध्वस्त करण्यात आला. तेंव्हापासून आजपर्यंत येथे प्रवासी निवारा नाही. देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगावमही ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. जवळपास ४० खेडे देऊळगावमहीशी जोडलेले आहेत. येथून हजारोंच्या संख्येने लोक प्रवास करतात. येथून इंदौर, सुरत, नागपूर, अमरावती, अकोला ,यवतमाळ, खामगाव, बुलडाणा, मलकापूर, जळगाव खान्देश, शेगाव, जालना ,औरंगाबाद, कोल्हापूर , सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर , शिर्डी , लातूर , पंढरपूर, तुळजापूर, पैठण, बीड, उस्मानाबाद, हैद्राबाद, म्हैसूर, कोकण, गोवासाठी प्रवासी जातात. मात्र येथे प्रवाशांना कोणतीच सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. येथून जखमी किंवा आजारी रुग्णाला उपचारासाठी जालना, औरंगाबाद ,बुलडाणा, चिखली जावे लागते. प्रवासी निवारा नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. देऊळगावमहीतील पुढाºयांमध्ये याबाबत उदासिनता दिसून येते. येथे प्रवासी निवारा व्हावा यासाठी पाहिजे तसा पाठपुरावा केल्याचे दिसत नाही. काही दिवसांपुर्वी भाजपचे शहराध्यक्ष कैलास राऊत यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना यासंदर्भात निवेदन दिले. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनाही निवेदन देण्यात आले. परंतू कुठलीच कारवाई झाली नाही.

सामूहिक पाठपुरावा आवश्यक

सिंदखेडराजाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी प्रवासी निवाºयासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र ग्रांमचायत व गावकºयांच्या सहकार्याशिवाय हे काम पूर्ण होऊ शकत नाही. ग्रांमचायतीने त्यासाठी लागणारी कागदपत्रे पुर्ण करुन आमदार खेडेकर यांच्याकडे देणे गरजेचे आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागू शकतो. स्थानिक राजकारण बाजूला ठेवून सामूहिक पाठपुरावा करणे आवश्यक आहे. देऊळगावमही येथे प्रवासी निवारा कसा होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDeulgaon Rajaदेऊळगाव राजा