शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

कोरड्या जमिनीवर तणनाशक फवारल्यामुळे पिकांना ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 11:10 IST

जमिनीमध्ये ओल नसताना तणनाशकांची फवारणी केल्यामुळे पिकांना शॉक बसला असून, पिके पिवळी पडली आहेत.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जमिनीमध्ये ओल नसताना तणनाशकांची फवारणी केल्यामुळे पिकांना शॉक बसला असून, पिके पिवळी पडली आहेत. तसेच पिकांना सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यामुळेही पिके पिवळी पडली आहेत.संपूर्ण राज्यात खरीप हंगामाची पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. मात्र, गत काही दिवसांमध्ये पिके पिवळी पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तर पिकांवर सुद्धा व्हायरस आल्याची अफवा काही भागात पसरली आहे. वºहाडात पावसाने दडी दिली होती. तर काही भागात सुरूवातीपासूनच मुबलक पाऊस झाला नाही. त्यामुळे जमिनीत ओल नसल्याने पिकांची हवी तशी वाढ झाली नाही. त्यातच तण वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी तणनाशकांची फवारणी केली. जमिनीत ओल नसल्यामुळे पिकांना पुरेसे पोषण मिळाले नाही. त्यातच तणनाशकांची फवारणी करण्यात आल्यामुळे पिकांना शॉक बसला. त्यामुळे पिके पिवळी पडली आहेत.शेतकरी अनेक वर्षांपासून शेतात एकाच पिकाची पेरणी करतात. शेतात पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे. पिकांची फेरपालट केली तर मातीचा पोत सुधारतो. मात्र सातत्याने एकाच पिकाची पेरणी केल्यामुळे पिकांना सुक्ष्म अन्नद्रव्य मिळत नाही. अमरावती विभागात शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबिनची पेरणी करतात. सोयाबिन नगदी पिक असल्यामुळे दरवर्षी एकाच पिकाची पेरणी करण्यात येते. सोयाबिन व मका पिकाला सर्वात जास्त अन्नद्रव्यांची गरज असते. शेतकरी पिकांना नत्र, स्पूरद आणि पालाश (एनपीके) ही मुख्य अन्नद्रव्य देतात. मात्र सुक्ष्म अन्नद्रव्य देत नाहीत. सध्या पिकांना झिंक, मंगल, तांबे, लोह ही सुक्ष्म अन्नद्रव्ये व सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य मिळाले नसल्यामुळे सुद्धा पिके पिवळी पडली आहेत. शेतकºयांनी पेरणी करताना युरीया व सिंगल सुपर फॉस्पेट खत दिले तर पिके पिवळी पडत नाहीत.उगवणीपूर्व तणनाशकांच्या फवारणीकडे पाठपिक पेरणी करण्यापूर्वीच उगवणीपूर्व तणनाशकांची फवारणी केली तर तण उगवत नाही. पिकांची पेरणी केल्यानंतर तसेच तण उगवल्यानंतर लगेच तणनाशकांची फवारणी केली तर पिकांना फटका बसतो. त्यामुळे उगवणीपूर्व तणनाशकांची फवारणी करण्याची गरज आहे.

जमिनीत ओल नसताना नणनाशकांची फवारणी करण्यात आली. त्याचा पिकांना शॉक बसल्याने पिके पिवळी पडली आहेत. तसेच शेतात एकाच पिकाची पेरणी केल्यामुळे पिकांना सुक्ष्म अन्नद्रव्ये मिळत नाही. त्यामुळे सुद्धा पिके पिवळी पडतात.- जी. बी. गिरीतालुका कृषि अधिकारी, खामगाव

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी