शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शिवाजी विद्यालयात लोकशाहीचे धडे !

By admin | Updated: July 20, 2015 23:14 IST

चिखली तालुक्यातील शेलसूर येथे वर्ग ५ ते १२ वर्ग नायकासाठी राबविण्यात आली निवडणूक प्रक्रिया.

चिखली (जि. बुलडाणा): बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव व्हावी व लोकशाहीचे धडे मिळावेत, या हेतूने तालुक्यातील शेलसूर येथील ङ्म्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालयात वर्ग ५ ते १२ वी पर्यंतच्या एकूण १४ तुकड्यांच्या वर्ग नायक निवडीसाठी चक्क निवडणुका घेण्यात आल्या. यानुषंगाने शाळेत उमेदवारी अर्ज भरण्यापासून तर मतदान व मतमोजणीपर्यंतचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम राबविण्यात आला. निवडणुका हा लोकशाहीचा कणा तर मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य समजले जाते. बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव व्हावी व लोकशाहीचे धडे मिळावेत, या हेतूने तालुक्यातील शेलसूर येथील ङ्म्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालयात वर्ग ५ ते १२ पर्यंंत एकूण १४ तुकड्यांसाठी वर्गनायक (वर्गप्रमुख) निवडीसाठी शाळेत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम राबविण्यात आला. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज मागे घेणे, प्रत्यक्ष निवडणूक, मतमोजणी यासाठी नियोजन करून व वेळापत्रकाची आखणी करून गुप्त पध्दतीने मतदानाची प्रक्रीया राबविण्यात आली. शनिवारी पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत ९७ टक्के विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान व मतमोजणीसाठी शिक्षकांच्या एका चमुचे गठण करण्यात आले होते. प्रत्यक्ष मतमोजणीअंती प्रत्येक वर्गाचा नायक व उपनायकांची निवड घोषीत करण्यात आले. 

*विद्यार्थ्यांंना लोकशाहीचे बाळकडू

   मजबूत लोकशाहीसाठी निवडणुका हा महत्त्वाचा भाग समजला जातो त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष प्रा.सुनिल देशमुख यांच्या संकल्पनेतून दरवर्षी शाळेत विद्यार्थ्यांंच्या निवडणुका घेतल्या जातात. विद्यार्थ्यांंना नागरिकशास्त्न व राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात निवडणूका व लोकशाहीसंदर्भात धडे आहेत. ते प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांंना अवगत व्हावे शिवाय गावपातळीपासून देशपातळीपर्यंंतच्या निवडणुका कशा पद्धतीने पार पडतात, याचे बाळकडू या निवडणुकीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांंना मिळत असल्याने पालकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.