शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या कथनी आणि करणीत फरक - वामनराव चटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 13:05 IST

महाराष्ट्र हे दिवाळखोरीत निघालेले राज्य असून महाराष्ट्राला पोसण्यासाठीच विदर्भाला बळीचा बकरा बनविण्यात येत असल्याचे माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप यांनी येथे स्पष्ट केले.

ठळक मुद्देविदर्भ राज्य आंदोलन समितीने पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाची हाक दिली आहे.विविध राजकीय पक्षासह सामाजिक संघटनांचाही पाठींबा मिळत असल्याचे  शेतकरी नेते तथा माजी आमदार वामनराव चटप यांनी येथे सांगितले.ओठात एक आणि पोटात दुसरे’ हाच प्रत्यय भाजप सरकारच्या कारकिर्दीत येत आहे.

खामगाव : राज्यातील सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कथनी आणि करणीत फरक आहे.  विरोधी पक्षात असताना विदर्भ राज्याची मागणी करणाºया भाजपकडून आता या मागणीला हुलकावणी दिल्या जात आहे. त्यामुळेच विदर्भ राज्याच्या निर्मितीला विलंब होत आहे. महाराष्ट्र हे दिवाळखोरीत निघालेले राज्य असून महाराष्ट्राला पोसण्यासाठीच विदर्भाला बळीचा बकरा बनविण्यात येत असल्याचे माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप यांनी येथे स्पष्ट केले. विदर्भ राज्य आंदोलन समितीने पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाची हाक दिली आहे. येत्या ४ जुलै रोजी नागपूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला विदर्भ राज्यासाठी सकारात्मक असलेल्या विविध राजकीय पक्षासह सामाजिक संघटनांचाही पाठींबा मिळत असल्याचे  शेतकरी नेते तथा माजी आमदार वामनराव चटप यांनी येथे सांगितले.  खामगाव शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत  होते. यावेळी चटप म्हणाले की, सद्या केंद्रात आणि राज्यातील भाजपच्या नेतृत्वातील सरकार हे अतिशय महत्वाकांक्षी सरकार आहे. स्वत:च्या मित्रपक्षासह इतरांनाही गिळंकृत करण्याची त्यांची मनिषा आहे. याच भावनेतून शिवसेनेलाही भाजपकडून कोंडीत पकडण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले जाताहेत. विदर्भ राज्याच्या बाबतीतही भाजपची भूमिका साफ नाही. ‘ओठात एक आणि पोटात दुसरे’ हाच प्रत्यय भाजप सरकारच्या कारकिर्दीत येत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांसोबतच शेतकरीही भरडल्या जात आहे. 

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरात घेण्याचा शासनाचा प्रयत्न म्हणजे विदर्भ राज्य मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन निष्फळ ठरविण्याचा, या आंदोलनातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न होय, असा सनसणाटी आरोपही चटप यांनी यावेळी केला. विदर्भाचा वाढता अनुशेष भरून काढण्यात हे सरकार अपयशी ठरले असून विदर्भातील कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी विदर्भ  राज्य निर्मितीसाठी ४ जुलैला नागपूर बंदची हाक दिली आहे. त्यादृष्टीकोनातून जिल्हा निहाय पदाधिकाºयांच्या जबाबदारी निश्चित करण्यात आल्या असल्याचेही चटप यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला महिला आघाडीच्या पश्चिम विदर्भ प्रमुख रंजना मामर्डे, कैलास फाटे, रमेशसिंह चव्हाण, राजू नाकाडे, डिंगाबर चिंचोले, अमित तायडे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुरेश वानखडे, तेजराव मुंडे, दामोदर शर्मा यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :khamgaonखामगावWamanrao Chatapवामनराव चटप