शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या जमिनीवर तणनाशक फवारल्यामुळे पिकांना ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 11:10 IST

जमिनीमध्ये ओल नसताना तणनाशकांची फवारणी केल्यामुळे पिकांना शॉक बसला असून, पिके पिवळी पडली आहेत.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जमिनीमध्ये ओल नसताना तणनाशकांची फवारणी केल्यामुळे पिकांना शॉक बसला असून, पिके पिवळी पडली आहेत. तसेच पिकांना सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यामुळेही पिके पिवळी पडली आहेत.संपूर्ण राज्यात खरीप हंगामाची पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. मात्र, गत काही दिवसांमध्ये पिके पिवळी पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तर पिकांवर सुद्धा व्हायरस आल्याची अफवा काही भागात पसरली आहे. वºहाडात पावसाने दडी दिली होती. तर काही भागात सुरूवातीपासूनच मुबलक पाऊस झाला नाही. त्यामुळे जमिनीत ओल नसल्याने पिकांची हवी तशी वाढ झाली नाही. त्यातच तण वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी तणनाशकांची फवारणी केली. जमिनीत ओल नसल्यामुळे पिकांना पुरेसे पोषण मिळाले नाही. त्यातच तणनाशकांची फवारणी करण्यात आल्यामुळे पिकांना शॉक बसला. त्यामुळे पिके पिवळी पडली आहेत.शेतकरी अनेक वर्षांपासून शेतात एकाच पिकाची पेरणी करतात. शेतात पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे. पिकांची फेरपालट केली तर मातीचा पोत सुधारतो. मात्र सातत्याने एकाच पिकाची पेरणी केल्यामुळे पिकांना सुक्ष्म अन्नद्रव्य मिळत नाही. अमरावती विभागात शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबिनची पेरणी करतात. सोयाबिन नगदी पिक असल्यामुळे दरवर्षी एकाच पिकाची पेरणी करण्यात येते. सोयाबिन व मका पिकाला सर्वात जास्त अन्नद्रव्यांची गरज असते. शेतकरी पिकांना नत्र, स्पूरद आणि पालाश (एनपीके) ही मुख्य अन्नद्रव्य देतात. मात्र सुक्ष्म अन्नद्रव्य देत नाहीत. सध्या पिकांना झिंक, मंगल, तांबे, लोह ही सुक्ष्म अन्नद्रव्ये व सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य मिळाले नसल्यामुळे सुद्धा पिके पिवळी पडली आहेत. शेतकºयांनी पेरणी करताना युरीया व सिंगल सुपर फॉस्पेट खत दिले तर पिके पिवळी पडत नाहीत.उगवणीपूर्व तणनाशकांच्या फवारणीकडे पाठपिक पेरणी करण्यापूर्वीच उगवणीपूर्व तणनाशकांची फवारणी केली तर तण उगवत नाही. पिकांची पेरणी केल्यानंतर तसेच तण उगवल्यानंतर लगेच तणनाशकांची फवारणी केली तर पिकांना फटका बसतो. त्यामुळे उगवणीपूर्व तणनाशकांची फवारणी करण्याची गरज आहे.

जमिनीत ओल नसताना नणनाशकांची फवारणी करण्यात आली. त्याचा पिकांना शॉक बसल्याने पिके पिवळी पडली आहेत. तसेच शेतात एकाच पिकाची पेरणी केल्यामुळे पिकांना सुक्ष्म अन्नद्रव्ये मिळत नाही. त्यामुळे सुद्धा पिके पिवळी पडतात.- जी. बी. गिरीतालुका कृषि अधिकारी, खामगाव

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी