शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लसीकरणाने मृत्यू, नपुंसकत्व येण्याची अफवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:25 IST

बुलडाणा : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे़ त्यामुळे, जिल्हाभरात विविध केंद्रांवर लसीकरण करण्यात येत ...

बुलडाणा : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे़ त्यामुळे, जिल्हाभरात विविध केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे़ ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून लस घेतलेले दाेन वर्षांत मृत्युमुखी पडतील, नपुंसकत्व येते, इतर आजार जडतात, अशा अफवा पसरल्या आहेत़ त्यामुळे, लसीकरणावर याचा परिणाम झाला आहे़

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेचा जिल्ह्याला माेठ्या प्रमाणात फटका बसला़ अनेक रुग्णांचा मृत्यू झाला़ पहिल्या लाटेच्या वेळी शहरापर्यंत मर्यादित असलेला काेराेना दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात पाेहोचला आहे़ त्यामुळे, आराेग्य व्यवस्थेवर माेठा ताण वाढला आहे़ काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने लसीकरण सुरू केले आहे़ जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात लसीकरण सुरू झालेले आहे़ सध्या लस उपलब्ध नसल्याने १८ ते ४४ वयाेगटाचे लसीकरण थांबवण्यात आले आहे़ दुसरीकडे ४४ पेक्षा जास्त लाेकांना लस मिळत असली तरी ग्रामीण भागात अफवा पसरवण्यात येत असल्याने अनेक जण लस घेण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे़ समाजमाध्यमावर अशा अफवा पसरत असल्याने ग्रामस्थांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याने लसीकरणावर परिणाम हाेत आहे़

लसीकरणाविषयी या आहेत अफवा

दाेन वर्षांनंतर मृत्यू हाेणार

काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एका नाेबेल पारिताेषिक विजेत्या शास्त्रज्ञाचा हवाला देत लस घेतलेल्या लाेकांचा दाेन वर्षांनंतर मृत्यू हाेणार असल्याआ संदेश फिरत हाेता़ अनेकांना हा संदेश मिळाल्याने ताे ग्रामीण भागातही वाऱ्यासारखा व्हायरल झाला़ त्यामुळे, लाेकांमध्ये लस घेतल्याने मृत्यू हाेताे, अशी अफवा पसरली आहे़

नपुंसकत्व येते

लस घेल्यानंतर काही वर्षांनी नपुंसकत्व येते अशी अफवा ग्रामीण भागात पसरली आहे़ त्यामुळे, १८ ते ४४ वयाेगटासाठी लसीकरण सुरू झाल्यानंतर काही गावांमध्ये युवकांचा प्रतिसाद नव्हता़ अनेक जण या भीतीमुळे लस घेण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे़ मात्र, लसीमुळे असा कुठलाही प्रकार हाेत नसल्याचे आराेग्य विभागाने स्पष्ट केले आहे़

इतर आजार हाेतात

काेराेनाची लस घेतल्यानंतर इतर आजार हाेतात, अशीही अफवा ग्रामीण भागात आहे़ राेग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लस देण्यात येत आहे़ दरराेजच्या जेवणात सकस आहार घेतल्यानंतर तशीही राेगप्रतिकार शक्ती वाढते़ त्यामुळे, वेगळी लस घेण्याची गरज नसल्याचा समज ग्रामस्थांचा झाला आहे़ त्यामुळे, लसीकरण केंद्राकडे अनेक ग्रामस्थ पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे़

ग्रामस्थ संभ्रमात

लसीकरणाविषयी ग्रामीण भागात अनेक अफवा पसरविल्या जात आहेत़ त्यामुळे, ग्रामस्थ लस घेत नसल्याचे चित्र आहे़ त्यामुळे, आराेग्य विभागाने लसीकरणाविषयी जनजागृती करण्याची गरज आहे़

- डाॅ़ हेमराज लाहाेटी, माजी उपसभापती

काेराेना लसीकरण सध्या ग्रामीण भागातही सुरू आहे़ अनेक ग्रामस्थांमध्ये याविषयी गैरसमज निर्माण झाले आहेत. लस कशी सुरक्षित आहे, याविषयी आराेग्य विभागाने ग्रामीण भागातील लाेकांना मार्गदर्शन करावे़

- दिलीप वाघ, शिवसेना नेते

समाजमाध्यमावर फिरणारा संदेश चुकीचा

लस घेल्यानंतर दाेन वर्षांनी मृत्यू हाेणार असल्याचा समाजमाध्यमावर फिरणारा संदेश चुकीचा आहे़ काेराेना लस सुरक्षित आहे़ काेराेना संसर्ग राेखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे़ त्यामुळे, ग्रामस्थांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये़

- डाॅ़ बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आराेग्य अधिकारी, बुलडाणा