शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

मधुमेहाच्या रुग्णांना ‘कोरोना’ संसर्गाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 10:34 IST

संसर्ग टाळण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

- योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मधुमेहाच्या रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते. यामुळे या आजाराच्या रुग्णांना ‘कोरोना’ संसर्गाची सर्वाधिक भीती आहे. संसर्ग टाळण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.सध्या ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातही हा आकडा २१ वर पोहचला होता. यापैकी एकाचा मृत्यू झाला असून ७ रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जगभरात आतापर्यंत ‘कोरोना’मुळे झालेल्या मृतकांमध्ये मधुमेह व तत्सम आजाराच्या रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. या पृष्ठभूमीवर मधुमेह असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण इतर रुग्ण किंवा निरोगी व्यक्तींच्या तुलनेत या रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता अतिशयक कमी असते. त्यांना प्रादुर्भावाचा धोका मोठ्या प्रमाणात संभवतो. हा धोका टाळण्यासाठी या रुग्णांनी साधा ताप, सर्दी किंवा खोकला आल्यास तत्काळ औषधोपचार घ्यावा. मधुमेह आटोक्यात आहे किंवा नाही याची खातरजमा करावी. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांनी ठरवून दिलेले औषध न चुकता नियमितपणे घेत पथ्य पाळणेही महत्त्वाचे ठरते. सध्या ‘लॉकडाउन’मुळे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणे शक्य नसले तरी घरातच ही प्रक्रिया करावी. नियमित व्यायाम, योगासन, प्राणायाम केल्यास मधुमेहाचे रुग्ण इतर रुग्णांपेक्षा तंदुरुस्त राहू शकतात. शक्यतो बाहेर पडू नये, अत्यावश्यक कामासाठी बाहेर गेल्यास कोणत्याही वस्तुला स्पर्श करू नये, बाहेरून आल्यावर हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवावे आदी बाबींची खबरदारी मधुमेहाच्या रुग्णांनी घ्यावी, असे आवाहन मधुमेह तज्ज्ञ डॉ. अशोक बावस्कार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

५० पेक्षा जास्त वय असलेल्यांना अधिक धोकासध्याच्या धकाधकीच्या युगात मधुमेह हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. मात्र तरुण रुग्णांच्या तुलनेत ५० पेक्षा जास्त वय असलेल्यांना या आजाराचा धोका अधिक असतो. अशा रुग्णांनी या गंभीर ‘कोरोना’ आजारापासून स्तत:चा बचाव करण्यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य