शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

अमडापूर ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 13:15 IST

गावातील गावातील विकास कामांना वेग दिल्या जावा व प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन नेमाडे यांनी ६ नोव्हेंबर रोजी बुडाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे लोकशाही दिनात निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देगावातील विकासकामे थंडबस्त्यात लोकशाही दिनात निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी

अमडापूर : चिखली तालुक्यातील अमडापूर ग्रा.पं.ला शासन स्तरावरून गावातील विकास कामासाठी १४ व्या वित्त आयोगामार्फत लाखो रूपयांचा निधी देण्यात आला आहे. परंतु, गावातील विकासकामारीता  या निधीच्या विनियोगात ग्रामपंचायत सरपंच आणि सचिवाने गलथान कारभार केल्याने गावातील विकासकामे थंडबस्त्यात पडली आहे. प्रकरणी गावातील गावातील विकास कामांना वेग दिल्या जावा व प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन नेमाडे यांनी ६ नोव्हेंबर रोजी बुडाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे लोकशाही दिनात निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.निवेदनामध्ये म्हटले आहे की, ग्रामपंचायत ही विकासाचा केंद्रबिंदू आहे. गावाच्या विकासाचे नियोजन गावातच करण्यासाठी ग्रामसभेला शासनाने विशेष अधिकार दिलेले असताना ग्रामसभेत व मासीक सभेत विकासाचे अनेक ठराव घेवून सुध्दा पदाधिकारी व अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे विकासाचे तिनतेरा वाजले आहेत. आमचा गाव आमचा विकास उपक्रमाअंतर्गत अमडापूर ग्रामपंचायतीमध्ये विकास कामासाठी १४ व्या वित्त आयोगातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणारा निधी योग्य नियोजन करण्यासाठी ५ वर्षाचा कृती आराखडा तयार करताना गावातील प्रत्येक वार्डातील समस्या लक्षात घेवून तो तयार करीत मंजूर करून घेतला आहे. त्यावर केंद्र शासनाच्या ध्येय धोरणानुसार ग्रामविकास निधी सरपंच व सचिव यांच्या खात्यात १४ व्या वित्त आयोगातून आलेले १ कोटी ४ लाख ९९ हजार २२९ रूपये जमा आहेत. गावातील स्मशानभूमीचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. गावात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. वार्ड नं.५ मध्ये मेन रोडचे काम झालेले नाही, नाल्यासफाई नाही, क्रीडा मैदान नाही, अनेक भागामध्ये जाणेयेणेसाठी रस्ते नाही. अशा समस्या उद्भवलेल्या असतानासुध्दा १४ व्या वित्त आयोगाचा खात्यामध्ये कोट्यावधी रूपये जमा आहेत. सरपंच व सचिव यांनी कोणतेची कामे  केली नसल्याने गावाचा विकास खुटंला असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. प्रकरणी त्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून कारवाई केली जावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे  ग्रामपंचायत सदस्य अर्जुन नेमाडे यांनी लोकशाहीदिनी आपल्या सहीनिशी दिली आहे.

टॅग्स :Politicsराजकारणgram panchayatग्राम पंचायत