शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

आजीबाईंचा बटवा अन्‌ कोरोनाला हटवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:33 IST

बुलडाणा : काेराेनाची दुसरी लाट ग्रामीण भागापर्यंत पाेहोचल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे़ ग्रामीण भागात अनेक आजारांवर घरगुती उपचार ...

बुलडाणा : काेराेनाची दुसरी लाट ग्रामीण भागापर्यंत पाेहोचल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे़ ग्रामीण भागात अनेक आजारांवर घरगुती उपचार करण्याची पद्धत आहे़ काेराेनावरही गुळवेलचा काढा, हळद, तुळस आदींचा वापर ग्रामस्थ करीत असल्याचे चित्र आहे़

मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ जिल्ह्यातील एकूण ६४० गावांमध्ये काेराेनाचे रुग्ण आढळत आहेत़ त्यातच काही गावे काेराेनाचे हाॅटस्पाॅट ठरत आहेत़ काेराेनामुळे मृत्यू हाेण्याचे प्रमाणही वाढल्याने ग्रामस्थांमध्ये काेराेनाची भीती वाढली आहे़ या भीतीतूनच अनेक जण लक्षणे नसली तरी घरगुती उपचार करीत असल्याचे चित्र आहे़ यामध्ये वाफ घेणे, हळद दुधातून किंवा पाण्यातून घेणे, तुळस, अश्वगंधा आदींचा उपयाेग करण्यात येत आहे़ ग्रामीण भागात अजूनही ताप आल्यास अनेक जण कडुनिंबाच्या पानांचा रस घेतात़ वयाेवृद्ध मंडळी आजही विविध आजारांवर घरगुती उपचार सुचवतात़ सध्या ग्रामीण भागात गुळवेलच्या काढ्याला माेठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे़ विशेषत: कडुनिंबाच्या झाडावर वाढलेली गुळवेली गुणकारी असल्याचे वृद्ध सांगतात़

काेट

काेराेना हा आजार जगभरासाठी नवीन आहे़ तसाच ताे आयुर्वेदासाठीही नवीन आहे़ आयुर्वेदात राेगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या अनेक औषधी उपलब्ध आहेत़ तुळस, अश्वगंधा, आवळा, हळद आदींचे वेगवेगळे महत्त्व आहे़ काेराेनाच्या काळात राेगप्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेेचे आहे़

- डाॅ़ गजानन पडघन, आयुर्वेदाचार्य

कशाचा काय हाेताे फायदा

हळदीमुळे राेगप्रतिकारशक्ती वाढते

हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढते़ रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, ही जंतुनाशक आहे. ही वनस्पती बारमाही आहे. हळद चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने हृदयविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदूचे विकार होण्यापासून प्रतिबंध होतो. पचनक्रिया सुधारते.

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते

आवळ्यामध्ये सी व्हिटॅमिन असते. त्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज आवळ्याचे सेवन करणे आवश्यक आहे.यातील जीवनसत्त्वांमुळे त्वचेतील पेशी जलदगतीने दुरुस्त होतात. व्हिटॅमिन सी आपल्या डोळ्यांतील रक्तवाहिन्यांमध्ये अनावश्यक चरबी जमा होण्यापासूनही रोखण्याचे कार्य करते़

गुळवेलचा वापर वाढला

गुळवेल कफ कमी करण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते. यामुळे दमा आणि खोकला यांसारख्या आजारांपासून बचाव होतो आणि फुफ्फुसांना निरोगी ठेवता येते. तसेच गुळवेलमुळे पचन क्रिया सुधारते़ तसेच बद्धकाेष्ठ, गॅस व इतर समस्या दूर हाेतात.

मीठ व गरम पाण्याने गुळण्या केल्यास घसा दुखणे कमी हाेते़ तसेच गुळवेलचा काढा घेतल्यास ताप, सर्दी, खाेकला कमी हाेताे़ काेराेना झालेल्यांना हा त्रास हाेताे़ त्यामुळे घरगुती उपचार म्हणून काढा सर्वांना घेण्याचा सल्ला देत असते़

लिलावती म्हस्के, ब्रम्हपुरी

काेराेना झाल्यानंतर सर्दी, खाेकला, ताप आदी लक्षणे असतात़ या लक्षणांवर आधीपासूनच घरगुती उपचार करण्यात येतात़ ताप असल्यास गुळवेलचा काढा आम्ही घेताे़ तसेच कडुनिंबाच्या पानांचा रसही तापावर गुणकारी आहे़

सर्दी, कफ वाढल्यास गरम पाण्याची वाफ घ्यावी़ तसेच तुळस, मिरे, लवंग, दालचिनी, सुंठ आदी एकत्रित करून त्याचा काढा आम्ही घेत असताे़ हाच उपाय मी इतरांनाही सांगते़