शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘डेडलाईन’ संपूनही बुलडाणा जिल्ह्यात महामार्गाची कामे अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 14:28 IST

मुदत संपून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी ही कामे रखडलेली असल्याचे दिसून येत आहे.

- योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात सध्या सात ठिकाणी महामार्गाची कामे सुरू आहेत. यापैकी चार ठिकाणच्या कामांची मुदत जून २०१९ मध्येच संपलेली आहे. परंतु अद्यापही कामे पूर्ण झालेली नाहीत. डेडलाईन संपूनही महामार्गाची कामे अर्धवटच राहिल्याने विकासाच्या वाटेत अडचणी निर्माण होत असून दळणवळणाच्या समस्येत वाढ झाली आहे.राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने जिल्ह्यात दोन टप्प्यात महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात जून २०१७ मध्ये चार ठिकाणी ही कामे हाती घेण्यात आली होती. यामध्ये मेहकर-चिखली ३९.७ किमी, चिखली-खामगाव ५६.१० किमी, खामगाव-शेगाव २२.८ किमी व अजिंठा-बुलडाणा ४९.१३ किमी तर दुसऱ्या टप्प्यात जून २०१८ मध्ये चिखली-टाकरखेड ३९.६० किमी, टाकरखेड-जालना ४०.२६ किमी, नांदुरा-जळगाव जामोद २५ किमी या रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला. यापैकी पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची मुदत जून २०१९ मध्येच संपली आहे. मात्र मुदत संपून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी ही कामे रखडलेली असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू झालेल्या या रस्त्याचे काम सुरुवातीपासूनच संथगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. अपघाताच्या घटनाही यामुळे घडल्या असून यामध्ये काहींना आपला जीवही गमवावा लागला असल्याचे वास्तव आहे.तर दुसºया टप्प्यात सुरू असलेल्या रस्त्यांचे काम देखील थंडावले असल्याचे चित्र आहे. यामुळे सबंधित रस्त्यावरून ये-जा करणाºया वाहनधारकांसह सर्व प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नांदुरा-जळगाव जामोद या मार्गावर तर खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पावसाळ्याच्या सुरुवातीला चिखल झाल्यामुळे वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. यामुळे सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागला.

काम मुदतीत पूर्ण न होण्याची कारणेमहामार्गाचे काम सिमेंट काँक्रीटीकरणाचे असल्याने या कामाला पाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासते. मात्र कामादरम्यान पाण्याची तूट जाणवल्याने अनेकवेळा काम बंद ठेवण्याची वेळ ओढवली. झाडांची कत्तल व जंगल परिसरातून जाणाºया रस्ता कामासाठी वन विभाग तर विद्युत खांब स्थलांतरणासाठी महावितरणकडून परवाना उशीरा मिळाल्याने अनेक ठिकाणी कामे विलंबाने झाली. इतरही अडचणी आल्याने महामार्गाचे काम विहित मुदतीत पूर्ण करणे शक्य झाले नसल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या रस्त्यांचे काम जवळपास ७० टक्क्यांपेक्षा जास्त तर दुसºया टप्प्यातील रस्त्यांचे काम ५० टक्के पूर्णत्वास गेले आहे. सर्व रस्त्यांची कामे वेगाने करण्यावर भर देण्यात येत आहे. वाहनधारकांना सध्या त्रास होत असला तरी येणाºया काळात या रस्त्याने त्यांनाच प्रवास करणे सुकर होईल.- के. बी. दंडगव्हाळ,उप अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाhighwayमहामार्ग