शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

लसीकरणाने मृत्यू, नपुंसकत्व येण्याची अफवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:25 IST

बुलडाणा : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे़ त्यामुळे, जिल्हाभरात विविध केंद्रांवर लसीकरण करण्यात येत ...

बुलडाणा : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे़ त्यामुळे, जिल्हाभरात विविध केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे़ ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून लस घेतलेले दाेन वर्षांत मृत्युमुखी पडतील, नपुंसकत्व येते, इतर आजार जडतात, अशा अफवा पसरल्या आहेत़ त्यामुळे, लसीकरणावर याचा परिणाम झाला आहे़

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेचा जिल्ह्याला माेठ्या प्रमाणात फटका बसला़ अनेक रुग्णांचा मृत्यू झाला़ पहिल्या लाटेच्या वेळी शहरापर्यंत मर्यादित असलेला काेराेना दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात पाेहोचला आहे़ त्यामुळे, आराेग्य व्यवस्थेवर माेठा ताण वाढला आहे़ काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने लसीकरण सुरू केले आहे़ जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात लसीकरण सुरू झालेले आहे़ सध्या लस उपलब्ध नसल्याने १८ ते ४४ वयाेगटाचे लसीकरण थांबवण्यात आले आहे़ दुसरीकडे ४४ पेक्षा जास्त लाेकांना लस मिळत असली तरी ग्रामीण भागात अफवा पसरवण्यात येत असल्याने अनेक जण लस घेण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे़ समाजमाध्यमावर अशा अफवा पसरत असल्याने ग्रामस्थांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याने लसीकरणावर परिणाम हाेत आहे़

लसीकरणाविषयी या आहेत अफवा

दाेन वर्षांनंतर मृत्यू हाेणार

काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एका नाेबेल पारिताेषिक विजेत्या शास्त्रज्ञाचा हवाला देत लस घेतलेल्या लाेकांचा दाेन वर्षांनंतर मृत्यू हाेणार असल्याआ संदेश फिरत हाेता़ अनेकांना हा संदेश मिळाल्याने ताे ग्रामीण भागातही वाऱ्यासारखा व्हायरल झाला़ त्यामुळे, लाेकांमध्ये लस घेतल्याने मृत्यू हाेताे, अशी अफवा पसरली आहे़

नपुंसकत्व येते

लस घेल्यानंतर काही वर्षांनी नपुंसकत्व येते अशी अफवा ग्रामीण भागात पसरली आहे़ त्यामुळे, १८ ते ४४ वयाेगटासाठी लसीकरण सुरू झाल्यानंतर काही गावांमध्ये युवकांचा प्रतिसाद नव्हता़ अनेक जण या भीतीमुळे लस घेण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे़ मात्र, लसीमुळे असा कुठलाही प्रकार हाेत नसल्याचे आराेग्य विभागाने स्पष्ट केले आहे़

इतर आजार हाेतात

काेराेनाची लस घेतल्यानंतर इतर आजार हाेतात, अशीही अफवा ग्रामीण भागात आहे़ राेग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लस देण्यात येत आहे़ दरराेजच्या जेवणात सकस आहार घेतल्यानंतर तशीही राेगप्रतिकार शक्ती वाढते़ त्यामुळे, वेगळी लस घेण्याची गरज नसल्याचा समज ग्रामस्थांचा झाला आहे़ त्यामुळे, लसीकरण केंद्राकडे अनेक ग्रामस्थ पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे़

ग्रामस्थ संभ्रमात

लसीकरणाविषयी ग्रामीण भागात अनेक अफवा पसरविल्या जात आहेत़ त्यामुळे, ग्रामस्थ लस घेत नसल्याचे चित्र आहे़ त्यामुळे, आराेग्य विभागाने लसीकरणाविषयी जनजागृती करण्याची गरज आहे़

- डाॅ़ हेमराज लाहाेटी, माजी उपसभापती

काेराेना लसीकरण सध्या ग्रामीण भागातही सुरू आहे़ अनेक ग्रामस्थांमध्ये याविषयी गैरसमज निर्माण झाले आहेत. लस कशी सुरक्षित आहे, याविषयी आराेग्य विभागाने ग्रामीण भागातील लाेकांना मार्गदर्शन करावे़

- दिलीप वाघ, शिवसेना नेते

समाजमाध्यमावर फिरणारा संदेश चुकीचा

लस घेल्यानंतर दाेन वर्षांनी मृत्यू हाेणार असल्याचा समाजमाध्यमावर फिरणारा संदेश चुकीचा आहे़ काेराेना लस सुरक्षित आहे़ काेराेना संसर्ग राेखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे़ त्यामुळे, ग्रामस्थांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये़

- डाॅ़ बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आराेग्य अधिकारी, बुलडाणा