शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, तसेच रस्ते अपघातांमध्ये मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : काेरोना महामारीने जनजीवन ढवळून निघाले. अनेकांचे रोजगार गेले. अनेकांना प्राणसही मुकावे लागले. त्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : काेरोना महामारीने जनजीवन ढवळून निघाले. अनेकांचे रोजगार गेले. अनेकांना प्राणसही मुकावे लागले. त्यात भरीस भर रस्त्यांवरील अपघातांतही अनेकांचा मृत्यू ओढावला आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास मरण स्वस्त झाले काय, असे वाटू लागले आहे.

गत दीड वर्षांपासून कोरोना महामारीने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे. अनेकांचे जीवही कोरोना महामारीने गेले. संचारबंदी, लॉकडाऊन असले तरी रस्त्यावरील रहदारी कमी होऊन अपघात कमी होतील, असे वाटत होते. मात्र, गत काहीवर्षीच्या तुलनेत दाेन वर्षांत अपघात कमी झाले आहेत. मागील सहा महिन्यांत १९६ रस्ते अपघात झाले आहेत. यामध्ये १०० व्यक्तींनी या अपघातांत आपला जीव गमावला. गतवर्षी म्हणजे २९९ व्यक्तींनी जीव गमावला होता. २०१८ मध्ये ६४८ अपघात झाले हाेते. त्यामध्ये ३०४ जणांचा मृत्यू झाला हाेता तर ६२८ जण जखमी झाले हाेते. त्यामुळे, चालकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

लॉकडाऊनमध्ये अपघात झाले कमी, पण...

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र व राज्य सरकारने काहीकाळ संचारबंदीची घोषणा केली होती. त्यामुळे रहदारी कमी होऊन अपघात कमी होतील, असे वाटत होते. मात्र, लॉकडाऊन काळातही अपघातांची संख्या मोठी आहे. गत दीड वर्षांत रस्ते अपघातांत ३९९ जणांचा बळी गेला आहे. रस्त्यावर होणारे अपघात हा गंभीर विषय असून, अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतात.

पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धोका

अपघात वाहनांमध्ये होत असला तरी पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांनाही या अपघातांचा धोका आहे. रस्ता ओलांडताना किंवा रस्त्याच्या कडेला अज्ञात वाहनाने धडक दिल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांनाही धोका असल्याचे समोर आले आहे.

मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश

रस्ते अपघातात अनेकदा नियमांचा भंग होत असल्याचे दिसून येते. त्यात नियमांपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, मद्यप्राशन करणे, चुकीच्या साइडने वाहन चालविणे या बाबींचा समावेश असतो. ही चूक तरुणाई करत असल्याचे दिसते.

या ठिकाणी वाहने हळू चालवा

डाेणगावजवळील गाेहगाव फाटा, आरेगाव गाव फाटा येथे अपघात माेठ्या प्रमाणात घडले आहेत. त्यामुळे, वाहनधारकांनी या दाेन्ही मार्गावर वाहने हळू चालविण्याची गरज आहे.

वेग मर्यादाचे अनेक चालन पालन करत नसल्याने अपघात हाेत आहेत.

वाहने चालवताना चालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. नियमांचे पालन केल्यास अपघात टळू शकतात. सजग राहून वाहने चालवावे.

-

वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येऊ शकतात.

-