शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

जीवनातील अंधार वाटा सद्गुरुंच्या आचरणाने उजळतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:21 IST

साखरखेर्डा : वीरशैव सांप्रदायात गुरूला खूप मोठं महत्त्व आहे़ आपले जीवन घडविण्यासाठी अनेक व्यक्तींचे सहकार्य लाभते. सिद्धतत्त्वाचे ज्ञान ...

साखरखेर्डा :

वीरशैव सांप्रदायात गुरूला खूप मोठं महत्त्व आहे़ आपले जीवन घडविण्यासाठी अनेक व्यक्तींचे सहकार्य लाभते. सिद्धतत्त्वाचे ज्ञान सद्गुरु करून देत असल्याने मानवी जीवनातील अंधार वाटा उजळून जातात, असे मत १०८ सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले. गुरुपौर्णिमेनिमित्त जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी पीठात आयोजित कार्यक्रमात ते ऑनलाईन आशीर्वचनातून प्रबोधन करीत होते.

प्रारंभी वेदमूर्ती हितेश स्वामी यांनी प्रास्ताविक केले़ वेदमूर्ती विश्वनाथ स्वामी यांनी पंधरा मिनिटे शंखनाद केला़ डॉ़ शंकर स्वामी नांदेड, डॉ़ महाजन औरंगाबाद, डॉ़ प्रकाश स्वामी, सतिषआप्पा तवले जालना यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या आशीर्वचनात सिद्धलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले की, माणूस अंधारात भटकत असताना त्याला मार्ग दाखविण्याचे काम गुरू करतात़ यावेळी ओमप्रकाश स्वामी (रा. लिंबा, जि. परभणी) यांनी एक लक्ष रुपयांची देणगी दिली, तसेच नालवाडा येथील बोडखे दाम्पत्याने सव्वा लाख रुपये देणगी अर्पण केली. यावेळी वीरशैव महिला मंडळ रिसोड यांनी चांदीच्या पादुका अर्पण केल्या. महाप्रसादाने कोरोना नियमांचे पालन करून कार्यक्रमाची सांगता झाली. संचालन शिवानंदन वाकदकर यांनी केले़