शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदे असूनही शिक्षक भरती बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 00:13 IST

शिक्षण विभागात : हजारो पदवीधर बेरोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्यात प्राथमिक शिक्षकांची २ लाख ७३ हजार ८४३ पदे मंजूर असून, सध्या २ लाख ५८ हजार ५२० शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षक भरती २००९ च्या शिक्षण कायद्यानुसार रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे असतानाही भरती झालेली नाही. त्यामुळे राज्यभरातील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची १५ हजार ४२३ पदे रिक्त आहेत. दुसरीकडे लाखो पदवीधारक बेरोजगार असतानाही रिक्त पदे भरण्यात येत नाही. सन २०१० मध्ये १५ हजार १२ शिक्षक पदासाठी सीईटी घेण्यात आली होती. त्यामध्ये १ लाख ८५ हजार ८०० डी.एड्.धारकांनी सीईटी दिली होती; परंतु त्यानंतर राज्यात गेल्या सात वर्षांपासून शिक्षक भरतीच झालेली नाही. त्यामुळे लाखो डी.एड्., बी.एड्.धारकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. शिक्षक पदासाठी आवश्यक असलेला अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून, भावी शिक्षकांचा लोंढा बाहेर पडत आहे. शैक्षणिक पात्रता असलेले लाखो डीएड् व बीएड्धारक उमेदवार राज्यात आहेत. सन २०१० मध्ये शिक्षकांच्या १५ हजार १२ जागांसाठी सीईटी घेण्यात आली होती. त्यावेळी १ लाख ८५ हजार ८०० विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ हजार १२ विद्यार्थ्यांची निवड करून उर्वरित ७० हजार ७८८ भावी शिक्षक नोकरीपासून वंचित राहिले; मात्र त्यानंतर गेल्या सात वर्षात सीईटी परीक्षा झाली नाही आणि शिक्षक भरतीसुद्धा घेण्यात आली नाही. राज्यात शाळांमध्ये गुणात्मक व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने भावी शिक्षकांची सन २०१३ पासून टीईटीच्या माध्यमातून पुन्हा चाळणी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या टीईटीला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पहिल्याच वर्षी राज्यभरातून जवळपास ६ लाख २१ हजार उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली; मात्र आता शिक्षक भरतीच होत नसल्याने डी.एड्. व बी.एड्.धारकांचा टीईटी देण्याकडेही निरुत्साह दिसून येत आहे. राज्यात जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावरील रिक्त पदे असूनही डी.एड्., बी.एड्.धारकांना भरती प्र्रक्रियेची प्रतीक्षा करावी लागत आहे. शिक्षकांच्या रिक्त असणाऱ्या हजारो पदांसाठी तातडीने भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी बेरोजगार उमेदवारांकडून होत आहे. बेरोजगारांची संख्या वाढलीसात वर्षांपासून शिक्षक भरती न झाल्याने डी.एड्. व बी.एड्.धारकांची संख्या वाढली आहे. सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे राज्यभरात लाखोंच्या संख्येने असलेले बेरोजगार शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत.राज्य शासनाने रिक्त पदे भरण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांवर ताण येणार नाही, तसेच बेरोजगारांना रोजगारही मिळेल व शिक्षणाचा दर्जा सुधारेल.- प्रशांत खाचणेविभागीय अध्यक्ष, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी परिषद, बुलडाणा.