शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

रिक्त पदे असूनही शिक्षक भरती बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 00:13 IST

शिक्षण विभागात : हजारो पदवीधर बेरोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्यात प्राथमिक शिक्षकांची २ लाख ७३ हजार ८४३ पदे मंजूर असून, सध्या २ लाख ५८ हजार ५२० शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षक भरती २००९ च्या शिक्षण कायद्यानुसार रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे असतानाही भरती झालेली नाही. त्यामुळे राज्यभरातील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची १५ हजार ४२३ पदे रिक्त आहेत. दुसरीकडे लाखो पदवीधारक बेरोजगार असतानाही रिक्त पदे भरण्यात येत नाही. सन २०१० मध्ये १५ हजार १२ शिक्षक पदासाठी सीईटी घेण्यात आली होती. त्यामध्ये १ लाख ८५ हजार ८०० डी.एड्.धारकांनी सीईटी दिली होती; परंतु त्यानंतर राज्यात गेल्या सात वर्षांपासून शिक्षक भरतीच झालेली नाही. त्यामुळे लाखो डी.एड्., बी.एड्.धारकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. शिक्षक पदासाठी आवश्यक असलेला अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून, भावी शिक्षकांचा लोंढा बाहेर पडत आहे. शैक्षणिक पात्रता असलेले लाखो डीएड् व बीएड्धारक उमेदवार राज्यात आहेत. सन २०१० मध्ये शिक्षकांच्या १५ हजार १२ जागांसाठी सीईटी घेण्यात आली होती. त्यावेळी १ लाख ८५ हजार ८०० विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ हजार १२ विद्यार्थ्यांची निवड करून उर्वरित ७० हजार ७८८ भावी शिक्षक नोकरीपासून वंचित राहिले; मात्र त्यानंतर गेल्या सात वर्षात सीईटी परीक्षा झाली नाही आणि शिक्षक भरतीसुद्धा घेण्यात आली नाही. राज्यात शाळांमध्ये गुणात्मक व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने भावी शिक्षकांची सन २०१३ पासून टीईटीच्या माध्यमातून पुन्हा चाळणी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या टीईटीला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पहिल्याच वर्षी राज्यभरातून जवळपास ६ लाख २१ हजार उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली; मात्र आता शिक्षक भरतीच होत नसल्याने डी.एड्. व बी.एड्.धारकांचा टीईटी देण्याकडेही निरुत्साह दिसून येत आहे. राज्यात जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावरील रिक्त पदे असूनही डी.एड्., बी.एड्.धारकांना भरती प्र्रक्रियेची प्रतीक्षा करावी लागत आहे. शिक्षकांच्या रिक्त असणाऱ्या हजारो पदांसाठी तातडीने भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी बेरोजगार उमेदवारांकडून होत आहे. बेरोजगारांची संख्या वाढलीसात वर्षांपासून शिक्षक भरती न झाल्याने डी.एड्. व बी.एड्.धारकांची संख्या वाढली आहे. सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे राज्यभरात लाखोंच्या संख्येने असलेले बेरोजगार शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत.राज्य शासनाने रिक्त पदे भरण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांवर ताण येणार नाही, तसेच बेरोजगारांना रोजगारही मिळेल व शिक्षणाचा दर्जा सुधारेल.- प्रशांत खाचणेविभागीय अध्यक्ष, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी परिषद, बुलडाणा.