शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांचा मदतीसाठी मोर्चा

By ब्रह्मानंद जाधव | Updated: May 29, 2023 17:06 IST

मागण्या मान्य न झाल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर तालुक्यातील शेतकरी बहिष्कार टाकतील, असा इशारा शेतकरी मोर्चेकऱ्यांनी दिला आहे.

सिंदखेडराजा : रोहीमुळे पिकांचे नुकसान झाले असून, अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे. त्यामुळे विविध मागण्यांसाठी सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांचा २९ मे रोजी तहसिल कार्यालयात मोर्चा धडकला. मागण्या मान्य न झाल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर तालुक्यातील शेतकरी बहिष्कार टाकतील, असा इशारा शेतकरी मोर्चेकऱ्यांनी दिला आहे.

शेत शिवारात रोहिंचा त्रास व त्यावर प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, रोहींचा त्रास असलेल्या वनविभागाच्या भागात तार कुंपण करावे, नुकसान पंचनामे त्वरित करावेत, नुकसान भरपाई देता येत नसल्यास कुंपणसाठी शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान द्यावे, बँकेने शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेले होल्ड त्वरित काढावे, आदी मागण्यासाठी शहर व तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयात मोर्चा काढला. यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये दिलीप चौधरी, अक्षय ठाकरे, कैलास मेहेत्रे, सखाराम चौधरी, शहाजी चौधरी, सिद्धार्थ जाधव, अनिल मेहेत्रे, संदीप मेहेत्रे, दत्ता चौधरी, अनिल जावळे, भिकाजी खार्दे, कैलास येडुबा मेहेत्रे, नरहरी तायडे, गजानन मेहेत्रे, सखाराम बर्डे, संजय तायडे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणा