शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

किनगाव जट्टू येथे तीव्र पाणीटंचाई; हंडाभर पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 13:54 IST

किनगाव जट्टू : यावर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांना हंडाभर पाण्याकरीता पायपीट करावी लागत असल्याने त्वरीत उपाययोजना कराव्या अशी मागणी होत आहे.येथील ग्रामस्थांना महाजल योजनेच्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पाण्याची भूजल पातळी झपाट्याने खोल गेली. ...

ठळक मुद्देयेथील ग्रामस्थांना महाजल योजनेच्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येत होता.विहिरीची पाण्याची पातळी खोल गेल्याने ती योजना बंद पडली असल्याने त्या विहिरीतून ग्रामस्थांना उन्हात पाणी काढावे लागत आहे. २५० रुपये खर्च करुन एक हजार लिटर पाणी विकत घेतात.

किनगाव जट्टू : यावर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांना हंडाभर पाण्याकरीता पायपीट करावी लागत असल्याने त्वरीत उपाययोजना कराव्या अशी मागणी होत आहे.येथील ग्रामस्थांना महाजल योजनेच्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पाण्याची भूजल पातळी झपाट्याने खोल गेली. त्यामुळे आवठड्यातून एक दिवस पाणी येते ते सुद्धा नेहमी अर्ध्या भागात ते सुद्धा पुरेसे नसते. नदीतील पूरक पाणी पुरवठ्याच्या विहिरीची पाण्याची पातळी खोल गेल्याने ती योजना बंद पडली असल्याने त्या विहिरीतून ग्रामस्थांना उन्हात पाणी काढावे लागत आहे. रस्ता चढउताराचा असल्याने महिलांना डोक्यावर पाणी भरणे अवघड झाले आहे. काही हातपंप पाण्याअभावी शोभेचे ठरत आहेत. गावातील अर्ध्या भागातील नागरिकांना नेहमी नदीकाठावरील हातपंपाचे पाणी पिण्यासाठी आणावे लागते. परंतु त्याचे पाणीसुद्धा कमी झाल्याने रात्रंदिवस जागरण करुन थांबून पाणी हापसावे लागत आहे. मारोती मंदिराजवळील विहीर कोरडी पडली आहे. येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने काही नागरिक गाडीबैलावर ड्रम टाकून शेतातून पाणी आणतात. तर काही मोटारसायकलला कॅन लावून तर गोरगरीब जनतेला मिळेल तेथून विहिरीतून डोक्यावर पाणी आणावे लागते. काही २५० रुपये खर्च करुन एक हजार लिटर पाणी विकत घेतात. परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने दोन महिन्यापूर्वी नदीनाले कोरडे पडले. त्यामुळे जी पाणीटंचाई एप्रिल-मे महिन्यात निर्माण होणार होती ती मार्च महिन्याच्या पुर्वसंध्याला निर्माण झाली आहे. चोरपांग्रा धरणाजवळील जुनी नळ योजना सुद्धा नियोजनाअभावी जवळपाास १० ते १५ वर्षापासून बंद पडली आहे. थोड्याफार प्रमाणात तात्पुरती पाणीटंचाई दूर करण्यासाठी नदीतील विहिरीतील पाणी मारोती मंदिराजवळील विहिरीत सोडून १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून त्याच विहिरीत आडवे बोअर घ्यावे व पिण्याच्या पाण्याकरीता ग्रामपंचायत जवळील बोरवेलजवळ सिमेंटची टाकी बांधून तोट्या लावून पाणीवाटप केल्यास व शांतीलाल सोनी यांचे घराजवळील विहीर पाणी सोडल्यास पाणीटंचाई दूर करण्यास मदत होईल अशी मागणी होत आहे. किनगाव जट्टू येथे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विहीर अधिग्रहण प्रस्ताव पाठविला असून पूरक पाणी पुरवठ्याच्या विहिरीतील पाणी मारोती मंदीराजवळील विहिरीत लवकरच सोडण्यात येवून पिण्याच्या पाण्याकरीता ग्रामपंचायत जवळील बोरवेलजवळ सिमेंट टाकी बांधून तोट्या लावण्यात येतील.- ए.के.नवले, ग्रामविकास अधिकारी ग्रा.पं. किनगाव जट्टू, ता.लोणार.

टॅग्स :buldhanaबुलडाणाLonarलोणार