शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोरड्या जमिनीवर तणनाशक फवारल्यामुळे पिकांना ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 11:10 IST

जमिनीमध्ये ओल नसताना तणनाशकांची फवारणी केल्यामुळे पिकांना शॉक बसला असून, पिके पिवळी पडली आहेत.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जमिनीमध्ये ओल नसताना तणनाशकांची फवारणी केल्यामुळे पिकांना शॉक बसला असून, पिके पिवळी पडली आहेत. तसेच पिकांना सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यामुळेही पिके पिवळी पडली आहेत.संपूर्ण राज्यात खरीप हंगामाची पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. मात्र, गत काही दिवसांमध्ये पिके पिवळी पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तर पिकांवर सुद्धा व्हायरस आल्याची अफवा काही भागात पसरली आहे. वºहाडात पावसाने दडी दिली होती. तर काही भागात सुरूवातीपासूनच मुबलक पाऊस झाला नाही. त्यामुळे जमिनीत ओल नसल्याने पिकांची हवी तशी वाढ झाली नाही. त्यातच तण वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी तणनाशकांची फवारणी केली. जमिनीत ओल नसल्यामुळे पिकांना पुरेसे पोषण मिळाले नाही. त्यातच तणनाशकांची फवारणी करण्यात आल्यामुळे पिकांना शॉक बसला. त्यामुळे पिके पिवळी पडली आहेत.शेतकरी अनेक वर्षांपासून शेतात एकाच पिकाची पेरणी करतात. शेतात पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे. पिकांची फेरपालट केली तर मातीचा पोत सुधारतो. मात्र सातत्याने एकाच पिकाची पेरणी केल्यामुळे पिकांना सुक्ष्म अन्नद्रव्य मिळत नाही. अमरावती विभागात शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबिनची पेरणी करतात. सोयाबिन नगदी पिक असल्यामुळे दरवर्षी एकाच पिकाची पेरणी करण्यात येते. सोयाबिन व मका पिकाला सर्वात जास्त अन्नद्रव्यांची गरज असते. शेतकरी पिकांना नत्र, स्पूरद आणि पालाश (एनपीके) ही मुख्य अन्नद्रव्य देतात. मात्र सुक्ष्म अन्नद्रव्य देत नाहीत. सध्या पिकांना झिंक, मंगल, तांबे, लोह ही सुक्ष्म अन्नद्रव्ये व सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य मिळाले नसल्यामुळे सुद्धा पिके पिवळी पडली आहेत. शेतकºयांनी पेरणी करताना युरीया व सिंगल सुपर फॉस्पेट खत दिले तर पिके पिवळी पडत नाहीत.उगवणीपूर्व तणनाशकांच्या फवारणीकडे पाठपिक पेरणी करण्यापूर्वीच उगवणीपूर्व तणनाशकांची फवारणी केली तर तण उगवत नाही. पिकांची पेरणी केल्यानंतर तसेच तण उगवल्यानंतर लगेच तणनाशकांची फवारणी केली तर पिकांना फटका बसतो. त्यामुळे उगवणीपूर्व तणनाशकांची फवारणी करण्याची गरज आहे.

जमिनीत ओल नसताना नणनाशकांची फवारणी करण्यात आली. त्याचा पिकांना शॉक बसल्याने पिके पिवळी पडली आहेत. तसेच शेतात एकाच पिकाची पेरणी केल्यामुळे पिकांना सुक्ष्म अन्नद्रव्ये मिळत नाही. त्यामुळे सुद्धा पिके पिवळी पडतात.- जी. बी. गिरीतालुका कृषि अधिकारी, खामगाव

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी