शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अमडापूर ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 13:15 IST

गावातील गावातील विकास कामांना वेग दिल्या जावा व प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन नेमाडे यांनी ६ नोव्हेंबर रोजी बुडाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे लोकशाही दिनात निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देगावातील विकासकामे थंडबस्त्यात लोकशाही दिनात निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी

अमडापूर : चिखली तालुक्यातील अमडापूर ग्रा.पं.ला शासन स्तरावरून गावातील विकास कामासाठी १४ व्या वित्त आयोगामार्फत लाखो रूपयांचा निधी देण्यात आला आहे. परंतु, गावातील विकासकामारीता  या निधीच्या विनियोगात ग्रामपंचायत सरपंच आणि सचिवाने गलथान कारभार केल्याने गावातील विकासकामे थंडबस्त्यात पडली आहे. प्रकरणी गावातील गावातील विकास कामांना वेग दिल्या जावा व प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन नेमाडे यांनी ६ नोव्हेंबर रोजी बुडाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे लोकशाही दिनात निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.निवेदनामध्ये म्हटले आहे की, ग्रामपंचायत ही विकासाचा केंद्रबिंदू आहे. गावाच्या विकासाचे नियोजन गावातच करण्यासाठी ग्रामसभेला शासनाने विशेष अधिकार दिलेले असताना ग्रामसभेत व मासीक सभेत विकासाचे अनेक ठराव घेवून सुध्दा पदाधिकारी व अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे विकासाचे तिनतेरा वाजले आहेत. आमचा गाव आमचा विकास उपक्रमाअंतर्गत अमडापूर ग्रामपंचायतीमध्ये विकास कामासाठी १४ व्या वित्त आयोगातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणारा निधी योग्य नियोजन करण्यासाठी ५ वर्षाचा कृती आराखडा तयार करताना गावातील प्रत्येक वार्डातील समस्या लक्षात घेवून तो तयार करीत मंजूर करून घेतला आहे. त्यावर केंद्र शासनाच्या ध्येय धोरणानुसार ग्रामविकास निधी सरपंच व सचिव यांच्या खात्यात १४ व्या वित्त आयोगातून आलेले १ कोटी ४ लाख ९९ हजार २२९ रूपये जमा आहेत. गावातील स्मशानभूमीचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. गावात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. वार्ड नं.५ मध्ये मेन रोडचे काम झालेले नाही, नाल्यासफाई नाही, क्रीडा मैदान नाही, अनेक भागामध्ये जाणेयेणेसाठी रस्ते नाही. अशा समस्या उद्भवलेल्या असतानासुध्दा १४ व्या वित्त आयोगाचा खात्यामध्ये कोट्यावधी रूपये जमा आहेत. सरपंच व सचिव यांनी कोणतेची कामे  केली नसल्याने गावाचा विकास खुटंला असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. प्रकरणी त्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून कारवाई केली जावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे  ग्रामपंचायत सदस्य अर्जुन नेमाडे यांनी लोकशाहीदिनी आपल्या सहीनिशी दिली आहे.

टॅग्स :Politicsराजकारणgram panchayatग्राम पंचायत