शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जीवनातील अंधार वाटा सद्गुरुंच्या आचरणाने उजळतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:21 IST

साखरखेर्डा : वीरशैव सांप्रदायात गुरूला खूप मोठं महत्त्व आहे़ आपले जीवन घडविण्यासाठी अनेक व्यक्तींचे सहकार्य लाभते. सिद्धतत्त्वाचे ज्ञान ...

साखरखेर्डा :

वीरशैव सांप्रदायात गुरूला खूप मोठं महत्त्व आहे़ आपले जीवन घडविण्यासाठी अनेक व्यक्तींचे सहकार्य लाभते. सिद्धतत्त्वाचे ज्ञान सद्गुरु करून देत असल्याने मानवी जीवनातील अंधार वाटा उजळून जातात, असे मत १०८ सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले. गुरुपौर्णिमेनिमित्त जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी पीठात आयोजित कार्यक्रमात ते ऑनलाईन आशीर्वचनातून प्रबोधन करीत होते.

प्रारंभी वेदमूर्ती हितेश स्वामी यांनी प्रास्ताविक केले़ वेदमूर्ती विश्वनाथ स्वामी यांनी पंधरा मिनिटे शंखनाद केला़ डॉ़ शंकर स्वामी नांदेड, डॉ़ महाजन औरंगाबाद, डॉ़ प्रकाश स्वामी, सतिषआप्पा तवले जालना यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या आशीर्वचनात सिद्धलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले की, माणूस अंधारात भटकत असताना त्याला मार्ग दाखविण्याचे काम गुरू करतात़ यावेळी ओमप्रकाश स्वामी (रा. लिंबा, जि. परभणी) यांनी एक लक्ष रुपयांची देणगी दिली, तसेच नालवाडा येथील बोडखे दाम्पत्याने सव्वा लाख रुपये देणगी अर्पण केली. यावेळी वीरशैव महिला मंडळ रिसोड यांनी चांदीच्या पादुका अर्पण केल्या. महाप्रसादाने कोरोना नियमांचे पालन करून कार्यक्रमाची सांगता झाली. संचालन शिवानंदन वाकदकर यांनी केले़