शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

कामगार स्थलांतरामुळे विकास कामे अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 10:21 IST

समृद्धी महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील प्रशिक्षीत कामगारांचे (स्कील लेबर) लोंढे स्वगृही परतत आहे.

- नीलेश जोशी

बुलडाणा : कोरोना संसर्गाच्या उद्रेकांच्या पार्श्वभूमीवर जिगाव प्रकल्पासह समृद्धी महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील प्रशिक्षीत कामगारांचे (स्कील लेबर) लोंढे स्वगृही परतत आहे. परिणामी जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या विकास कामांची गती मंदावली आहे.समृद्धी महामार्गावरील वाहनांचे टायर खराब झाल्याने साडेचारशे वाहनांपैकी ९० वाहने बंद अवस्थेत असल्याने या प्रकल्पाचेही जवळपास २० टक्के काम प्रभावीत झाले असून अशी स्थिची राष्ट्रीय महामार्गाच्या अकोला विभागातंर्गत येत असलेल्या सात कामांची झाली आहे. या सर्व कामावर देशातील जवळपास १९ राज्यातील चार हजार मजूर कार्यरत आहे.परिणामी या प्रकल्पांच्या कामामुळे गतीमान होऊ पाहणारे जिल्ह्यातील अर्थचक्रालाही फटका बसत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. जिगाव सारख्या प्रकल्पाला गेल्या आर्थिक वर्षात अपेक्षीत निधी न मिळाल्यामुळे भूसंपादनाची अनेक प्रकरणे व्यपगत होण्याच्या मार्गावर असतानाच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आता हा स्कील्ड लेबर वर्ग आपल्या गावी पलायन करत आहे. त्यातच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिगाव प्रकल्पातंर्गत सुरू असलेल्या काही कामे स्थानिक नागरिकांनी बंद पाडल्यामुळे तेथील मजुरांनी प्रारंभीच स्वगृहीचा रस्ता धरला होता. उरला सुरला लॉकडाउनचाही परिणाम त्यावर झाला. त्यानंतर ३० मार्चच्या आसपास अत्यावश्यक सेवेतंर्गत महत्वाकांक्षी प्रकल्पांची कामे सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. मात्र तोवर बराचसा मजूर वर्ग हा निघून गेला होता.आता जवळपास दीड महिन्यापासून लॉकडाउन सुरू असून देशातील कोरोना संसर्गाची एकंदर स्थिती पाहता बराचसा मजुर वर्ग हा घरी जात आहे. त्यामुळे विकास कामांची गती कायम राखण्याची समस्या निर्माण होत आहे. जिगाव प्रकल्पाचे समन्वयक कार्यकारी अभियंता सुनील चौधरी यांनीही यास दुजोरा दिला आहे.अकोला मंडळातंर्गत राष्ट्रीय महामार्गाची बुलडाणा जिल्ह्यात जवळपास सात कामे सुरू असून या कामावरील सुमारे २०० पेक्षा अधिक प्रशिक्षीत मजूर वर्ग हा यापूर्वीच निघून गेला आहे. त्यामुळे मान्सूनच्या तोंडावर या रस्त्यांच्या कामासह काही पुलांची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याची समस्या यंत्रणेसमोर उभी ठाकली आहे. अन्य महामार्गाचीही कामे यामुळे प्रभावीत होत आहे. मात्र सात कामावरील मजूर वर्ग हा स्वगृही परतला असल्याचे राष्ट्रीय महामार्गचे खामगाव विभागातील उप अभियंता के. बी. दंडगव्हाळ यांनी सांगितले.जिगाव प्रकल्पावरही उंचीवरील सेंट्रींगची कामे करणारा प्रशिक्षीत कामगार वर्ग परत जात असल्याने या कामांना फटका बसत आहे. त्यामुळे मुख्य धरणाच्या ठिकाणी कामे प्रभावीत होत आहे.सहा एप्रिल रोजीच उत्तर प्रदेशातील ५०१ मजूर हे श्रमजीवी एक्सप्रेसद्वारे भुसावळवरून लखनऊसाठी रवाना झाले आहे. राज्य शासनाने परराज्यातील मजुरांना त्यांच्या स्वगृही जाण्यासाठी व्यवस्था करणे सुरू केल्यामुळे वर्तमान स्थितीत कामावर असलेल्या अनेक मजुरांना आता गावाकडे वेध लागले आहे.‘समृद्धी’ वरील ९० वाहने उभीसमृद्धी महामार्गाच्या कामावरील अप्रशिक्षीत मजूर वर्ग सध्या काम उपलब्ध झाल्याने खूश असला तरी कामाची व्यापकता पाहता बुलडाण्यातील दोन पॅकेजतंर्गत कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ४५० वाहनांपैकी ९० वाहने टायर खराब झाल्याने बंद पडली आहे. परिणामी कामाला फटका बसत आहे. औरंगाबादसह, अकोला व अन्य ठिकाणची टायरची दुकाने बंद आहेत. औरंगाबाद रेडझोन असल्याने तेथून बुलडाण्यात टायर घेऊन वाहन येत नसल्याची अडचण आहे. समृद्धी महामार्गावर दोन पॅकेजमध्ये सुमारे तीन हजार मजूर काम करत आहे. या दोन्ही पॅकेजमधील ३६ मजुरांनी स्वगृही परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या कामावर सध्या ट्रक चालक, अवजड यंत्र हाताळणारे प्रशिक्षीत कामगारांची कमतरता आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग