शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

प्रवासी निवाऱ्याअभावी नागरिकांची गैरसोय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 17:42 IST

देऊळगावमही : परिसरातील जवळपास ४० खेडे जोडलेल्या देऊळगावमही येथे प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागत आहे. उन्हात उभे राहून बसची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहलेला नाही.

ठळक मुद्दे. देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगावमही ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. जवळपास ४० खेडे देऊळगावमहीशी जोडलेले आहेत. येथे प्रवासी निवारा व्हावा यासाठी पाहिजे तसा पाठपुरावा केल्याचे दिसत नाही.

देऊळगावमही : परिसरातील जवळपास ४० खेडे जोडलेल्या देऊळगावमही येथे प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागत आहे. उन्हात उभे राहून बसची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहलेला नाही. साधारण दीड महिन्याआधी ग्रांमचायतीने प्रवासी निवाºयासाठी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या ८२ आर जागेचा ठराव मंजूर केला होता. परंतू अद्यापही यासंदर्भात कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. देऊळगावमही येथे १९९९ मध्ये रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे येथील प्रवासी निवारा उध्वस्त करण्यात आला. तेंव्हापासून आजपर्यंत येथे प्रवासी निवारा नाही. देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगावमही ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. जवळपास ४० खेडे देऊळगावमहीशी जोडलेले आहेत. येथून हजारोंच्या संख्येने लोक प्रवास करतात. येथून इंदौर, सुरत, नागपूर, अमरावती, अकोला ,यवतमाळ, खामगाव, बुलडाणा, मलकापूर, जळगाव खान्देश, शेगाव, जालना ,औरंगाबाद, कोल्हापूर , सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर , शिर्डी , लातूर , पंढरपूर, तुळजापूर, पैठण, बीड, उस्मानाबाद, हैद्राबाद, म्हैसूर, कोकण, गोवासाठी प्रवासी जातात. मात्र येथे प्रवाशांना कोणतीच सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. येथून जखमी किंवा आजारी रुग्णाला उपचारासाठी जालना, औरंगाबाद ,बुलडाणा, चिखली जावे लागते. प्रवासी निवारा नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. देऊळगावमहीतील पुढाºयांमध्ये याबाबत उदासिनता दिसून येते. येथे प्रवासी निवारा व्हावा यासाठी पाहिजे तसा पाठपुरावा केल्याचे दिसत नाही. काही दिवसांपुर्वी भाजपचे शहराध्यक्ष कैलास राऊत यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना यासंदर्भात निवेदन दिले. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनाही निवेदन देण्यात आले. परंतू कुठलीच कारवाई झाली नाही.

सामूहिक पाठपुरावा आवश्यक

सिंदखेडराजाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी प्रवासी निवाºयासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र ग्रांमचायत व गावकºयांच्या सहकार्याशिवाय हे काम पूर्ण होऊ शकत नाही. ग्रांमचायतीने त्यासाठी लागणारी कागदपत्रे पुर्ण करुन आमदार खेडेकर यांच्याकडे देणे गरजेचे आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागू शकतो. स्थानिक राजकारण बाजूला ठेवून सामूहिक पाठपुरावा करणे आवश्यक आहे. देऊळगावमही येथे प्रवासी निवारा कसा होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDeulgaon Rajaदेऊळगाव राजा