शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता संवाद यात्रा!

By admin | Updated: May 26, 2017 01:35 IST

कृषी मंत्र्यांनी अंभोडा येथे साधला शेतकऱ्यांशी संवाद : पीक कर्जासह विविध विषयांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : भाजप सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात व त्यांनी त्याचा लाभ घ्यावा, याकरिता शेतकरी संवाद यात्रा सुरू करण्यात आली असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी गुरुवारी केले.जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी २५ मे २०१७ रोजी तालुक्यातील अंभोडा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी कृषी निविष्ठा पुरविणे, दर्जेदार व बीज प्रक्रिया केलेल्या बियान्यांचा वापर, कृषी कर्ज व पीक विमा आदी विषयांवर शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जि.प. अध्यक्ष उमाताई तायडे, माजी आमदार धृपदराव सावळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले की, कर्ज माफीसंदर्भात योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी व उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान राबविण्याचे ठरविले आहे. शेतकरी बांधवांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे, तसेच पिकांच्या होणाऱ्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण प्राप्त करण्यासाठी, कृषी पीक विमा योजनेचा लाभ घेतला पाहिजे. या योजनेत जास्तीत जास्त पिकांचा समावेश करण्यात आला असून, नुकसानासाठी त्वरित विमा मदत देण्यात येत आहे. ते म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानातून भूजलपातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. भूजलपातळी वाढल्यामुळे एक पीक घेणारा शेतकरी दुबार पीक घेत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळील नाले, बंधारे, यांचे खोलीकरण झाले की नाही, याची खात्री करून घ्यावी. यंदाच्या खरीप हंगामासाठी बीटी कापूस बियाणांसह अन्य बियाण्यांचा पर्याप्त साठा उपलब्ध आहे. खतांचीही कुठलीही कमतरता खरीप हंगामात जाणवणार नाही, याची काळजी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. ताफा अडवून शिवसेनेने दिले निवेदनशेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे देण्यात यावी, पेरणीपूर्वी कर्जमुक्ती करावी, शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा करावी, तुरीचा प्रश्न सोडवावा, आदी मागण्या घेऊन शिवसेनेचे संजय गायकवाड यांच्यासह लखन गाडेकर यांनी आज पालकमंत्र्यांचा ताफा अडवून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. शेतकऱ्यांना पेन्शन असावी, सापांपासून बचाव होण्यासाठी प्लास्टिक कोटेड सॉक्स व बुट अनुदान तत्त्वावर देण्यात यावे, अन्यथा बुलडाणा शिवसेनेच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.