शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

डिग्रस-देऊळगावमही रस्ता गेला खड्ड्यांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:27 IST

देऊळगावमही : परिसरात गत काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन हाेत असून, वाहतूक हाेत आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक ...

देऊळगावमही : परिसरात गत काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन हाेत असून, वाहतूक हाेत आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक हाेत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी माेठमाेठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये गावातील सांडपाणी साचले असून, डासांची उत्पत्ती हाेत आहे. त्यामुळे या परिसरातील रेतीचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

डिग्रस बु. येथील खडकपूर्णा नदीच्या पात्रातून गत काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन हाेत आहे. उत्खनन केलेल्या रेतीचे माेठ्या टिप्परच्या माध्यमातून वाहतुक करण्यात येत आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक हाेत असल्याने डिग्रस-देऊळगावमही रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी माेठमाेठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याने वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमध्ये गावातील घाण पाणी साचले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे १८ डिसेंबर राेजी ट्रॅक्टर (क्रमांक एमएच २८ डी ९०३४) खड्ड्यांमुळे उलटला. रस्त्याच्या बाजूलाच लहान सात ते आठ मुले खेळत होते. त्यांच्या जवळच हा अपघात घडला. खड्ड्यांमुळे या रस्त्यावर अपघातात वाढ झाली आहे. याकडे लक्ष देत तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच वाळू वाहतुकीस बंदी घालण्याची मागणी

डिग्रस बू येथील माजी सरपंच सैय्यद रशीद सैय्यद लतीफ, माजी उपसरपंच भगवान खुशालराव पाटील , माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण मामा पऱ्हाड,विष्णुपंत वखरे,सैय्यद मुश्ताक सैय्यद पाशू,रमेश नारायण वाघ, पांडुरंग खुशालराव पाटील,ग्रामपंचायत सदस्य बळीराम मान्टे, माजी तंटामुक्त अध्यक्ष फकिरा गोविंद वाळ यांनी पालकमंत्री ना.डाॅ.राजेंद्र शिंगणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

रात्रंदिवस टिप्परने वाळूची वाहतूक

परिसरात दिवसरात्र जवळपास शंभर ते दीडशे टिप्पर रेतीची वाहतूक करीत आहेत.परिसरातील रस्त्याची क्षमता नसतानाही त्यावर माेठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन हाेत आहे. महसूल विभागाच्या वतीने थातूरमातूर कारवाई हाेत असल्याने रेती माफियांचा मनोबल वाढलेले आहे. शासनाचा काेट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.