चिखली (जि. बुलडाणा): बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव व्हावी व लोकशाहीचे धडे मिळावेत, या हेतूने तालुक्यातील शेलसूर येथील ङ्म्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालयात वर्ग ५ ते १२ वी पर्यंतच्या एकूण १४ तुकड्यांच्या वर्ग नायक निवडीसाठी चक्क निवडणुका घेण्यात आल्या. यानुषंगाने शाळेत उमेदवारी अर्ज भरण्यापासून तर मतदान व मतमोजणीपर्यंतचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम राबविण्यात आला. निवडणुका हा लोकशाहीचा कणा तर मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य समजले जाते. बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव व्हावी व लोकशाहीचे धडे मिळावेत, या हेतूने तालुक्यातील शेलसूर येथील ङ्म्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालयात वर्ग ५ ते १२ पर्यंंत एकूण १४ तुकड्यांसाठी वर्गनायक (वर्गप्रमुख) निवडीसाठी शाळेत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम राबविण्यात आला. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज मागे घेणे, प्रत्यक्ष निवडणूक, मतमोजणी यासाठी नियोजन करून व वेळापत्रकाची आखणी करून गुप्त पध्दतीने मतदानाची प्रक्रीया राबविण्यात आली. शनिवारी पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत ९७ टक्के विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान व मतमोजणीसाठी शिक्षकांच्या एका चमुचे गठण करण्यात आले होते. प्रत्यक्ष मतमोजणीअंती प्रत्येक वर्गाचा नायक व उपनायकांची निवड घोषीत करण्यात आले.
*विद्यार्थ्यांंना लोकशाहीचे बाळकडू
मजबूत लोकशाहीसाठी निवडणुका हा महत्त्वाचा भाग समजला जातो त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष प्रा.सुनिल देशमुख यांच्या संकल्पनेतून दरवर्षी शाळेत विद्यार्थ्यांंच्या निवडणुका घेतल्या जातात. विद्यार्थ्यांंना नागरिकशास्त्न व राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात निवडणूका व लोकशाहीसंदर्भात धडे आहेत. ते प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांंना अवगत व्हावे शिवाय गावपातळीपासून देशपातळीपर्यंंतच्या निवडणुका कशा पद्धतीने पार पडतात, याचे बाळकडू या निवडणुकीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांंना मिळत असल्याने पालकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.