शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

ग्राम विकासामुळेच देशाचा विकास - प्रतापराव जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 15:09 IST

नव्या पदाधिकाऱ्यांनी जि. प. च्या माध्यमातून लोकांच्या अपेक्षांवर पूर्णपणे उतरावे, असे आवाहन ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खा. प्रतापराव जाधव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आपला देश ग्रामीण भागांचा आहे. जोपर्यंत ग्रामविकास साधल्या जाणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास होवू शकत नाही. त्यामुळे कामांचा दर्जा राखून नव्या पदाधिकाऱ्यांनी जि. प. च्या माध्यमातून लोकांच्या अपेक्षांवर पूर्णपणे उतरावे, असे आवाहन ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खा. प्रतापराव जाधव यांनी केले.जिल्हा परिषदच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात १३ जानेवारी रोजी निवनिर्वाचित जि.प. उपाध्यक्षा कमलताई बुधवत यांच्या पदग्रहन सभारंभात ते बोलत होते. यावेळी जि. प. अध्यक्षा मनिषाताई पवार, आ. संजय गायकवाड, जि. प. सभापती दिनकरराव देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कृ.उ.बा.समिती सभापती जालिंधर बुधवत, माजी जि. प. अध्यक्ष नरेंद्र खेडेकर, लक्ष्मणराव घुमरे, माजी जि.प. उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, मंगलताई रायपुरे, मनोज कायंदे, गट नेते आशिष रहाटे, माजी सभापती रियाज खॉन पठाण, जि. प. सदस्य शिल्पाताई शिंपणे यांचेसह जि. प. सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. खा. प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेला तुटपूंजा निधी मिळतो. त्यातुन केलेल्या कामांचा दर्जा राखल्या जात नाही. रस्ते, नळयोजना, दवाखाने, शाळा इमारती याबाबत लोकांची मत जाणुन घेवुन काम करा कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. नव्या पदाधिकाºयांनी जलदगतीने ग्रामविकास साधण्यावर जोर द्यावा. यासाठी केंद्रीय ग्रामविकास समितीचा अध्यक्ष या नात्याने सकारात्मक स्वरुपात पाठीशी राहणार असल्याची ग्वाही खा. प्रतापराव जाधव यांनी दिली. महिला घर, कुटुंब चांगले सांभाळतात याच महिला जिल्हाही चांगला सांभळतील, असेही खा. प्रतापराव जाधव म्हणाले. प्रास्तविक शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPrataprao Jadhavप्रतावराव जाधव