शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

अमडापूर ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 13:15 IST

गावातील गावातील विकास कामांना वेग दिल्या जावा व प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन नेमाडे यांनी ६ नोव्हेंबर रोजी बुडाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे लोकशाही दिनात निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देगावातील विकासकामे थंडबस्त्यात लोकशाही दिनात निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी

अमडापूर : चिखली तालुक्यातील अमडापूर ग्रा.पं.ला शासन स्तरावरून गावातील विकास कामासाठी १४ व्या वित्त आयोगामार्फत लाखो रूपयांचा निधी देण्यात आला आहे. परंतु, गावातील विकासकामारीता  या निधीच्या विनियोगात ग्रामपंचायत सरपंच आणि सचिवाने गलथान कारभार केल्याने गावातील विकासकामे थंडबस्त्यात पडली आहे. प्रकरणी गावातील गावातील विकास कामांना वेग दिल्या जावा व प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन नेमाडे यांनी ६ नोव्हेंबर रोजी बुडाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे लोकशाही दिनात निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.निवेदनामध्ये म्हटले आहे की, ग्रामपंचायत ही विकासाचा केंद्रबिंदू आहे. गावाच्या विकासाचे नियोजन गावातच करण्यासाठी ग्रामसभेला शासनाने विशेष अधिकार दिलेले असताना ग्रामसभेत व मासीक सभेत विकासाचे अनेक ठराव घेवून सुध्दा पदाधिकारी व अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे विकासाचे तिनतेरा वाजले आहेत. आमचा गाव आमचा विकास उपक्रमाअंतर्गत अमडापूर ग्रामपंचायतीमध्ये विकास कामासाठी १४ व्या वित्त आयोगातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणारा निधी योग्य नियोजन करण्यासाठी ५ वर्षाचा कृती आराखडा तयार करताना गावातील प्रत्येक वार्डातील समस्या लक्षात घेवून तो तयार करीत मंजूर करून घेतला आहे. त्यावर केंद्र शासनाच्या ध्येय धोरणानुसार ग्रामविकास निधी सरपंच व सचिव यांच्या खात्यात १४ व्या वित्त आयोगातून आलेले १ कोटी ४ लाख ९९ हजार २२९ रूपये जमा आहेत. गावातील स्मशानभूमीचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. गावात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. वार्ड नं.५ मध्ये मेन रोडचे काम झालेले नाही, नाल्यासफाई नाही, क्रीडा मैदान नाही, अनेक भागामध्ये जाणेयेणेसाठी रस्ते नाही. अशा समस्या उद्भवलेल्या असतानासुध्दा १४ व्या वित्त आयोगाचा खात्यामध्ये कोट्यावधी रूपये जमा आहेत. सरपंच व सचिव यांनी कोणतेची कामे  केली नसल्याने गावाचा विकास खुटंला असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. प्रकरणी त्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून कारवाई केली जावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे  ग्रामपंचायत सदस्य अर्जुन नेमाडे यांनी लोकशाहीदिनी आपल्या सहीनिशी दिली आहे.

टॅग्स :Politicsराजकारणgram panchayatग्राम पंचायत