शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

पैनगंगेच्या पुराने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:42 AM

बुलडाणा तालुक्यात झालेल्या अतिपावसामुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. गिरडा ...

बुलडाणा तालुक्यात झालेल्या अतिपावसामुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. गिरडा ते अटकळ या गावाला जोडणारा पूल देखील क्षतीग्रस्त झाला आहे. या नुकसानाची माहिती घेतल्यानंतर आ. श्वेता महाले यांच्या सूचनेवरून भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. सुनील देशमुख यांनी तहसीलदार, नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी, तलाठी आदी अधिकारी वर्ग समवेत नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाडळी, गिरडा, इजलापूर, गोंधनखेड, मढ, अटकळ, देवपूर आदी भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनाने तत्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी, गिरडा ते अटकळ या गावाला जोडणारा क्षतीग्रस्त पुलाबाबत जि. प. बांधकाम व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सूचना देऊन तत्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी ॲड .देशमुख यांनी यावेळी केली. यावेळी संबंधित गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, भाजपा किसान मोर्चाचे आनंदा डुकरे, संजय झुंबड, कुंदन गायकवाड, संतोष पाटील, रमेश भोपळे तसेच स्थानिक भाजपा शाखा अध्यक्ष व सहकारी उपस्थित होते.

पीक विमा संदर्भातील कागदपत्रे तातडीने द्या !

शेतीच्या नुकसान भरपाईतून काही प्रमाणात पीकविम्याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. यासाठी नुकसानाची माहिती ७२ तासांच्या आत देणे गरजेचे ठरते. त्यानुसार नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असल्यास ७२ तासांच्या आत नुकसानाची माहिती अर्ज करून तसेच नुकसान झालेल्या शेताचे फोटो जोडून कृषी अधिकारी व विमा कंपनीला सादर करावे, असे आवाहन या पाहणी दरम्यान ॲड. सुनील देशमुख यांनी शेतकऱ्यांना केले.