शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

‘डेडलाईन’ संपूनही बुलडाणा जिल्ह्यात महामार्गाची कामे अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 14:28 IST

मुदत संपून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी ही कामे रखडलेली असल्याचे दिसून येत आहे.

- योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात सध्या सात ठिकाणी महामार्गाची कामे सुरू आहेत. यापैकी चार ठिकाणच्या कामांची मुदत जून २०१९ मध्येच संपलेली आहे. परंतु अद्यापही कामे पूर्ण झालेली नाहीत. डेडलाईन संपूनही महामार्गाची कामे अर्धवटच राहिल्याने विकासाच्या वाटेत अडचणी निर्माण होत असून दळणवळणाच्या समस्येत वाढ झाली आहे.राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने जिल्ह्यात दोन टप्प्यात महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात जून २०१७ मध्ये चार ठिकाणी ही कामे हाती घेण्यात आली होती. यामध्ये मेहकर-चिखली ३९.७ किमी, चिखली-खामगाव ५६.१० किमी, खामगाव-शेगाव २२.८ किमी व अजिंठा-बुलडाणा ४९.१३ किमी तर दुसऱ्या टप्प्यात जून २०१८ मध्ये चिखली-टाकरखेड ३९.६० किमी, टाकरखेड-जालना ४०.२६ किमी, नांदुरा-जळगाव जामोद २५ किमी या रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला. यापैकी पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची मुदत जून २०१९ मध्येच संपली आहे. मात्र मुदत संपून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी ही कामे रखडलेली असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू झालेल्या या रस्त्याचे काम सुरुवातीपासूनच संथगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. अपघाताच्या घटनाही यामुळे घडल्या असून यामध्ये काहींना आपला जीवही गमवावा लागला असल्याचे वास्तव आहे.तर दुसºया टप्प्यात सुरू असलेल्या रस्त्यांचे काम देखील थंडावले असल्याचे चित्र आहे. यामुळे सबंधित रस्त्यावरून ये-जा करणाºया वाहनधारकांसह सर्व प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नांदुरा-जळगाव जामोद या मार्गावर तर खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पावसाळ्याच्या सुरुवातीला चिखल झाल्यामुळे वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. यामुळे सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागला.

काम मुदतीत पूर्ण न होण्याची कारणेमहामार्गाचे काम सिमेंट काँक्रीटीकरणाचे असल्याने या कामाला पाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासते. मात्र कामादरम्यान पाण्याची तूट जाणवल्याने अनेकवेळा काम बंद ठेवण्याची वेळ ओढवली. झाडांची कत्तल व जंगल परिसरातून जाणाºया रस्ता कामासाठी वन विभाग तर विद्युत खांब स्थलांतरणासाठी महावितरणकडून परवाना उशीरा मिळाल्याने अनेक ठिकाणी कामे विलंबाने झाली. इतरही अडचणी आल्याने महामार्गाचे काम विहित मुदतीत पूर्ण करणे शक्य झाले नसल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या रस्त्यांचे काम जवळपास ७० टक्क्यांपेक्षा जास्त तर दुसºया टप्प्यातील रस्त्यांचे काम ५० टक्के पूर्णत्वास गेले आहे. सर्व रस्त्यांची कामे वेगाने करण्यावर भर देण्यात येत आहे. वाहनधारकांना सध्या त्रास होत असला तरी येणाºया काळात या रस्त्याने त्यांनाच प्रवास करणे सुकर होईल.- के. बी. दंडगव्हाळ,उप अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाhighwayमहामार्ग