शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना बियाणे देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:46 IST

गतवर्षी बोगस बियाणे निघाल्याने दुबार, तिबार पेरणी करूनसुद्धा अतिवृष्टीमुळे सोयाबीन भिजले होते. त्यामुळे यावर्षी सोयाबीनच्या बियाण्याची टंचाई भासत असल्यामुळे ...

गतवर्षी बोगस बियाणे निघाल्याने दुबार, तिबार पेरणी करूनसुद्धा अतिवृष्टीमुळे सोयाबीन भिजले होते. त्यामुळे यावर्षी सोयाबीनच्या बियाण्याची टंचाई भासत असल्यामुळे चढ्या भावात बियाण्यांची विक्री होत आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता शेतकऱ्यांना बियाणे अनुदानावर मिळवण्याकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले होते. परंतु मोजक्याच शेतकऱ्यांना बियाणे मिळाले असून अनेक शेतकरी बियाण्यांपासून वंचित आहेत. शासनाने सरसकट बियाणे देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यामार्फत कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दोन वर्षांपासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या अडचणींचा सामना करीत आहेत. गतवर्षी बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने राज्य सरकारने नुकसान भरपाईची मदत जाहीर केली होती. परंतु मोजक्याच गावात ही मदत मिळाली. बाकीच्या गावातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही मदतीपासून वंचित आहेत. पीक विमा भरूनही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. कर्जमाफीपासून बरेच शेतकरी वंचित आहेत. कोरोना महामारीचे कारण समोर करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.

आंदोलनाचा इशारा

ऑनलाईन अर्ज करण्याकरिता शेतकऱ्यांना प्रति अर्ज १०० रुपये द्यावे लागले. जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणे मिळवण्याकरिता अर्ज केले होते. परंतु अनेक शेतकऱ्यांना बियाणे मिळालेच नाही. सर्व शेतकऱ्यांना अनुदानावर तत्काळ बियाणे देण्यात यावे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.