शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

खामगावची संवेदनशील शहर ही ओळख पुसण्याचा निर्धार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 14:40 IST

खामगाव: एक संवेदनशील शहर म्हणूनच ‘खामगाव’ला ओळखल्या जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत या शहरातील नागरिकांनी आपला ‘इतिहास’बदलला. शहराची ‘शांती’च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सर्व-धर्माचे नागरिक गुण्या गोविंदाने राहत आहेत. ही सकारात्मक आणि आनंददायी बाब असल्याचे शहरातील सर्व धर्मिय नागरिकांनी ‘अधोरेखीत’ केले. 

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: एक संवेदनशील शहर म्हणूनच ‘खामगाव’ला ओळखल्या जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत या शहरातील नागरिकांनी आपला ‘इतिहास’बदलला. शहराची ‘शांती’च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सर्व-धर्माचे नागरिक गुण्या गोविंदाने राहत आहेत. ही सकारात्मक आणि आनंददायी बाब असल्याचे शहरातील सर्व धर्मिय नागरिकांनी ‘अधोरेखीत’ केले. 

धार्मिक सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाच्या शनिवारी सायंकाळी खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये शांतता समितीची सभा पार पडली. या सभेतील मान्यवरांच्या मनोगतांचे ‘चिंतन’ आणि ‘मंथन’ केल्यास; ही सभा की साहित्य मैफल असाच प्रश्न अनेकांना पडवा!

प्रत्येकाला सकारात्मकतेच्या एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवणारी उच्च कोटीची ‘शांती प्रिय आणि कुटूंब वत्सल’सदस्यांचीच ही ‘मैफल’ असे म्हटल्यास अतिशोक्ती ठरणार नाही. शांतता समिती सदस्यांपासून तर व्यासपीठावरील मान्यवरांपर्यंत प्रत्येकानेच या सभेला आपल्या पराकोटीच्या सकारात्मक विचारांनीच एक वेगळीच उंची मिळवून दिली. शांतता समितीच्या सदस्यांच्या विचारांनी आपण भारावलो आहोत; यापुढे शांतता समितीची सभा नव्हे, तर कुटुंब वत्सल शांती प्रिय सदस्यांची ‘बैठक’असाच उल्लेख या सभेचा करावा. अशी आपली रास्त आणि जाहीर अपेक्षा मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी याठिकाणी व्यक्त केली. भगवत गीतेतील श्लोकांपासून तर उत्कृष्ट हिंदी-उर्दू शेरो शायरींची संहिताच ही मैफल ठरली. मौलवी युनूस यांनी ‘किसीका प्यार भरा, दिल मत तोडो!’ या शेराने मैफलीला उंची पोहोचविली. ज्येष्ठ साहित्यीक रामदादा मोहिते यांनी प्रार्थना आणि दुवेसाठी उठणारे दोन्ही हात एकच आहे. जोडले तर प्रार्थना आणि फैलविले तर दुवा! असा ‘सरळ-सरळ’ संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला. साहित्यिक मुक्तेश्वर कुळकर्णी यांनी सर्वांच्या विचारपुष्पांना दुजोरा दिला. शांतता समिती सदस्य आणि प्रज्ञावंतांच्या सोबतीला येत प्रशासकीय अधिकाºयांनीही  ही मैफल गाजविली. जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी सभेच्या सुरूवातीलाच लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांना श्रध्दांजली अर्पण करून आपल्या कृतज्ञतेचा परिचय दिला. साध्या अडचणीसाठीही भेट घ्या, व्हॉटअप संदेश द्या, असे आवाहन करीत आपली सहज उपलब्धता स्पष्ट केली. त्याचवेळी नियम मोडणाºयांविरोधात प्रशासन आपली कारवाई करेल! असा गर्भीत इशारा दिला. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ असाच सार जिल्हाधिकाºयांच्या खामगावातील पहिल्याच ‘संवादा’चा होता.

धाकदपट करून रूबाब दाखविणारा. एकाद्यावेळी दंडुक्याचा प्रसाद देणारा अशीच छबी आजही समाजमनात आहेत. पोलिस निरिक्षक तर त्यापेक्षाही कितीतरी पटीने पुढे आहे. मात्र, शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरिक्षक देशमुख यांनी पोलिसांबद्दलचा हा समज खोडून काढला. बहारदार संचालनाने त्यांनी कार्यक्रमाला आपल्या शैलीतून उंची मिळवून दिली. शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष ताले  यांचे उत्कृष्ट ‘इव्हेंट’ मॅनेजमेंट या सभेत दिसून आले. त्यांना ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरिक्षक रफीक शेख आणि सहकाºयांची साथ मिळाली. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी प्रास्ताविकातून भूमिका विषद केली. तर अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे यांचे या संपूर्ण सभेच्या नियोजनामागील ‘नियंत्रण’दिसून आले.

 

जिल्हा पोलिस अधिक्षकांनी गाजविली सभा!

नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी शनिवारी पहिलीच सभा गाजविली. आपल्या भाषणात त्यांनी शेरो शायरी आणि  साहित्यांची गुंफन करीत विचार प्रक…

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव