शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

भाजपच्या कथनी आणि करणीत फरक - वामनराव चटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 13:05 IST

महाराष्ट्र हे दिवाळखोरीत निघालेले राज्य असून महाराष्ट्राला पोसण्यासाठीच विदर्भाला बळीचा बकरा बनविण्यात येत असल्याचे माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप यांनी येथे स्पष्ट केले.

ठळक मुद्देविदर्भ राज्य आंदोलन समितीने पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाची हाक दिली आहे.विविध राजकीय पक्षासह सामाजिक संघटनांचाही पाठींबा मिळत असल्याचे  शेतकरी नेते तथा माजी आमदार वामनराव चटप यांनी येथे सांगितले.ओठात एक आणि पोटात दुसरे’ हाच प्रत्यय भाजप सरकारच्या कारकिर्दीत येत आहे.

खामगाव : राज्यातील सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कथनी आणि करणीत फरक आहे.  विरोधी पक्षात असताना विदर्भ राज्याची मागणी करणाºया भाजपकडून आता या मागणीला हुलकावणी दिल्या जात आहे. त्यामुळेच विदर्भ राज्याच्या निर्मितीला विलंब होत आहे. महाराष्ट्र हे दिवाळखोरीत निघालेले राज्य असून महाराष्ट्राला पोसण्यासाठीच विदर्भाला बळीचा बकरा बनविण्यात येत असल्याचे माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप यांनी येथे स्पष्ट केले. विदर्भ राज्य आंदोलन समितीने पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाची हाक दिली आहे. येत्या ४ जुलै रोजी नागपूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला विदर्भ राज्यासाठी सकारात्मक असलेल्या विविध राजकीय पक्षासह सामाजिक संघटनांचाही पाठींबा मिळत असल्याचे  शेतकरी नेते तथा माजी आमदार वामनराव चटप यांनी येथे सांगितले.  खामगाव शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत  होते. यावेळी चटप म्हणाले की, सद्या केंद्रात आणि राज्यातील भाजपच्या नेतृत्वातील सरकार हे अतिशय महत्वाकांक्षी सरकार आहे. स्वत:च्या मित्रपक्षासह इतरांनाही गिळंकृत करण्याची त्यांची मनिषा आहे. याच भावनेतून शिवसेनेलाही भाजपकडून कोंडीत पकडण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले जाताहेत. विदर्भ राज्याच्या बाबतीतही भाजपची भूमिका साफ नाही. ‘ओठात एक आणि पोटात दुसरे’ हाच प्रत्यय भाजप सरकारच्या कारकिर्दीत येत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांसोबतच शेतकरीही भरडल्या जात आहे. 

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरात घेण्याचा शासनाचा प्रयत्न म्हणजे विदर्भ राज्य मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन निष्फळ ठरविण्याचा, या आंदोलनातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न होय, असा सनसणाटी आरोपही चटप यांनी यावेळी केला. विदर्भाचा वाढता अनुशेष भरून काढण्यात हे सरकार अपयशी ठरले असून विदर्भातील कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी विदर्भ  राज्य निर्मितीसाठी ४ जुलैला नागपूर बंदची हाक दिली आहे. त्यादृष्टीकोनातून जिल्हा निहाय पदाधिकाºयांच्या जबाबदारी निश्चित करण्यात आल्या असल्याचेही चटप यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला महिला आघाडीच्या पश्चिम विदर्भ प्रमुख रंजना मामर्डे, कैलास फाटे, रमेशसिंह चव्हाण, राजू नाकाडे, डिंगाबर चिंचोले, अमित तायडे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुरेश वानखडे, तेजराव मुंडे, दामोदर शर्मा यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :khamgaonखामगावWamanrao Chatapवामनराव चटप