बुलडाणा : गावातील शेतकरी कर्जमुक्त होवून स्वाभिमानाने जगावे यासाठीआपल्या गावात १ मे ला होणाऱ्या ग्रामसभेत ह्यशासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्तकरावेह्ण असा ठराव घेवून शासनाला पाठविण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदसदस्स डी.एस.लहाने यांनी केली आहे.गेल्या तीन वर्षापासून सातत्याने पावसाच्या अनियमिततेमुळे आपल्याजिल्ह्यात शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. यावर्षीनिसर्गाने साथ दिली असली तरी शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने त्यांचीआर्थिक अडचण दुर होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.आर्थिक अडचण त्यामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून अनेक शेतकऱ्यांनीआत्महत्येचा मार्ग स्विकारुन स्वत:चे जीवन संपवीले आहे. वडील लग्नाचाखर्च करु शकत नाही म्हणून शेतकऱ्यांच्या मुली सुध्दा आत्महत्या करीत आहे.शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगरकमी न झाल्यास अजून आत्महत्या वाढतजातील व अनेकांचे संसार उघड्यावर पडतील. शेतकऱ्यांना शासनाने कर्ज मुक्तकरावे काळाची गरज आहे. गावातील ग्रामसभा लोकशाहीतील बलस्थाने आहेत.ग्रामसभेत ठरावाला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे गावातील शेतकरीकर्जमुक्त होवून स्वाभिमानाने जगावे यासाठी आपल्या गावात १ मे ला होणाऱ्याग्रामसभेत ह्यशासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावेह्ण असा ठराव घेवून शासनालापाठविण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्स डी.एस.लहाने यांनी केलीआहे.
शेतकºयांच्या कर्जमुक्तीचा ठराव ग्रामसभेत घेण्याची मागणी
By admin | Updated: April 29, 2017 14:55 IST