शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

भाजपच्या कथनी आणि करणीत फरक - वामनराव चटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 13:05 IST

महाराष्ट्र हे दिवाळखोरीत निघालेले राज्य असून महाराष्ट्राला पोसण्यासाठीच विदर्भाला बळीचा बकरा बनविण्यात येत असल्याचे माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप यांनी येथे स्पष्ट केले.

ठळक मुद्देविदर्भ राज्य आंदोलन समितीने पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाची हाक दिली आहे.विविध राजकीय पक्षासह सामाजिक संघटनांचाही पाठींबा मिळत असल्याचे  शेतकरी नेते तथा माजी आमदार वामनराव चटप यांनी येथे सांगितले.ओठात एक आणि पोटात दुसरे’ हाच प्रत्यय भाजप सरकारच्या कारकिर्दीत येत आहे.

खामगाव : राज्यातील सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कथनी आणि करणीत फरक आहे.  विरोधी पक्षात असताना विदर्भ राज्याची मागणी करणाºया भाजपकडून आता या मागणीला हुलकावणी दिल्या जात आहे. त्यामुळेच विदर्भ राज्याच्या निर्मितीला विलंब होत आहे. महाराष्ट्र हे दिवाळखोरीत निघालेले राज्य असून महाराष्ट्राला पोसण्यासाठीच विदर्भाला बळीचा बकरा बनविण्यात येत असल्याचे माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप यांनी येथे स्पष्ट केले. विदर्भ राज्य आंदोलन समितीने पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाची हाक दिली आहे. येत्या ४ जुलै रोजी नागपूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला विदर्भ राज्यासाठी सकारात्मक असलेल्या विविध राजकीय पक्षासह सामाजिक संघटनांचाही पाठींबा मिळत असल्याचे  शेतकरी नेते तथा माजी आमदार वामनराव चटप यांनी येथे सांगितले.  खामगाव शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत  होते. यावेळी चटप म्हणाले की, सद्या केंद्रात आणि राज्यातील भाजपच्या नेतृत्वातील सरकार हे अतिशय महत्वाकांक्षी सरकार आहे. स्वत:च्या मित्रपक्षासह इतरांनाही गिळंकृत करण्याची त्यांची मनिषा आहे. याच भावनेतून शिवसेनेलाही भाजपकडून कोंडीत पकडण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले जाताहेत. विदर्भ राज्याच्या बाबतीतही भाजपची भूमिका साफ नाही. ‘ओठात एक आणि पोटात दुसरे’ हाच प्रत्यय भाजप सरकारच्या कारकिर्दीत येत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांसोबतच शेतकरीही भरडल्या जात आहे. 

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरात घेण्याचा शासनाचा प्रयत्न म्हणजे विदर्भ राज्य मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन निष्फळ ठरविण्याचा, या आंदोलनातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न होय, असा सनसणाटी आरोपही चटप यांनी यावेळी केला. विदर्भाचा वाढता अनुशेष भरून काढण्यात हे सरकार अपयशी ठरले असून विदर्भातील कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी विदर्भ  राज्य निर्मितीसाठी ४ जुलैला नागपूर बंदची हाक दिली आहे. त्यादृष्टीकोनातून जिल्हा निहाय पदाधिकाºयांच्या जबाबदारी निश्चित करण्यात आल्या असल्याचेही चटप यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला महिला आघाडीच्या पश्चिम विदर्भ प्रमुख रंजना मामर्डे, कैलास फाटे, रमेशसिंह चव्हाण, राजू नाकाडे, डिंगाबर चिंचोले, अमित तायडे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुरेश वानखडे, तेजराव मुंडे, दामोदर शर्मा यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :khamgaonखामगावWamanrao Chatapवामनराव चटप